शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:58 IST

शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...संपत्तीची लालसा आणि पराकोटीची विषमता अशा 'आजच्या' प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी छत्रपती शिवरायांची ध्येयधोरणे मार्गदर्शक ठरतात!

प्रा.डॉ.नितीन बाबर, अर्थशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा, भविष्यवेधी द्रष्टा, सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून अद्वितीय कार्य केले आहे. शिवाजी महाराजांनी जगाला केवळ स्वराज्याचं राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. जागतिकीकरण, बाजारीकरण, सत्तास्पर्धा यातून वाढलेली संपत्तीची लालसा व पराकोटीची विषमता अशा 'आजच्या' प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवाजी महाराजांची ध्येयधोरणे मार्गदर्शक ठरतात.

शेती, पर्यावरण याविषयी महाराजांनी नेहमीच उदात्त दृष्टिकोन ठेवला, महाराजांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यव्यवस्था निर्माण केली. काटेकोर जलव्यवस्थापन, शेतसारा माफी, सवलती, समृद्धी, कृषी व्यवस्थापनातून लोककल्याणाची हमी दिली. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. आज शेतीची अवस्था काय आहे? एकीकडे बोगस बी-बियाणे, खते, औषधे, कृषी खात्यातील सावळा गोंधळ, पीकविमा कर्जमाफी-अनुदान वाटपातले गैरव्यवहार; आणि दुसरीकडे शहरकेंद्रित स्मार्ट विकासाच्या नादात ग्रामीण भागाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष! म्हणून शिवरायांच्या कृषीविषयक धोरणाचा फेरविचार आज कालसुसंगत ठरतो.

शिवाजी महाराजांनी उद्योगांच्या संरक्षणाबरोबरच व्यापाराच्या वाढीसाठीही काळजी घेतली. हस्तउद्योग, कुटिरोद्योगपूरक धोरण स्वीकारून कारागीर, कास्तकार व शिलेदारांच्या माध्यमातून स्वयंनिर्भर अर्थकारणावर भर दिला, व्यापारवाढीसाठी उपाययोजना केल्या. राज्याचा कोषागार संपन्न असेल तर त्या प्रगती निश्चितच होते. लढाईमध्ये गनिमांकडून हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन मरगठ्ठा हा प्रगतीवर होता. 'स्वयंनिर्भर स्वराज्या 'चा तत्कालीन विचार आजच्या आत्मनिर्भरतेशी किती सुसंगत होता, हे लक्षात येते.

छत्रपती शिवरायांनी पर्यावरण आणि माणूस यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व ओळखले होते. 'गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई!' असा मंत्रच त्यांनी आपल्या आज्ञापत्रातून दिला. गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा या वृक्षांची लागवड करून स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील याची सर्वतोपरी काळजी घेतली. आज विकासाच्या अमानुष हव्यासापोटी माणसाने आपल्याच पायावर कशी कुन्हाड मारून घेतली आहे हे उघड दिसते. महाराजांच्या गौरवशाली प्रयत्नांची आणि विचारांची एकमेव साक्ष असणाऱ्या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपातजतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे राजेपण हे कोणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नव्हते. त्यांनी 'स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य।' अशी भावना जागृत करून तुकड्या-तुकड्यांत विखुरलेल्या समाजात सर्वांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेच्या समान संधी देणाऱ्या लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या कार्यकौशल्याची नेहमीच चर्चा होते; पण त्यांची ध्येयधोरणे आज अंमलात आणण्याच्या कालसुसंगततेचा उल्लेख क्वचितच होतो. त्या वाटेने जायचे तर एका व्यापक कृतिशील जनसंवादाबरोबरच खंवीर कृतिशीलतेची आज खरी गरज आहे.