शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 22, 2025 07:46 IST

दगडाला शेंदूर फासला आणि तो एखाद्या चौकात ठेवला की त्याचे मंदिर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकदा का आपण निवडून आलो की आपण देव झालाे म्हणून समजा. मग आपल्या निर्णयाचे राजे..!

-अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)

कार्यकर्त्यांनो,नमस्कार.काल आपल्या दोन नेत्यांच्या दोन सभा मुंबईत पार पडल्या. एकाने ‘कम ऑन, किल मी’ असे सांगितले. दुसऱ्याने ‘मरे हुए को क्या मारना’ असे प्रत्युत्तर दिले. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची ही नांदी आहे. दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटले आहेत. तुम्हीही एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहा. हीच ती वेळ, हाच तो क्षण हे पक्के मनात बिंबवून घ्या. आमचे मित्र कवी, अरविंद जगताप यांना त्यांनीच लिहिलेल्या गाण्यात पडलेले प्रश्न तुम्हाला पडू देऊ नका.

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…साचले मोहाचे धुके घनदाट हो …आपली माणसं, आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीतीविठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती..!

असले प्रश्न तुम्हाला पडण्याचे कारण नाही. आपल्यापुढे दोन शिवसेना आहेत. जो आपल्या विकासासाठी म्हणजेच वॉर्डाच्या विकासासाठी विकास निधी देईल त्याचा झेंडा बिनधास्त खांद्यावर घ्या. एकाने दिलेल्या विकास निधीपेक्षा दुसरा जास्त निधी देत असेल तर तोही पर्याय स्वीकारायला मागे पुढे बघू नका. शेवटी ‘स्व-विकास’ महत्त्वाचा. यांनी केला काय आणि त्यांनी केला काय..? भाजपच्या कार्यालयात ठळकपणे एक पाटी लावलेली असायची. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या वाक्याचे भाजपमध्ये काय झाले हे त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्याकडेही हल्ली, आधी इतरांना निवडून आणण्याची क्षमता, नंतर पक्ष सांगेल ते ऐकण्याची १००% तयारी आणि शेवटी पक्ष देईल त्यात समाधान मानण्याची वृत्ती... हे गुण आत्मसात करणाऱ्यांना पक्षप्रवेश दिले जात आहेत. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने तुम्हाला याची खात्री पटली असेलच. पण तो भाजपचा प्रश्न आहे. आपला प्रश्न सध्या कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा हा आहे...!

आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता…पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता…असं लिहायला अरविंद जगताप यांना काय जाते? मतदारसंघ टिकवणे, पक्ष चालवणे, स्वतःचे दुकान नीटनेटके करणे, यासाठी किती कष्ट करावे लागतात हे त्यांना कळणार नाही? ज्यांच्या पालख्या वाहिल्या ते देवासह पालखी सुद्धा घेऊन गेले. तेव्हा आता माथेफोडी करण्यात काहीही अर्थ नाही. 

२०१७ नंतर कधी नव्हे ते महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. तेव्हा ही सुवर्णसंधी भलते सलते विचार डोक्यात आणून घालवू नका. जो आपल्याला तिकीट देईल, जो आपल्या निवडणुकीचे ‘मॅनेजमेंट’ नीट हाताळेल, गांधी विचारांवर श्रद्धा ठेवून आपल्याला ज्याच्याकडून जास्तीत जास्त ‘गांधीजींचे फोटो’ मिळतील... तो आपला नेता..! त्याच्यात आपला देव बघावा. उगाच ‘दगडात माझा जीव होता’ म्हणण्याचे दिवस कधीच संपले आहेत. 

दगडाला शेंदूर फासला आणि तो एखाद्या चौकात ठेवला की त्याचे मंदिर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकदा का आपण निवडून आलो की आपण देव झालाे म्हणून समजा. मग आपल्या निर्णयाचे राजे..! निवडून आल्यानंतर आपण कोणत्या पक्षाकडून निवडून आलो आणि कोणत्या पक्षासोबत सत्तेत सहभागी झालो याचे लोकांना काहीही घेणेदेणे नसते. तसे असले तरीही ते, ‘तुम्ही असे का केले?’ असे विचारू शकत नाहीत. त्यांना तो अधिकार नाही. त्यांनी त्यांचे ‘मत’ देताना त्याचे योग्य ते ‘दान’ आपल्याकडून घेतले आहे हे पक्के लक्षात ठेवा.

अरविंद जगताप यांनी एक मात्र खरे लिहून ठेवले आहे. त्याबद्दल त्यांचे थाेडे काैतुक करु. बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं उभ्या उभ्या संपून जाई…अळ रीत रीत माझं बघुनी उमगलं कुंपण इथ शेत खायी…भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती तरी झेंडे एगळे, वेगळ्या जातीसत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीतीविठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती..?

जर आता आपण काही हालचाल केली नाही आणि कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक पदाची माळ गळ्यात घालून घेतली नाही तर आपले जगणे बुजगावण्यासारखे होईल. वाया जाईल. आपल्याला जर पद मिळाले नाही तर आपली अवस्था ‘घर का, ना घाट का’ होईल. घरचेदेखील आपल्याला विचारणार नाहीत. सत्तेचीच भक्ती आणि सत्तेचीच प्रीती हे शंभर नंबरी सत्य सांगितल्याबद्दल, आपण निवडून आल्यावर लगेचच या कवीचा शिवाजी पार्कवर सत्कार करू. म्हणजे त्यांनाही भविष्यात अशी गाणी लिहिण्याची प्रेरणा मिळेल.

त्यामुळे येत्या निवडणुकीत कोण कोणाला मारणार आणि कोण कोणाला सोडून देणार याचा फैसला होईल तेव्हा होईल. आपण मात्र विजयी व्हायला हवे. शिवसेना संपवण्यासाठी केलेली खेळी दोन्ही शिवसेनेला बळकट करेल की दोन्हीपैकी एक शिवसेना संपून जाईल? याचे उत्तर शाेधण्याच्या भानगडीत पडू नका. ते काम विचारवंत करतील. महाराष्ट्राची संस्कृती एकदम भारी आहे. मरण्या मारण्याची भाषा आपल्याला इतिहासकालीन भेट आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत प्रत्येकाने असेच एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहा. पुन्हा सांगतो, ही अखेरची संधी आहे. एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप करा. एकमेकांचे कपडे फाडा. काय करायचे ते करा. जो पक्ष तिकीट देईल त्याचे तिकीट घ्या. पण निवडून या. नंतरचे नंतर बघू... 

जाता जाता : शक्य झाले तर निवडणुकीला उभे राहणाऱ्या प्रत्येकाने दोन - पाच ॲम्बुलन्सचे बुकिंग आत्ताच करून ठेवा. कधी, कुठे, कशी गरज पडेल सांगता येणार नाही. तुम्हाला शुभेच्छा.- तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण