शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

विशेष लेख: इंदिरा गांधींच्या पावलांवर मोदींचे पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 10:20 IST

Narendra Modi: ‘मी गरिबी हटवू इच्छिते आणि विरोधक मला हटवू इच्छितात’, असे इंदिराजी म्हणाल्या होत्या; मोदीही त्याच मार्गाने विरोधकांशी लढण्यास निघाले आहेत!

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली)आपल्याला कोंडीत पकडणाऱ्या विरोधी पक्षांशी वागताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घालून दिलेल्या मार्गावरून जाताना दिसतात. मोदींना विरोध करणाऱ्यांपैकी बहुसंख्य राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या कडव्या विरोधात असले तरी  लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐक्य घडविण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध कामराज, अतुल्य घोष, नीलम संजीव रेड्डी, स. का. पाटील आणि इतरांनी सिंडिकेट केली होती, याची आठवण व्हावी असे काहीतरी सध्या घडते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांच्या घेराबंदीतून इंदिराजींनी आपली सुटका करून घेतली. याच मंडळींनी त्याना १९६६ मध्ये इंदिराजींना पंतप्रधानपदावर बसवले होते. नंतर त्यांना त्या ‘गुंगी गुडिया’ वाटू लागल्या. ही सिंडिकेट आणि त्याबरोबरच  भारतीय जनसंघ, स्वतंत्र पार्टी आणि इतर विरोधी पक्षांना जेरीस आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या आणि लोकसभा निवडणूक वर्षभरासाठी अलीकडे ओढली. ‘मी गरीबी हटवू इच्छिते आणि हे (म्हणजे विरोधक) मात्र मला हटवू इच्छितात’ अशी त्यांची घोषणा होती. लोकसभा निवडणुकीत या घोषणेने जादू केली. ५२१ पैकी ३५२ जागा इंदिराजींनी जिंकल्या.

पंतप्रधान मोदी  इंदिरा गांधी यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. ‘मी देशातला भ्रष्टाचार हटवू पाहतो, तर विरोधी पक्ष मला हटवण्यासाठी एकत्र येत आहेत’, असे म्हणून मोदी विरोधकांसमोर दोन हात करायला उभे ठाकले आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढण्याची त्यांची इच्छा आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत थोडीसुद्धा कसर राहता कामा नये, असे त्यांनी सीबीआय, ईडी आणि इतर संस्थांना सांगितले आहे. एक गमतीची गोष्ट इथे मुद्दाम नोंदवली पाहिजे. आपल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये मोदी यांनी कधीही इंदिरा गांधी यांचे नाव घेतलेले नाही. नेहरू, राजीव आणि इतरांवर मात्र ते सातत्याने कडवे हल्ले चढवत आले आहेत.

पोलिस चकमकीची कहाणीउत्तर प्रदेशमध्ये पोलिस चकमकीत ठार झालेल्यांच्या संख्येने एक नवा विक्रम प्रस्थापित केल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रकाशझोतात आले आहेत. मार्च २०१७ मध्ये ते सत्तेवर आल्यानंतर राज्यात १०,९०० हून अधिक पोलिस चकमकी झडल्या. २३,३०० संशयित गुन्हेगारांना अटक झाली. ५०४६ जखमी झाले आणि १८५ मारले गेले. योगी अजूनही स्वस्थ बसलेले नाहीत. किंबहुना त्यांनी विधानसभेत गर्जना केली, ‘माफियांना आम्ही धूळ चारणारच’ परंतु अतीक अहमद आणि त्याच्या भावाला इस्पितळाच्या आवारात टीव्ही वाहिन्यांचे कॅमेरे रोखलेले असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले; यावरून येणारा काळ किती कठीण आहे याची झलक पाहायला मिळते. भाजप श्रेष्ठी या घडामोडींकडे बारकाईने लक्ष देत आहेत. या चकमकीवरून कोर्टबाजी होऊ शकते, हे लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय मात्र गप्प आहे. माफियांना संपवण्यासाठी या मार्गाने जाणारे योगी हे काही पहिले मुख्यमंत्री नाहीत: १९९० नंतरच्या भारतीय इतिहासात बनावट चकमकींची भरपूर उदाहरणे सापडतात. १९९३ ते २००९ या काळात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने खोट्या चकमकींची २५६० प्रकरणे नोंदवून घेतली. २००० ते २०१७ या काळात ही संख्या १७८२ इतकी कमी झाली होती. त्यापैकी १२२४ खोट्या चकमकी होत्या. १९९० च्या दशकात  गुन्हेगारी जगताचे बस्तान उखडून टाकण्यासाठी मुंबई पोलिसांनी चकमकींचा धडाका लावला होता. थोड्याच अवधीत हे लोण पंजाबसह इतर राज्यांत पोहोचले. ९० च्या दशकात पंजाबमधील दहशतवाद मोडून काढण्यासाठी सुपरकॉप केपीएस गिल यांनीही याच मार्गाचा अवलंब केला.त्यावेळी मुंबईचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांना पंजाबात मुद्दाम पाठवण्यात आले. त्यांनी ‘बंदुकीच्या गोळीला उत्तर गोळीनेच’ देण्याचे धोरण अवलंबिले. त्यानंतर गिल यांनी ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी केले. राजस्थान , आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा चकमकी झाल्या, असे मानवी हक्क आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. खुर्शीद विजनवासातून बाहेर? मागच्या लोकसभा निवडणुकीत सलमान खुर्शीद पराभूत झाले आणि राजकीय विजनवासातच गेले.  अचानक एका भल्या सकाळी ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बसलेले दिसले. राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर काही नेतेही उपस्थित होते. विरोधी पक्षांमध्ये ऐक्य घडवण्यासाठी नितीशकुमार आणि काँग्रेस पक्षातील ती पहिली औपचारिक बैठक होती; परंतु या बैठकीला खुर्शीद यांना का बोलावण्यात आले? - असे म्हणतात की खरगे यांनी खुर्शीद यांना बैठकीला बोलावले. एके काळी खुर्शीद आणि नितीश कुमार यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचे समजते. कदाचित खरगे यांना त्याचा उपयोग बिहारच्या संदर्भात करून घ्यावयाचा असेल. गमतीची गोष्ट म्हणजे नितीशकुमार यांनीही उपस्थित नेत्यांना सांगितले की, २०१७ मध्ये सोनिया गांधींची भेट झाल्यानंतर जवळपास महिनाभर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आपल्याबरोबर काम करण्याची तयारी दाखवील याची वाट आपण पाहिली; परंतु कोणताही प्रतिसाद न आल्याने पुन्हा भाजपच्या गोटात जाण्यावाचून  गत्यंतर उरले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारत