शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
4
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
5
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
6
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
7
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
8
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
9
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
10
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
11
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
12
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
13
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
14
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
15
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
17
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
18
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
19
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
20
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:58 IST

शिवछत्रपतींचे पाय धरावेत आणि त्यांचे बोटही पकडावे, कारण...संपत्तीची लालसा आणि पराकोटीची विषमता अशा 'आजच्या' प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी छत्रपती शिवरायांची ध्येयधोरणे मार्गदर्शक ठरतात!

प्रा.डॉ.नितीन बाबर, अर्थशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा, भविष्यवेधी द्रष्टा, सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून अद्वितीय कार्य केले आहे. शिवाजी महाराजांनी जगाला केवळ स्वराज्याचं राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्यनिष्ठेचा हुंकार जागृत करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. जागतिकीकरण, बाजारीकरण, सत्तास्पर्धा यातून वाढलेली संपत्तीची लालसा व पराकोटीची विषमता अशा 'आजच्या' प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवाजी महाराजांची ध्येयधोरणे मार्गदर्शक ठरतात.

शेती, पर्यावरण याविषयी महाराजांनी नेहमीच उदात्त दृष्टिकोन ठेवला, महाराजांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यव्यवस्था निर्माण केली. काटेकोर जलव्यवस्थापन, शेतसारा माफी, सवलती, समृद्धी, कृषी व्यवस्थापनातून लोककल्याणाची हमी दिली. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारुन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. आज शेतीची अवस्था काय आहे? एकीकडे बोगस बी-बियाणे, खते, औषधे, कृषी खात्यातील सावळा गोंधळ, पीकविमा कर्जमाफी-अनुदान वाटपातले गैरव्यवहार; आणि दुसरीकडे शहरकेंद्रित स्मार्ट विकासाच्या नादात ग्रामीण भागाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष! म्हणून शिवरायांच्या कृषीविषयक धोरणाचा फेरविचार आज कालसुसंगत ठरतो.

शिवाजी महाराजांनी उद्योगांच्या संरक्षणाबरोबरच व्यापाराच्या वाढीसाठीही काळजी घेतली. हस्तउद्योग, कुटिरोद्योगपूरक धोरण स्वीकारून कारागीर, कास्तकार व शिलेदारांच्या माध्यमातून स्वयंनिर्भर अर्थकारणावर भर दिला, व्यापारवाढीसाठी उपाययोजना केल्या. राज्याचा कोषागार संपन्न असेल तर त्या प्रगती निश्चितच होते. लढाईमध्ये गनिमांकडून हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन मरगठ्ठा हा प्रगतीवर होता. 'स्वयंनिर्भर स्वराज्या 'चा तत्कालीन विचार आजच्या आत्मनिर्भरतेशी किती सुसंगत होता, हे लक्षात येते.

छत्रपती शिवरायांनी पर्यावरण आणि माणूस यांचे परस्परांशी असलेले नाते आणि अवलंबित्व ओळखले होते. 'गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई!' असा मंत्रच त्यांनी आपल्या आज्ञापत्रातून दिला. गडकोटांच्या परिसरात वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा या वृक्षांची लागवड करून स्वराज्य हे पर्यावरणपूरक कसे राहील याची सर्वतोपरी काळजी घेतली. आज विकासाच्या अमानुष हव्यासापोटी माणसाने आपल्याच पायावर कशी कुन्हाड मारून घेतली आहे हे उघड दिसते. महाराजांच्या गौरवशाली प्रयत्नांची आणि विचारांची एकमेव साक्ष असणाऱ्या गड-किल्ल्यांचे मूळ स्वरूपातजतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे राजेपण हे कोणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नव्हते. त्यांनी 'स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य।' अशी भावना जागृत करून तुकड्या-तुकड्यांत विखुरलेल्या समाजात सर्वांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेच्या समान संधी देणाऱ्या लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या कार्यकौशल्याची नेहमीच चर्चा होते; पण त्यांची ध्येयधोरणे आज अंमलात आणण्याच्या कालसुसंगततेचा उल्लेख क्वचितच होतो. त्या वाटेने जायचे तर एका व्यापक कृतिशील जनसंवादाबरोबरच खंवीर कृतिशीलतेची आज खरी गरज आहे.