शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

विदर्भावर बोला, विदर्भाला गृहित धरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 00:07 IST

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला.

विदर्भात आले आहात मग विदर्भावर कधी बोलणार?, नाणार, नाणारच करणार का? या भागाचे काही प्रश्न असतील तर सोमवारपासून त्यावर बोला. विदर्भाला पाठ दाखवू नका. विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात होत असताना नाणारप्रश्नी कामकाज तीन दिवस ठप्प होते. आता पाच दिवस बाकी असताना तरी विदर्भातील प्रश्नांवर बोला! विदर्भाला गृहित धरणे सोडा. गृहित धरणारे पार साफ झाले हा इतिहास जुना नाही. वैदर्भीय जनता भोळी आहे पण मूर्ख नाही. यह पब्लिक है यह सब जानती है, हे लक्षात ठेवा. विदर्भात येऊन किती लोक विदर्भाच्या प्रश्नांवर बोलतात हे ती बरोबर पाहते. लगेच प्रतिक्रिया देत नाही. निवडणूक आली की कुणाला मतांचं व्हिटॅमिन द्यायचं अन् कुणाला जमालगोटा द्यायचा याचा हिशेब बरोबर करते. ही गृहित धरल्याची फळं काँग्रेस भोगतेय पण सुधरायला तयार नाही. एकेकाळी काँग्रेसचा हा गड होता. इंदिराजींना विदर्भाने ताकद दिली. आज इथले काँग्रेसचे नेते त्यांची ताकद एकमेकांना लंबे करण्यासाठी वापरत आहेत. काँग्रेसला डायबिटीज झालाय अन् नेते रसगुल्ले खात आहेत. विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांचा दबाव गट पूर्वी होता. मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना धडकी भरायची. आता प्रत्येक जण आपापले दुकान चालवतो.एक काळ असा होता की शिवसेनेचा पश्चिम विदर्भात बोलबाला होता. आता तो राहिला नाही. नाही म्हणायला मोदी कृपेने निवडून आलेले चार खासदार अन् स्वबळावर लढून जिंकलेले चार आमदार आहेत. मुंबई-कोकणाशिवाय शिवसेनेचे प्रेम पुढे सरकत नाहीे. त्यामुळे नागपुरात अधिवेशन असतानाही शिवसेनेच्या आमदारांना नाणारचा विषय महत्त्वाचा वाटतो. विदर्भात आपण चारवर का आलो याचा धडा घ्यावासा वाटत नाही. शिवसेनेपेक्षाही वाईट परिस्थिती राष्ट्रवादीची आहे. मनोहर नाईक हे अख्ख्या विदर्भात पक्षाचे एकच आमदार आहेत. सभागृहात येण्याची त्यांना गरज वाटत नाही. मंत्री असतानाच नाही यायचे तर आता काय येणार ?नाणार हा एकच प्रश्न उरल्यासारखे वातावरण तयार केले जात आहे. विदर्भात कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. बोंडअळीने कापसाचे पार नुकसान केले. पावसाचा लहरीपणा सुरूच आहे.पीककर्ज मिळत नसल्याच्या अनेक शेतकºयांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या मुद्यांवर सर्वपक्षीय आमदार कधी बोलतील याची प्रतीक्षा आहे. मात्र, आमदार टीडीआर, एफएसआय, एसआरएवर प्रश अन् लक्षेवधी देत सुटले आहेत. त्यात मुंबईचेच नाही तर विदर्भ, मराठवाड्यातील आमदारदेखील आहेत. अरे बाबांनो! बिल्डरांशी दोस्ती करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले आहे का? मुख्यमंत्री अन् काही पॉवरफुल मंत्री विदर्भाचे आहेत म्हणून इथले सगळे प्रश्न सुटले असे थोडीच याची दरक्षणी जाणीव भाजपाला असली पाहिजे. विरोधकांच्या गोंधळाआड सरकारचे अपयश लपवण्याची खेळी कुणी खेळता कामा नये.- यदु जोशी

टॅग्स :nagpurनागपूरNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प