शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: NEET भविष्यात खरंच 'नेटकी' होईल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:11 IST

८५ टक्के जागांवर राज्यांनी आपले प्रवेश करायचे आहेत, तर मग राज्यांची स्वायत्तता काढून केंद्रीकृत प्रवेश परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर कशासाठी?

हरीश बुटले, संस्थापक, 'डिपर' आणि संपादक, तुम्ही आम्ही पालक |

५ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेचा निकाल ४ जूनला निवडणूक निकालांच्या रणधुमाळीमध्येच जाहीर झाला आणि देशात मोठं वादळ निर्माण झालं. त्या गदारोळाची कारणं एव्हाना सर्वांना माहिती झालेली आहेत. परीक्षेचा पेपर देण्यास उशीर झाला त्याच्या भरपाईपोटी १५६३ विद्यार्थ्यांना दिले गेलेले 'ग्रेस' गुण, ७२० पैकी ७२० गुण घेणारे एकूण ६७ विद्यार्थी यादीमध्ये दिसणे आणि सहा विद्यार्थी एकाच केंद्रावरून ७२० गुण मिळवून गुणवत्ता यादीत झळकणं या गोष्टी घोटाळ्याचा संशय येण्यास पुरेशा होत्या. पेपरफुटीचीही चर्चा होती. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले आणि अखेरीस ग्रेस गुण रद्द करून ते मिळालेल्या विद्यार्थ्यांना (च) फेरपरीक्षेची संधी देण्याचा निर्णय झाला. NEET च्या निकालाच्या गोंधळातून पुढे येणारे काही वास्तव मुद्दे असे : १. २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रविष्ट झाले (२०२३ २०,३८,५९६, २०२४-२३,३३,२९७) २. NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बारावीच्या वर्षांत साधारणपणे २२ ते २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला. त्यासाठी कोटा येथे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आत्महत्यांची पार्श्वभूमी होती. त्यामुळे मेरिट मोठ्या प्रमाणावर वाढलं. ३. देशपातळीवर ५७१ शहरांतून ही परीक्षा ४७५० केंद्रांवरून संपन्न झाली. तुलनेने पेपर सोपा होता, अशी चर्चा आहे. ४. यावर्षी गुणांची वाढलेली एकूण सरासरीही थक्क करणारी होती. २०२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ७२० पैकी २७९.४१ एवढी होती. तर २०२४ मध्ये ती चक्क ३२३.५५ एवढी झाली. म्हणजे सरासरी माकौमध्ये जवळपास ४४.१४% ची वाढ झाली आणि ओपन कॅटेगिरीसाठी मागील वर्षी असलेले १३७ क्वालिफाइंग मार्क १६४ गुणांवर गेले. त्यामुळे सकृतदर्शनी मोठ्या प्रमाणावर माकौमध्ये वाढ झालेली आहे, हे स्पष्ट दिसून येत होते; मात्र हा फुगवटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होता की, त्यात काही गौडबंगाल आहे, अशी शंका घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण झाला.

खूप मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होण्यात झाली. या टेस्टिंग एजन्सीने केलेला खुलासा विद्यार्थी व पालकांना फारसा रुचला नाही, उलटपक्षी त्यांचा रोष आणखी वाढला. NTA ने ग्रेस गुण कसे दिले, याविषयी संभ्रम असल्याने सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल झाल्या. शेवटी कोर्टात मध्यममार्ग काढला गेला. तरीही प्रश्न उरतोच की, सुरुवातीच्या ५०,००० विद्यार्थ्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मार्काची लयलूट कशी झाली, कारण पुढील ५०,००० विद्याथ्यर्थ्यांमध्ये त्याप्रमाणात मार्क्स वाढलेले दिसत नाहीत. २०२३ मध्ये ६२० ते ७२० या पहिल्या १०० मार्कामध्ये जवळपास १४,००० विद्यार्थी होते. २०२४ मध्ये याच दरम्यान अंदाजे ५८,००० विद्यार्थी आहेत. म्हणजे २०२३ मध्ये केवळ ०.६ टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या शंभर गुणांमध्ये स्थान मिळवलेलं होतं; पण २०२४ मध्ये पहिल्या शंभर गुणांमध्ये २.५ टक्के विद्यार्थी आहेत. हे का बरं घडलं असावं? केवळ अभ्यासक्रम कमी झालेला होता आणि पेपर तुलनेने सोपा होता म्हणून नव्हे, तर यादरम्यान सर्व देशपातळीवरील गव्हन्मेंट कॉलेजचे प्रवेश संपतात. त्यामुळे यादरम्यानच्या माकौमध्येच काही प्रमाणात गडबड घोटाळा झाला आहे का? शंका घेण्यासाठी पुरेसा वाव आहे. जर अशाप्रकारे मार्क्स पहिल्या शंभर गुणांमध्ये वाढले तर त्यानंतरच्या शंभर गुणांमध्ये देखील तशाच प्रकारची वाढ दिसायला हवी होती; मात्र तसं दिसत नाही. कारण ५२० ते ६२० या माकांच्या दरम्यान २०२३ मध्ये जवळपास ९१,००० विद्यार्थी, तर २०२४ मध्ये १,०२,५०० विद्यार्थी आहेत. म्हणजे केवळ ११५०० विद्याथ्यांची वाढ. हे कसं शक्य आहे ?

प्रवेश परीक्षा निर्विघ्नपणे कशा घेता येतील, हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आताच्या १५६३ विद्यार्थ्यांच्या निकालात जे फेरफार होतील त्याचा महाराष्ट्राच्या आपल्या ८५ % कोट्याच्या प्रवेशांवर काहीही परिणाम होणार नाही. कारण ग्रेस मार्क मिळवलेले विद्यार्थी महाराष्ट्रातील असण्याची शक्यता कमी आहे. एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध होते की, देशातील काही ठराविक भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चुकीचे प्रकार सुरू आहेत आणि त्याचा फटका देशभरातल्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. जर १५ टक्के जागा नॅशनल पूलमध्ये द्यायच्या आहेत आणि उर्वरित ८५% जागांवर त्या- त्या राज्यांनी आपले प्रवेश करायचे आहेत तर मग राज्यांची स्वायत्तता काढून केंद्रीकृत प्रवेश परीक्षा करून नेमके काय साधलं ? ज्यांना देशपातळीवर स्पर्धा करायची आहे ते विद्यार्थी त्या पद्धतीने करतीलच, त्यासाठी नाहक सर्व विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे जे प्रकार सुरू आहेत त्या प्रकाराबद्दल निदान महाराष्ट्रासारख्या राज्याने विचार करायला सुरुवात केली पाहिजे. तामिळनाडू तर नेहमीच NEET विरोधामध्ये शड्डू ठोकून आहे. त्यांनाही केंद्रीकृत परीक्षा नकोच आहे. आपल्या राज्यात २०१५-१६ पर्यंत MHT- CET होती, ती अतिशय उत्तम पद्धतीने सुरू होती. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार कधी दिसत नव्हते आणि म्हणूनच असा प्रश्न पडतो की 'NEET' भविष्यात कधीतरी 'नेटकी' होईल का?

(harishbutle@gmail.com)

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducationशिक्षण