शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

विशेष लेख: महायुुतीने सहावी जागा लढवली आणि समजा पडले... तर?

By यदू जोशी | Updated: February 2, 2024 10:19 IST

Rajya Sabha Election: भाजप आणि मित्रपक्ष राज्यसभेच्या पाच जागा लढवतील आणि जिंकतील. सहावी जागा लढण्याची जोखीम महायुतीने पत्करली तर रंगत येईल.

- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

ही २०१५ मधली गोष्ट आहे. राज्यसभेचे उमेदवार ठरविण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत सुरू होती.  दोन तीन नावे ठरवून दिल्लीला पाठवायची असे चालले होते. त्यासाठी बैठकीत खल सुरू होता. तेवढ्यात दिल्लीहून फोन आला... ‘उद्या सकाळी एका दलित उमेदवाराचे नाव सुचवा...’ सगळेच चाट पडले, राज्यसभेत पाठवता येईल असा दलित चेहरा कोण याची शोधाशोध सुरू झाली अन् तेव्हा अडगळीत पडलेले पिंपरी-चिंचवडचे अमर साबळे यांना खासदारकीची लॉटरी लागली. सांगण्याचा मतलब एवढाच की भाजपमध्ये काहीही होऊ शकते. 

 राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक आहे. उमेदवारीबाबत भाजपमध्ये धक्कातंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो. माध्यमांमधून कितीही नावे येऊ देत, शेवटी वरचे दोघे अन् देवेंद्र फडणवीस काय ते ठरवतील. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे बिहारचे प्रभारी आहेत, नितीशकुमार एनडीएत परतले त्यात त्यांचाही रोल होताच. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी तावडेंना तेथून हलवून मुंबईतून लढविले जाणार नाही असे अनेकांना वाटते. म्हणूनच  त्यांना राज्यसभेवर पाठविले जाईल, असे म्हणतात. तावडे हुशार आहेत. २०१४ मध्ये त्यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी एका शब्दाने नाराजी व्यक्त केली नाही, ते काम करत राहिले. आधी पक्षाचे राष्ट्रीय सचिव, मग सरचिटणीस झाले. आता शहा-नड्डांच्या जवळ आहेत. पंकजा मुंडे या तावडेंकडून काही शिकल्या नाहीत. राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक आली की संभाव्य उमेदवारांमध्ये पंकजा यांचे नाव असते आणि नंतर कटते. त्यामुळे आता त्यांचे नाव संभाव्यमध्ये घेत नाही म्हणजे तरी त्यांना संधी मिळेल. 

नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे की त्यांचे पुत्र आ. नितेश राणे यांना महाराष्ट्रात पुढे मंत्री म्हणून संधी द्यायची, या दोनपैकी एक पर्याय निवडला जाईल. दुसऱ्या पर्यायाला पसंती दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. सिनिअर राणेंना थांबविले तर मग मुलाला भविष्यात मोठे करण्याचा शब्द दिला जाईल. प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेची वाट अवघड मानली जाते. पक्ष संघटनेत त्यांची सेवा घेतली जाऊ शकते.  भाजपकडून यावेळी एक मराठा, एक ओबीसी आणि एक नॉन मराठा-नॉन ओबीसी असे तीन उमेदवार दिले जाऊ शकतात. तीनपैकी एक महिला असू शकते. दोन मराठी वृत्तपत्रांचे मालकही शर्यतीत आहेत. 

भाजप आणि मित्रपक्ष ५ जागा लढवतील आणि जिंकतील. सहावी जागा लढण्याची जोखीम भाजपने म्हणजे महायुतीने पत्करली तर रंगत येईल. सहावी जागा जिंकायची तर महाविकास आघाडीत उभी फूट पडावी लागेल. साम दाम दंड भेद सगळे वापरावे लागेल; पण तसे केले तर निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जातो या आरोपाला बळकटी मिळेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची प्रतिमा खराब करून घेण्याची जोखीम भाजप पत्करेल का? सहाव्या जागेसाठी भाजपला ३० ते ३५ मतांची गोळाबेरीज करावी लागेल. 

गेल्या वेळी राज्यसभा, विधान परिषद निवडणूक झाली तेव्हा भाजपने चमत्कार केला होता. त्या चमत्काराचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस होते. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होता. त्यामुळे गमावण्यासारखे काहीही नव्हते. जिंकले काय किंवा हरले काय फार फरक पडणार नव्हता. यावेळी ते सत्ता पक्षात आहेत. सहावी जागा लढले आणि पडले तर त्या पडलेल्या जागेची अधिक चर्चा होईल पाच जागांचे काही कौतुक होणार नाही. काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या आधी त्याचा मुहूर्त साधला गेला तर चमत्कार घडून सहावी जागाही पदरात पाडून घेतील.

संख्याबळ बघितले तर भाजप व मित्रपक्ष पाच जागा जिंकू शकतात. महाविकास आघाडी एक जागा जिंकेल. संख्याबळानुसार ही एक जागा काँग्रेसला मिळायला हवी.  तुलनेने महाविकास आघाडीला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी कमी आमदार संख्या लागेल. आघाडीने दुसरी जागा एखाद्या मोठ्या पैसेवाल्याला दिली तर तो रंगत आणू शकेल; पण प्रश्न भाजपशी दोन हात करण्याच्या मानसिकतेचा आहे. 

सत्ता पक्षाला विरोधी पक्षाची मते फोडणे सोपे असते. ते काम विरोधी पक्षासाठी तेवढेच कठीण असते. सत्ता पक्षाच्या सावलीत असलेले आमदार महाविकास आघाडीच्या सध्या उन्हात असलेल्या घरात का म्हणून जातील? गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे क्रॉस वोटिंग झाले होते. त्याची चौकशी करण्यासाठी मोहन प्रकाश समिती नेमली होती. कोणत्याही आमदारावर कुठलीच कारवाई झाली नाही त्यामुळे क्रॉस वोटिंग केले तर काही फरक पडत नाही, असा मेसेज काँग्रेसच्या आमदारांमध्ये गेला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) मतांबाबत व्हीप  कोणाचा चालेल हा कळीचा मुद्दा असेल.

जाता जाता :  ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांची परवा भेट झाली. ते म्हणाले, ‘मंत्रालयात जायचे तर याच्या त्याच्या ओळखीने जावे लागते. पास नाही ना माझ्याकडे. मी पत्रही दिले होते मागे पण काहीही झाले नाही.’ पोपटरावांसारख्या अनेक नामवंतांना मंत्रालयात जाण्यासाठी ताटकळावे का लागावे? निदान पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री असे सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेल्यांना तरी मंत्रालय प्रवेशाचा पास सन्मानाने द्या. मंत्री, आमदारांचे आठ-दहा चमचे दादागिरी करून एकाच वेळी मंत्रालयात जातात तेव्हा बरे चालते!

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी