शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विद्वेषाचे विष आणि गढूळलेला शेजारधर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 07:26 IST

बांगलादेश आणि भारत इतिहास-भूगोलाने बांधले गेले आहेत. एकजुटीने राहिले तर प्रगती, दळणवळण आणि स्थैर्याचे ते ऊर्जा केंद्र होऊ शकते.

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार

दक्षिण आशियातील सत्तेच्या गणितात भूगोल ही नियती असते आणि स्मृती कधीच पुसता येत नाहीत. भारत बांगलादेशशी ४ हजार किलोमीटरच्या सीमेने बांधलेला आहे. बांगलादेश हा भारताचा केवळ शेजारी नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेचा भोज्या. पन्नासेक कोटी लोकांच्या ताटात अन्न वाढणाऱ्या जलसंपदेचा तो रखवालदार आहे. भारताची कूटनीतीतील चपळता, नैतिक सातत्य आणि डावपेचात्मक संयम याची परीक्षा हा देश सतत घेत असतो.

 गतसप्ताहात बांगलादेशात मोठी उलथापालथ झाली.  तारिक  रेहमान यांच्या बीएनपीने  २९९ जाहीर जागांपैकी २१२ जागा जिंकून २/३ बहुमत मिळवले. जेन-झीच्या उठावात शेख हसीना यांची राजवट उलथवून जन्माला आलेले मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालचे हंगामी सरकार इतिहासजमा झाले. ताज्या निकालाने कट्टरपंथीय पुरते गाडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे वास्तव लगेच लक्षात घेऊन निकाल स्पष्ट होताच रेहमान यांचे अभिनंदन केले. लोकशाहीवादी, स्थिर आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या बांगलादेशबरोबर काम करण्याची इच्छा मोदींनी व्यक्त केली. वावड्यांचे रूपांतर संशयाच्या भोवऱ्यात होण्याच्या आधी पाणी शांत करण्याची ही भारतीय पद्धत होय.

हसीना प्रकरणानंतर देशात उसळलेल्या रानटीपणाला बांगलादेशातील जनतेनेच थंडपणे शह दिला. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेश धार्मिक अल्पसंख्याकांचे शिरकाण करणाऱ्या दहशतवादी शक्तींच्या हातात गेला. पहिल्या १०० दिवसांतच हिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील २००० पेक्षा जास्त हल्ल्यांची नोंद जागतिक संस्थांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रांकडून झालेल्या चौकशीत युनूस राजवटीचा बुरखा फाटला. हिंदू, अहमदिया आणि इतर काही देशी समूहांविरुद्ध ठरवून हल्ले झाल्याचे उघड झाले. विस्थापित कुटुंबे, भग्न मंदिरे आणि पुजाऱ्यांचे शिरकाण.. अशी दृश्ये भारतीय टीव्हीच्या पडद्यावर झळकली. त्यातून उभयपक्षी संबंधांत कडवटपणा आला. पंतप्रधान हसीना यांना भारताने आश्रय दिल्याने दरी आणखी रुंदावली.

 मात्र आई खालिदा झिया यांच्या मृत्यूनंतर १७ वर्षांनी लंडनहून बांगलादेशात परतलेल्या तारिक रेहमान यांनी आपण देशात शांतता, सार्वभौमत्वाची पुनर्स्थापना करण्यासाठी आलो आहोत असे चित्र उभे केले. एकीकडे त्यांचे हे सांगणे आणि जमातच्या राजवटीची भीती यामुळे चित्र बदलले.  सुरक्षा हवी असलेले अल्पसंख्याक, प्रतिष्ठा आणि नोकरी मागणारे तरुण, घराणेशाही आणि पाश्चात्त्य प्रभाव दोन्ही नको असलेले पुराणमतवादी मुस्लिम असे सगळे एकत्र येण्याचा परिपाक म्हणजे हा निकाल होय. अर्थात कट्टरपंथीयांचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही. सगळ्यात वाईट म्हणजे भारताच्या सीमेलगतच्या मतदारसंघात त्यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला. या भौगोलिक केंद्रीकरणामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते.

आपण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करू, सर्व धर्मीयांची पूजास्थाने सुरक्षित राहील, राहतील हे रहमान यांचे वचन आहे. भारतासाठी एवढे पुष्कळ झाले. हिंदूंच्या कत्तलीमुळे परस्पर सामंजस्यावर आघात झाला होता. हसीना यांना दिलेला आश्रय  योग्य असला तरी भारताला शत्रुपक्ष म्हणून रंगवले गेल्याने उभयपक्षी संबंध बिघडले, पाणीप्रश्नावरील बोलणी अडली, सांस्कृतिक बहिष्कार सुरू झाले. बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने तर टी-ट्वेंटी वर्ल्डकपसाठी भारतीय भूमीवर न खेळण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी क्रिकेट हा पूल होता; त्याची आता रणभूमी झाली. असे असले तरी रेहमान यांना मिळालेला कौल उचलून धरून मोदी यांनी सगळे ठीकठाक करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

नवीन नेतृत्व कसे वागते हा भारताच्या दृष्टीने निर्णायक मुद्दा आहे. रेहमान अल्पसंख्याकांना संरक्षण देतात का? अत्याचार पीडितांना न्याय मिळतो का? भारतविरोधी बंडखोरांच्या मुसक्या ते आवळतात का? हे महत्त्वाचे असेल. 

येणारा काळ हा प्रागतिक नेतृत्वाचा, व्यापार, ऊर्जा आणि दळणवळण तसेच सीमा सुरक्षा वाढवणारा असण्याची गरज आहे. तडजोड करता येणार नाही अशा तीन विषयांवर संबंध अवलंबून राहतील. पहिले म्हणजे रेहमान यांनी जहाल घटकांशी संबंध तोडले पाहिजेत, भारतीय बंडखोरांना आश्रय देता कामा नये, याशिवाय परस्परांचा धोरणात्मक आणि आर्थिक लाभ होईल अशा रीतीने दोन्ही देशांत देवघेव व्हायला हवी. सीमेवरील संघर्षाने परस्पर संबंधात विष कालवले आहे. अंतिमत: बांगलादेशने आपली सर्व ओळख आत्मविश्वासाने मिळवली पाहिजे. त्याचप्रमाणे भारताची या प्रदेशातील मोलाची भूमिका मान्य केली पाहिजे.

दोन्ही देश इतिहास आणि भूगोलाने बांधलेले आहेत. कधीही न संपणाऱ्या संघर्षाचा पाकिस्तानी मार्ग बांगलादेशने फेटाळला पाहिजे. या रस्त्याने गेलेला दुराभिमानी देश असफल तर झालाच, पण भिकारी होऊन बसला. परदेशी मदतीसाठी त्याला सतत हात पसरावे लागतात. बांगलादेश आणि भारत हे दोन्ही देश एकजुटीने राहिले तर प्रगती, दळणवळण आणि स्थैर्याचे ते ऊर्जा केंद्र होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh election: New leadership, India's concerns, and neighborhood relations.

Web Summary : Bangladesh's election brings new leadership, prompting India to prioritize stable relations. Focus remains on minority protection, curbing anti-India activities, and fostering economic cooperation. A united front promises regional progress.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश