शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय?

By अतुल कुलकर्णी | Updated: August 11, 2024 07:25 IST

कॉम्रेड एकमेकांना भेटले की, लाल सलाम म्हणतात... आपल्या पक्षात एकमेकांना भेटले की, आता गुलाबी सलाम म्हणायचे आदेश निघाल्याचे वृत्त आहे.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

अजितदादा, गुलाबी सलाम..!

गावाकडे एकमेकांना भेटले की, लोक रामराम म्हणतात... कॉम्रेड एकमेकांना भेटले की, लाल सलाम म्हणतात... आपल्या पक्षात एकमेकांना भेटले की, आता गुलाबी सलाम म्हणायचे आदेश निघाल्याचे वृत्त आहे... हे खरे की खोटे त्या पीआर एजन्सीला विचारून सांगितले तर बरे होईल... म्हणजे आम्ही पण तुम्हाला गुलाबी सलाम म्हणत जाऊ... नाहीतरी तुम्ही जी यात्रा काढली आहे, त्यासाठीची बस गुलाबी रंगाची आहे..! तुमचे जाकीटही गुलाबी रंगाचे आहे... (याआधीदेखील गुलाबी गँगबद्दलची माहिती मी आपल्याला पत्राने कळवली होतीच) अशा गुलाबी गुलाबी वातावरणात आपली यात्रा सुरू आहे; पण अजूनही आपले काही नेते गुलाबी जाकीट वापरत नाहीत. त्यांना जरा योग्य ती समज तुम्ही द्यालच... असो. मुद्दा तो नाही. 

परवा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात आपण जी फटकेबाजी केली, त्यावरून सर्वत्र चर्चा रंगली आहे. “मला मुख्यमंत्री करणार असे सांगितले असते, तर मी अख्खा पक्ष घेऊन आलो असतो...” असे आपण त्या कार्यक्रमात सांगितले; पण त्यामुळे प्रश्नांचा गुंता अजूनच वाढला आहे. आपण जेव्हा भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी आपल्या सोबत सगळा पक्ष नव्हता का..? पक्षाच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिल्याचे पत्र आपल्या सोबतच होते. तेच पत्र आपण तत्कालीन राज्यपालांना दिले होते. त्याच्या आधारेच आपल्याला उपमुख्यमंत्रिपद देऊ केले होते. मग त्याचवेळी आपण मुख्यमंत्रिपद का मागितले नाही? ते तुम्हाला दिले गेले नसते..? की देणारच नव्हते..? की आपल्या यादीतले आमदार प्रत्यक्षात सोबत येतील की नाही, याची भाजपला खात्री नव्हती..? हे सगळे प्रश्न पुन्हा नव्याने निर्माण झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपण शपथ घेतली आणि काही तासांत काकांनी अशी काही खेळी केली की, आपण व्हिलन झालात. काकांनी आपले कथित बंड तोडूनमोडून टाकले.

एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तसे झाले नाही. ते एकदा बाहेर पडले ते मागे वळून बघणार नाही या जिद्दीने..! त्याचा त्यांना फायदाही झाला. आपणही अशीच टोकदार भूमिका घेतली असती तर, आपल्यालाही त्याचा फायदा झाला नसता का..? ‘मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो,’ या विधानावर त्या दिवशी ठाण्यातल्या सभागृहात हशा पिकला... टाळ्या वाजल्या... मात्र त्या आपल्या विधानावर होत्या की, आपल्या फसलेल्या बंडासाठी होत्या? याचीही नंतर चर्चा रंगली होती. हे आपल्याला माहिती असावे म्हणून सांगून ठेवतो... त्याच कार्यक्रमात आपण ज्येष्ठतेचा मुद्दा उपस्थित केला. आपण १९९० च्या बॅचचे, तर फडणवीस १९९९ च्या बॅचचे...  एकनाथ शिंदे २००४ च्या बॅचचे... असे आपण सांगितले. ज्येष्ठता यादी बाजूला सारून शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आपण त्यांच्याच सरकारमध्ये तिसऱ्या नंबरवर आलात... खरे तर आपण हे बोलायला हवे होते का? त्यावरूनही आपल्याच पक्षात उलटसुलट चर्चा सुरू आहे. असे सांगून आपण आपली अगतिकता, हतबलता तर व्यक्त केली नाही ना...

तरी आपले परममित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू सांभाळून धरली. “अजित पवार आमच्यापेक्षा ज्येष्ठ असले तरी, त्यांचा आणि माझा विक्रम कोणीच मोडू शकणार नाही. मी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री, अशी तिन्ही पदे भूषवली. अजित पवार यांनी एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी पदे भूषविली,” असे सांगून त्यांनी वातावरण बदलण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असली तरी आपल्याला सहयोगी संपादक करा असा सल्ला फडणवीस यांनी का दिला, याचे उत्तर मिळाले नाही. याचा अर्थ यापुढेही आपण कायम सहयोगी, उप... अशीच पदे भूषवणार असे तर त्यांना सांगायचे नसेल..? मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र “हे पुस्तक म्हणजे आपल्या आयुष्याचा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है..” असा सिक्सर मारला..! तोही तुम्हा दोघांच्या समोर..!! यातून काय ते समजून घ्यायला हवे, असे आपल्या पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांना वाटत आहे...

सध्या आपला दौरा सुरू आहे. परवा आपण कांद्याच्या प्रश्नावरून माफी मागितली. माफी मागतानाचा आपला टोन नम्रतेचा नव्हता, तर त्यात एक ठसका होता. अशी कुठे माफी असते का? असेही काही शेतकरी तिथे भाकरी, ठेचा, कांदा खाताना बोलत होते. 

जाता जाता : आपल्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते तिथे खासगीत सांगत होते. ते आपल्याला माहिती असावे म्हणून सांगून ठेवतो... पीआर एजन्सीच्या सल्ल्याने सत्ता मिळाली असती तर आतापर्यंत अशा एजन्सीजनी त्यांना हवे त्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले असते... आणि पैशाने सत्ता मिळाली असती तर बडे उद्योगपती कधीच मुख्यमंत्री झाले असते. आपल्याएवढी ग्रामीण महाराष्ट्राची नस माहिती असलेला नेता दुसरा नाही. ती नस आपण बरोबर ओळखा आणि काम सुरू करा... मग बघा, यश हात जोडून तुमच्या पुढे येईल. हे मनापासून सांगतोय...

- तुमचाच बाबूराव

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस