शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

विशेष लेख: अब की बार किसकी सरकार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 11:52 IST

Modi US Visit: पाकिस्तान-चीन- रशिया आणि सौदी अरेबिया चीन- इराण या नव्या समीकरणामुळे जागतिक राजकारणात मूलभूत बदल होत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक राजकारणात अमेरिका एकाकी पडत चालली आहे. अशा वेळी भारतासारखा देश आपल्यासाठी आवश्यक आहे, असा विचार करूनच अमेरिकेकडून मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. मुद्दा आहे तो अमेरिकेच्या या हतबलतेचा उपयोग आपण आपल्या राष्ट्रीय हितासाठी करण्यात यशस्वी झालो का?

- डॉ. रोहन चौधरी(आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक) 

अखेर मोदी आणि बायडेन अ यांच्या औपचारिक प्रतीक्षा संपली. उभय नेत्यांनी बऱ्याचदा विविध जागतिक मंचावर परस्परांशी संवाद साधला असला तरी त्यात द्विपक्षीय संबंधातील औपचारिकतेचा अभाव होता. बिल क्लिंटन यांच्यापासून ते ट्रम्प यांच्यापर्यंत आणि नरसिंह राव ते मोदी यांच्यापर्यंत सुरू झालेली प्रथा यावेळी खंडित होते की काय अशी शंका होती. परंतु उशिरा का होईना मोदींचा औपचारिक अमेरिका दौरा संपन्न झाला. २०२१ पासून जो बायडेन यांनी आपल्या १३ आंतरराष्ट्रीय दौऱ्यात १९ देशांना भेटी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांसोबत वार्तालाप करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इतका विलंब का केला? भारत-अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध कितीही सौहार्दाचे असले तरी बायडेन आणि मोदी यांचे संबंध तितके सलोख्याचे राहिले नाहीत. मोदी यांनी जाहीर भाषणात 'अब की बार ट्रम्प सरकार' म्हणून ट्रम्प यांची केलेली पाठराखण आणि बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाने भारताच्या अंतर्गत लोकशाहीविषयी व्यक्त केलेली चिंता यामुळे बायडेन आणि मोदी यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच तणावपूर्ण राहिले आहेत.

जागतिक राजकारणाला दोन्ही देशांच्या संबंधाची गरज होती तेव्हाच त्यांच्यातील मतभेद वरचढ ठरले. परिणामी, क्लिंटन- वाजपेयींच्या काळात 'नैसगिक भागीदारी पासून सुरू झालेला हा प्रवास 'कृत्रिम भागीदारी पर्यंत येऊन पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर मोदी यांना आमंत्रण देण्याची बायडन यांना झालेली उपरती ही गेल्या वर्षभरात जागतिक राजकारणात झालेल्या बदलांची परिणती आहे. आत्तापर्यंत अमेरिकेला चीन या देशाकडून आव्हान मिळत होते, आता देशांच्या समूहाकडून आव्हान मिळत आहे. पाकिस्तान-चीन- रशिया आणि सौदी अरेबिया चीन-इराण या नव्या समीकरणामुळे जागतिक राजकारणात मूलभूत बदल होत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक राजकारणात अमेरिका एकाकी पडत चालली आहे. अशावेळी भारतासारखा देश आपल्यासाठी आवश्यक आहे, असा विचार करूनच अमेरिकेकडून मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. परराष्ट्र धोरणातील हा लवचीकपणा अमेरिकेचे सामर्थ्य आहे. मुद्दा आहे तो अमेरिकेच्या या हतबलतेचा उपयोग आपण आपल्या राष्ट्रीय हितासाठी करण्यात यशस्वी झालो का?

मोदींच्या या औपचारिक दौऱ्यात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रभावशाली सिनेट सदस्य बनीं सैंडर्स यांच्यासह ७५ अमेरिकन डेमोक्रेट सदस्यांनी भारतातील मानवी अधिकाराचा प्रश्न मोदी यांच्यासमोर उपस्थित करण्याचा बायडेन यांना केलेला आग्रह हा बायडेन यांच्याकडून मोदींना खिंडीत पकडायचा प्रयत्न होता. अमेरिका कितीही उदारमतवादी देश असला तरी विदेशी दौऱ्यात अंतर्गत प्रश्न विचारायचे नसतात इतका संकेत पाळणे अपेक्षित होते.

बायडेन यांच्या मुकसमंतीशिवाय हे घडणे अशक्य आहे. या मुद्दयावर जाहीर निदर्शने, बहिष्कार याची वारेमाप प्रसिद्धी देऊन आपल्याला भारताची गरज आहे हे वास्तव लपविण्याचा प्रयत्न केला. द्विपक्षीय संबंधाइतकेच महत्त्व जागतिक मूल्यांना आमचा पक्ष देतो हा संदेश अमेरिकेतील, भारतातील व जगातील उदारमतवाद्यांना देण्यास बायडेन यशस्वी ठरले. परिणामी, मोदी यांनी भारत कसा लोकशाही देश आहे हे अमेरिकेच्या व्यासपीठावरून जगाला ठणकावून सांगितले.

अमेरिका-भारत मैत्रीत चीन कळीचा मुद्दाअमेरिका आणि भारत यांना जोडणारा चीन हा कळीचा मुद्दा असून, चीनच्या विरोधात ठोस काही भारताच्या हाती लागणार नाही याची बायडेन यांनी आधीच तजवीज केली होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री याचा चीन दौरा नेमक्या त्याच काळात आयोजित करून अमेरिकेने भारताला सूचक संदेश दिला. प्रसंगी अमेरिका- चीनमधील तणाव द्विपक्षीय परस्पर संवादाने सोडविला जाईल, त्यासाठी भारताची आम्हाला गरज नाही उलट भारत-चीन प्रश्न सोडविण्यासाठी भारतालाच अमेरिकेची गरज आहे हा संदेश बायडेन यांच्याकडून अधोरेखित करण्यात आला. गेल्या काही वर्षात भारतीय सीमेवर चीनकडून घडलेल्या आगळिकीविरोधात एकही शब्द न काढता हिंद-प्रशांत महासागर या अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यावर चीनवर आसूड ओढण्यात आले.

उभय देशात जवळीक, पण तरी सुरक्षित अंतर?या दोन्ही कृतीद्वारे अमेरिकेला भारताची कितीही गरज असली तरी मोदी यांनी आपल्या अगतिकतेचा फायदा घेऊ नये अशी तजवीज चायडेन यांच्याकडून करण्यात आली. दम्य याची प्रतिमा जगभरात कितीही खराब असली तरी भारताच्या जागतिक भूमिकेबद्दल त्यांना तिळमात्र शंका नव्हती. याउलट बायडेन याची प्रतिमा कितीही चांगली असली तरी डझनभर द्विपक्षीय करार करूनदेखील बायडेन यांनी मोदी यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले हे नाकारता येणार नाही. मोदीनादेखील याची जाणीव झाली असणारच. म्हणूनच आपल्या मागच्या दौयात अब की बार ट्रम्प सरकार असे जाहीरपणे म्हणणारे मोदी यांनी 'अब की बार बायडेन सरकार असे म्हटले नाही यातच सर्व काही आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतUnited Statesअमेरिका