शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:07 IST

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला.

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला. विदर्भाला पाठ दाखवू नका. विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात होत असताना नाणारप्रश्नी कामकाज तीन दिवस ठप्प होते. आता पाच दिवस बाकी असताना तरी विदर्भातील प्रश्नांवर बोला! विदर्भाला गृहित धरणे सोडा. गृहित धरणारे पार साफ झाले हा इतिहास जुना नाही. वैदर्भीय जनता भोळी आहे पण मूर्ख नाही. यह पब्लिक है यह सब जानती है, हे लक्षात ठेवा. विदर्भात येऊन किती लोक विदर्भाच्या प्रश्नांवर बोलतात हे ती बरोबर पाहते. लगेच प्रतिक्रिया देत नाही. निवडणूक आली की कुणाला मतांचं व्हिटॅमिन द्यायचं अन् कुणाला जमालगोटा द्यायचा याचा हिशेब बरोबर करते. ही गृहित धरल्याची फळं काँग्रेस भोगतेय पण सुधरायला तयार नाही. एकेकाळी काँग्रेसचा हा गड होता. इंदिराजींना विदर्भाने ताकद दिली. आज इथले काँग्रेसचे नेते त्यांची ताकद एकमेकांना लंबे करण्यासाठी वापरत आहेत. काँग्रेसला डायबिटीज झालाय अन् नेते रसगुल्ले खात आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांचा दबाव गट पूर्वी होता. मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना धडकी भरायची. आता प्रत्येक जण आपापले दुकान चालवतो.एक काळ असा होता की शिवसेनेचा पश्चिम विदर्भात बोलबाला होता. आता तो राहिला नाही. नाही म्हणायला मोदी कृपेने निवडून आलेले चार खासदार अन् स्वबळावर लढून जिंकलेले चार आमदार आहेत. मुंबई-कोकणाशिवाय शिवसेनेचे प्रेम पुढे सरकत नाहीे. त्यामुळे नागपुरात अधिवेशन असतानाही शिवसेनेच्या आमदारांना नाणारचा विषय महत्त्वाचा वाटतो. विदर्भात आपण चारवर का आलो याचा धडा घ्यावासा वाटत नाही. शिवसेनेपेक्षाही वाईट परिस्थिती राष्ट्रवादीची आहे. मनोहर नाईक हे अख्ख्या विदर्भात पक्षाचे एकच आमदार आहेत. सभागृहात येण्याची त्यांना गरज वाटत नाही. मंत्री असतानाच नाही यायचे तर आता काय येणार ?नाणार हा एकच प्रश्न उरल्यासारखे वातावरण तयार केले जात आहे. विदर्भात कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. बोंडअळीने कापसाचे पार नुकसान केले. पावसाचा लहरीपणा सुरूच आहे.पीककर्ज मिळत नसल्याच्या अनेक शेतकºयांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या मुद्यांवर सर्वपक्षीय आमदार कधी बोलतील याची प्रतीक्षा आहे. मात्र, आमदार टीडीआर, एफएसआय, एसआरएवर प्रश अन् लक्षेवधी देत सुटले आहेत. त्यात मुंबईचेच नाही तर विदर्भ, मराठवाड्यातील आमदारदेखील आहेत. अरे बाबांनो! बिल्डरांशी दोस्ती करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले आहे का? मुख्यमंत्री अन् काही पॉवरफुल मंत्री विदर्भाचे आहेत म्हणून इथले सगळे प्रश्न सुटले असे थोडीच याची दरक्षणी जाणीव भाजपाला असली पाहिजे. विरोधकांच्या गोंधळाआड सरकारचे अपयश लपवण्याची खेळी कुणी खेळता कामा नये.- यदु जोशी

टॅग्स :nagpurनागपूरNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प