शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

सारांश विशेष लेख: 'विधिमंडळाचा लाडका सदस्य' अशी योजना आता सुरू करा!

By अतुल कुलकर्णी | Updated: March 23, 2025 07:56 IST

सुधीरभाऊ हल्ली आपल्याच सरकारला खडे बोल सुनावतात, हे या अधिवेशनात दिसून आले आहे

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय राहुल नार्वेकरजी,

विधानसभेचे कामकाज ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सुरू आहे त्याला तोड नाही. कोण काय बोलतो याकडे आपण फार लक्ष देऊ नका. लक्ष दिले तर काम करणे मुश्किल होईल. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या प्रथा, परंपरा आणि कामकाजाचा हवाला देत एकाच दिवशी ३० ते ३५ लक्षवेधी लागल्याबद्दल हे विधानभवन आहे की लक्षवेधी भवन आहे असा सवाल विचारला खरा मात्र, त्यांनी लक्षवेधीच्या निमित्ताने स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता अशी कुजबुज विधिमंडळात होती. सुधीरभाऊ हल्ली आपल्याच सरकारला खडे बोल सुनावतात, हे या अधिवेशनात दिसून आले आहे.

तुमच्या दालनात एकदा सुधीरभाऊ आणि देवेंद्रभाऊ यांना जेवायला बोलवा. सुधीरभाऊंच्या आवडीची रानमेव्याची भाजी मागवा. म्हणजे पुढचे सगळे निवांत पार पडेल. लोकप्रतिनिधी काम करतात, प्रश्न मांडतात, त्यांच्या लक्षवेधीच्या निमित्ताने त्यांच्या विभागातल्या प्रश्नांना न्याय मिळतो. त्यामुळे असे प्रश्न मांडायचे नाहीत का? खरे तर आपण एक दिवस लक्षवेधीचा, एक दिवस प्रश्नोत्तराचा, एक दिवस औचित्याच्या मुद्द्यांचा, तर एक दिवस वादावादीचा अशी विभागणी करायला हरकत नाही. यातून दिवस आणि वेळ उरलाच तर त्यावेळी विधिमंडळाचे कामकाज होईल असे जाहीर केले पाहिजे. शेवटी प्रथा परंपरा आपणच तर निर्माण केल्या पाहिजेत ना...

आपणच मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहोत, असे तरुण तडफदार मंत्री नितेश राणे म्हणाल्याची चर्चा विधानभवनात होती. मुख्यमंत्र्यांनी ‘लाडका मंत्री’ योजना घोषित केली आहे. त्या योजनेचे निकष ते लवकरच सांगणार आहेत. तुम्ही देखील ‘विधिमंडळाचा लाडका सदस्य’ अशी घोषणा करायला हरकत नाही. सरकार कोणाचे आहे, याचा विचार न करता जे सदस्य सडेतोडपणे बोलतील, वेळप्रसंगी सरकारवर टीका करतील, जे मंत्री मंत्रिपदाची शपथ विसरून समाजासाठी वाटेल ते बोलायला मागेपुढे बघणार नाहीत. अशांची आपण सर्वोत्कृष्ट सदस्य म्हणून निवड करू शकतो का? असे निकष ठेवले तर सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे यांची आपण पुरस्कारासाठी निवड करू शकाल..! आम्ही आपलं सुचविण्याचं काम करतो... आपला तेवढाच वेळ वाचावा ही त्या मागची प्रामाणिक भावना... आपल्यालाच सगळे कळते, इतरांना काही कळत नाही, असे अधिकाऱ्यांनी वाटून घेण्याची गरज नाही... आम्हीच चांगले आहोत या मानसिकतेत राहाल तर तुम्ही काही करू शकणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी तमाम अधिकाऱ्यांना नुकताच दिला आहे. आपणही असाच इशारा सदस्यांना देऊ शकता. जे सदस्य आपल्यालाच जास्त कळते या हिरीरीने सभागृहात बोलतात, त्यांनी तसे वाटून घेण्याची गरज नाही, असे आपण एकदा खडसावून सांगायला हवे...त्याचवेळी सर्वोत्कृष्ट सदस्य निवडीचे निकषही जाहीर केले तर त्याचा फायदा पुढच्या अधिवेशनाला नक्की होईल. 

या अधिवेशनात सभागृहात गोंधळ, गदारोळ होता. सभागृहाचे कामकाजच पूर्णवेळ होऊ शकले नाही. मंत्री सभागृहापेक्षा बाहेर व्यस्त होते त्यामुळे सभागृह बंद ठेवण्याचीही आपल्यावर वेळ आली... रोज नवनवे विषय सदस्यांपुढे येत होते. त्यामुळे ते तरी काय करणार..? त्यांच्या भाषणांमुळे सभागृहाच्या कामकाजाची ‘दिशा’ बदलून गेली त्यात त्यांचा दोष नाही... एक मात्र वाईट झाले. या गदारोळ गोंधळामुळे आर्थिक पाहणी अहवालावर चर्चा झाली नाही. राज्याची नेमकी अवस्था काय आहे? शाळा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शेती याबाबतीत महाराष्ट्र कुठे आहे? याचा शोध घेण्याची संधी बिचाऱ्या सदस्यांना मिळालीच नाही... अनेक सदस्यांची अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण करण्यासाठी केलेली तयारी वाया गेली...त्यामुळे त्यांना फार वाईट वाटले असेल. अधिवेशन संपताना आपण सगळ्या सदस्यांची समजूत काढा... या विषयांवर तुम्हाला बोलायला मिळाले नाही त्याचे मलाच दुःख वाटले असे सांगा. ज्या सदस्यांना आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्पावर बोलायचे असेल त्यांना आपण रोज आपल्या दालनात भेटीसाठी बोलवा आणि मनसोक्त बोलायला सांगा... तेवढेच त्यांचे दुःख हलके होईल. आपल्याला कुठेतरी बोलता आले याचे समाधान मिळेल...शेवटी तुम्ही या सगळ्या आमदारांचे पालक आहात. त्यांनी तुमच्याकडे भावना व्यक्त करायच्या नाहीत तर कोणाकडे...काहींनी आम्हाला या भावना सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचविल्या... बाकी आपण योग्य तो निर्णय घ्याल...

- आपलाच बाबूराव

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार