शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

दिनविशेष लेख: इंदिरा गांधींच्या जडणघडणीत रवींद्रनाथ टागोरांच्या 'शांतिनिकेतन'चा मोठा वाटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 10:06 IST

इंदिरा गांधी यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय कणखर होतं, पण त्यांच्या जडणघडणीतला खूप मोठा वाटा रवींद्रनाथ टागोर आणि ‘शांतिनिकेतन’चा होता!

शीला झुनझुनवाला

साधारण १९३४ सालची गोष्ट. जवाहरलालजी श्रीमती कमला नेहरूंसोबत शांतिनिकेतनला पोहोचले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या देखरेखीखाली चालणारी ही शाळा पाहून त्यांनी ठरवलं की आपल्या मुलीला योग्य शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी शांतिनिकेतनपेक्षा दुसरी चांगली शाळा असूच शकत नाही.त्यांनी बराच विचार केला. कारण इंदिराजी लहानपणापासूनच अतिशय लाडात वाढल्या होत्या आणि ‘शांतिनिकेतन’मधलं आयुष्य खूपच खडतर होतं. तिथे मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी जीवन जगायला शिकवलं जायचं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ही शाळा पूर्णपणे भारतीय वातावरणात सुरू केली होती.

रवींद्रनाथ टागोर यांची शिक्षणाला कायमच प्राथमिकता होती. चार भिंतीआडच्या चाकोरीबद्ध शिक्षणाला त्यांनी मुक्त केलं आणि हे शिक्षण खुल्या, मोकळ्या वातावरणात नेलं. जीवनाचं शिक्षण देणं हाच त्यांचा त्यामागे प्रमुख हेतू होता. त्यासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. त्यांनी चाकोरीबद्ध शिक्षणाला फाटा तर दिलाच, पण हे शिक्षण निसर्गाच्या सान्निध्यात आणून कला, क्रीडा, संस्कृतीच्या माध्यमातून त्याला आणखी अनोखं रूप दिलं. 

इंदिरा गांधी यांना याच शाळेत जीवनाचं शिक्षण द्यायचं आणि त्यांना मोठं करायचं, जेणेकरून त्यांना जीवनाची सगळी अंगं समजतील, हे पंडित नेहरू यांचं ध्येय होतं. आयुष्य कसं असतं आणि कसं जगावं लागतं हे कळलं तर इंदिरा गांधी यांना पुढच्या काळात त्याचा उपयोग होईल अशा दूरदृष्टीनं त्यांनी इंदिराजींना या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला होता. 

तिथलं जीवन हुबेहुब गुरुकुलासारखं होतं. इंदिराजींच्या कुटुंबीयांना प्रश्न पडला होता की, इंदिराजी तिथलं खडतर जीवन कसं सहन करू शकतील? पण शेवटी जवाहरलालजींचीच इच्छा पूर्ण झाली. स्वत: इंदिरा गांधींनाही ‘शांतिनिकेतन’ खूपच आवडलं. वडिलांप्रमाणेच त्यांनाही आयुष्यातील कठीण प्रसंगांना कसं तोंड द्यायचं हे जाणून घ्यायचं होतं. 

१९३४ मध्ये इंदिरा गांधी शांतिनिकेतनमध्ये पोहोचल्या. तिथे सर्व काही आपलं आपणच करायचं होतं. तिथलं जीवन अतिशय खडतर होतं. नियमाप्रमाणे वागायची सक्ती होती. शिस्त खूप कडक होती. कितीही गरम होत असलं तरीही विद्यार्थी राहत असलेल्या खोल्यांमध्ये पंखे नव्हते, सर्व अभ्यास कंदिलाच्या उजेडात करावा लागत होता.

विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी अंघोळ करताना स्वत:चे कपडे स्वत:नेच धुवावेत, असा नियम होता. स्वयंपाकघरापासून ते प्रत्येक कामात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रत्येक कामासाठी विद्यार्थ्यांची ड्यूटी लावलेली होती, पण विशेष म्हणजे सर्वांमध्ये स्नेह होता. प्रत्येकाचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं. देशाच्या स्वातंत्र्याचा धडा तिथे मिळत होता. कुठल्याही कठीण कामाचा अनुभव नसलेल्या इंदिराजींनी शांतिनिकेतनच्या खडतर जीवनाशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच त्या तिथल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रेसर मानल्या जाऊ लागल्या. शरीर नाजूक, कोमल असलं तरी मुलींमध्येही किती कणखरपणा आणि धैर्य असतं हे प्रत्येकाला समजलं. शांतिनिकेतनमधील आयुष्याच्या त्या कालखंडाबद्दल इंदिरा गांधींनी स्वतः अनेकदा म्हटलं आहे, ‘मी तिथेच भारत पाहिला, शिकला, समजून घेतला आणि अनुभवला!..’

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीRavindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर