शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिनविशेष लेख: सरदार पटेल आणि पंडित नेहरू : नात्यातील ऊन-सावलीचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 11:00 IST

पटेल आणि नेहरू यांचे नाते कसे होते याचे अनेक किस्से सांगितले जातात

अरविंद कुमार सिंह, ज्येष्ठ पत्रकार

सरदार पटेल यांची जयंती किंवा पुण्यतिथी आली की त्यांचे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाते कसे होते याचे अनेक किस्से कानावर पडू लागतात. त्यातले काही निव्वळ बंडलबाजी आणि काही जाणूनबुजून पसरवलेल्या अफवा असतात. परंतु, सरदार पटेल आणि नेहरू यांच्यामध्ये एक अनोखे गाढ असे नाते होते हेच वास्तव आहे. असे नाते आजच्या राजकीय नेत्यांमध्ये क्वचितच पाहायला मिळू शकते.

नेहरू यांची गांधीजी आणि सरदार पटेल यांच्याशी पहिली भेट १९१६ मध्ये लखनऊच्या काँग्रेस अधिवेशनात झाली होती. या अधिवेशनाला लोकमान्य टिळकांसह त्यावेळचे सगळे दिग्गज नेते हजर होते. काँग्रेसमधील एकतेचा एक नवा कालखंड त्यावेळी समोर आला. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत दोघांमधील नाते कायम होते. सरदार पटेल यांच्यापेक्षा नेहरू १४ वर्षांनी लहान होते. पटेल यांच्या मनात नेहरूंबद्दल अपार स्नेह होता. म्हणूनच ७ मार्च १९३७ ला गुजरात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात असा मुद्दा पुढे आला की, पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रांतीय निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये बोलावले जावे. तेव्हा पटेल यांनी त्याला हरकत घेतली. ते म्हणाले, आम्ही त्यांना गुजरातमध्ये मतांची भीक मागण्यासाठी बोलावणार नाही. ती लाजिरवाणी गोष्ट होईल. निवडणुकीत गुजरात विजयी होईल आणि काँग्रेसबद्दल आपला विश्वास व्यक्त करील तेव्हा आपण नेहरूंना मन:पूर्वक बोलवू, फुलांनी स्वागत करू. 

१९४९ साली पटेल यांनी पंडित नेहरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिले. या पत्रात ते लिहितात ‘काही स्वार्थप्रेरित लोकांनी आपल्या दोघांविषयी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला असून, काही भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतात; परंतु वास्तवात आपण आजीवन सहकारी आणि बंधुत्वाच्या नात्याने काम करत आलो. काळाच्या गरजेनुसार आपण एकमेकांचे दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्यात बदल केले, एकमेकांच्या मतांचा कायम आदर केला.’ नेहरूंनी दिल्लीत २० सप्टेंबर १९६३ रोजी सरदार पटेल यांचा पुतळा उभा केला आणि त्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते केले.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू