शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: अब की बार किसकी सरकार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 11:52 IST

Modi US Visit: पाकिस्तान-चीन- रशिया आणि सौदी अरेबिया चीन- इराण या नव्या समीकरणामुळे जागतिक राजकारणात मूलभूत बदल होत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक राजकारणात अमेरिका एकाकी पडत चालली आहे. अशा वेळी भारतासारखा देश आपल्यासाठी आवश्यक आहे, असा विचार करूनच अमेरिकेकडून मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. मुद्दा आहे तो अमेरिकेच्या या हतबलतेचा उपयोग आपण आपल्या राष्ट्रीय हितासाठी करण्यात यशस्वी झालो का?

- डॉ. रोहन चौधरी(आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक) 

अखेर मोदी आणि बायडेन अ यांच्या औपचारिक प्रतीक्षा संपली. उभय नेत्यांनी बऱ्याचदा विविध जागतिक मंचावर परस्परांशी संवाद साधला असला तरी त्यात द्विपक्षीय संबंधातील औपचारिकतेचा अभाव होता. बिल क्लिंटन यांच्यापासून ते ट्रम्प यांच्यापर्यंत आणि नरसिंह राव ते मोदी यांच्यापर्यंत सुरू झालेली प्रथा यावेळी खंडित होते की काय अशी शंका होती. परंतु उशिरा का होईना मोदींचा औपचारिक अमेरिका दौरा संपन्न झाला. २०२१ पासून जो बायडेन यांनी आपल्या १३ आंतरराष्ट्रीय दौऱ्यात १९ देशांना भेटी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांसोबत वार्तालाप करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इतका विलंब का केला? भारत-अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध कितीही सौहार्दाचे असले तरी बायडेन आणि मोदी यांचे संबंध तितके सलोख्याचे राहिले नाहीत. मोदी यांनी जाहीर भाषणात 'अब की बार ट्रम्प सरकार' म्हणून ट्रम्प यांची केलेली पाठराखण आणि बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पक्षाने भारताच्या अंतर्गत लोकशाहीविषयी व्यक्त केलेली चिंता यामुळे बायडेन आणि मोदी यांच्यातील संबंध सुरुवातीपासूनच तणावपूर्ण राहिले आहेत.

जागतिक राजकारणाला दोन्ही देशांच्या संबंधाची गरज होती तेव्हाच त्यांच्यातील मतभेद वरचढ ठरले. परिणामी, क्लिंटन- वाजपेयींच्या काळात 'नैसगिक भागीदारी पासून सुरू झालेला हा प्रवास 'कृत्रिम भागीदारी पर्यंत येऊन पोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर मोदी यांना आमंत्रण देण्याची बायडन यांना झालेली उपरती ही गेल्या वर्षभरात जागतिक राजकारणात झालेल्या बदलांची परिणती आहे. आत्तापर्यंत अमेरिकेला चीन या देशाकडून आव्हान मिळत होते, आता देशांच्या समूहाकडून आव्हान मिळत आहे. पाकिस्तान-चीन- रशिया आणि सौदी अरेबिया चीन-इराण या नव्या समीकरणामुळे जागतिक राजकारणात मूलभूत बदल होत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक राजकारणात अमेरिका एकाकी पडत चालली आहे. अशावेळी भारतासारखा देश आपल्यासाठी आवश्यक आहे, असा विचार करूनच अमेरिकेकडून मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. परराष्ट्र धोरणातील हा लवचीकपणा अमेरिकेचे सामर्थ्य आहे. मुद्दा आहे तो अमेरिकेच्या या हतबलतेचा उपयोग आपण आपल्या राष्ट्रीय हितासाठी करण्यात यशस्वी झालो का?

मोदींच्या या औपचारिक दौऱ्यात माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रभावशाली सिनेट सदस्य बनीं सैंडर्स यांच्यासह ७५ अमेरिकन डेमोक्रेट सदस्यांनी भारतातील मानवी अधिकाराचा प्रश्न मोदी यांच्यासमोर उपस्थित करण्याचा बायडेन यांना केलेला आग्रह हा बायडेन यांच्याकडून मोदींना खिंडीत पकडायचा प्रयत्न होता. अमेरिका कितीही उदारमतवादी देश असला तरी विदेशी दौऱ्यात अंतर्गत प्रश्न विचारायचे नसतात इतका संकेत पाळणे अपेक्षित होते.

बायडेन यांच्या मुकसमंतीशिवाय हे घडणे अशक्य आहे. या मुद्दयावर जाहीर निदर्शने, बहिष्कार याची वारेमाप प्रसिद्धी देऊन आपल्याला भारताची गरज आहे हे वास्तव लपविण्याचा प्रयत्न केला. द्विपक्षीय संबंधाइतकेच महत्त्व जागतिक मूल्यांना आमचा पक्ष देतो हा संदेश अमेरिकेतील, भारतातील व जगातील उदारमतवाद्यांना देण्यास बायडेन यशस्वी ठरले. परिणामी, मोदी यांनी भारत कसा लोकशाही देश आहे हे अमेरिकेच्या व्यासपीठावरून जगाला ठणकावून सांगितले.

अमेरिका-भारत मैत्रीत चीन कळीचा मुद्दाअमेरिका आणि भारत यांना जोडणारा चीन हा कळीचा मुद्दा असून, चीनच्या विरोधात ठोस काही भारताच्या हाती लागणार नाही याची बायडेन यांनी आधीच तजवीज केली होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री याचा चीन दौरा नेमक्या त्याच काळात आयोजित करून अमेरिकेने भारताला सूचक संदेश दिला. प्रसंगी अमेरिका- चीनमधील तणाव द्विपक्षीय परस्पर संवादाने सोडविला जाईल, त्यासाठी भारताची आम्हाला गरज नाही उलट भारत-चीन प्रश्न सोडविण्यासाठी भारतालाच अमेरिकेची गरज आहे हा संदेश बायडेन यांच्याकडून अधोरेखित करण्यात आला. गेल्या काही वर्षात भारतीय सीमेवर चीनकडून घडलेल्या आगळिकीविरोधात एकही शब्द न काढता हिंद-प्रशांत महासागर या अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यावर चीनवर आसूड ओढण्यात आले.

उभय देशात जवळीक, पण तरी सुरक्षित अंतर?या दोन्ही कृतीद्वारे अमेरिकेला भारताची कितीही गरज असली तरी मोदी यांनी आपल्या अगतिकतेचा फायदा घेऊ नये अशी तजवीज चायडेन यांच्याकडून करण्यात आली. दम्य याची प्रतिमा जगभरात कितीही खराब असली तरी भारताच्या जागतिक भूमिकेबद्दल त्यांना तिळमात्र शंका नव्हती. याउलट बायडेन याची प्रतिमा कितीही चांगली असली तरी डझनभर द्विपक्षीय करार करूनदेखील बायडेन यांनी मोदी यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवले हे नाकारता येणार नाही. मोदीनादेखील याची जाणीव झाली असणारच. म्हणूनच आपल्या मागच्या दौयात अब की बार ट्रम्प सरकार असे जाहीरपणे म्हणणारे मोदी यांनी 'अब की बार बायडेन सरकार असे म्हटले नाही यातच सर्व काही आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतUnited Statesअमेरिका