शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मी काय घोडं मारलंय? - इच्छा माझी पुरी करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:12 IST

टोपी घातलेले काक महाशय फुरंगटून म्हणाले,  ‘कधीतरी माझ्याही इच्छेचा विचार करावा. राजकीय नेत्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, माझ्या का नाही?’

सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर

इंद्र दरबारात भलता सन्नाटा पसरलेला. काही जण गोंधळलेले तर काही जण दचकलेले. विचारमग्न इंद्र महाराजांनी चुटकी वाजवताच क्षणार्धात नारदमुनी दरबारात हजर झाले. 

एवढं गंभीर वातावरण पाहून तेही दचकले. ‘मुनी.. भूतलावर हे पंधरा दिवस कावळ्यांचे घाटावरच्या मिष्टान्न भोजनावर मनसोक्त ताव मारण्याचे असतात. तरीही एक कावळा म्हणे कशाला स्पर्श करायला तयार नाही. त्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, ते तरी पहा.’ 

इंद्रांनी आदेश देताच मुनी भूतलावर थेट त्या कावळ्यासमोर प्रकटले. त्याच्या डोक्यावर चक्क नेत्याची टोपी होती. नजर एकीकडं असली तरी लक्ष दुसरीकडंच. राजकारणात यशस्वी होण्याचे सारे गुण-दुर्गुण याच्यात उतरलेत, हे मुनींनी अचूक ओळखलं. 

‘काय काक महाशय.. तुमच्या स्पर्शासाठी घाटावर बघा किती माणसं तिष्ठत उभारलीत. करून टाका ना इच्छा पूर्ण त्यांची,’ मुनींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘मिस्टर क्रो’ जोरात कावकाव करू लागले, ‘कधीतरी माझ्याही इच्छेचा विचार व्हावा. राजकीय नेत्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात, तसंच माझंही व्हावं.’

‘असं कुठं असतं का? कुठल्याच नेत्याची इच्छा कधी सफल होत नसते. वाटल्यास भेटू चला या मंडळींना...’  मुनींनी सुचवताच दोघेही निघाले. 

पुण्यात त्यांना चंदूदादा कोथरूडकर दिसले. एका टेलरला ते फडणविसांच्या जाकिटाचे माप समजावून सांगत होते, ‘डाव्या खिशात पन्नास अन् उजव्या खिशात पन्नास दादा मावले पाहिजेत.’

हे ऐकून दचकलेल्या मुनींनी विचारलं, ‘दादा.. तुम्ही पूर्वी मंत्री होता. आता प्रदेशाध्यक्षही आहात. सर्व इच्छा पूर्ण झाल्या असतील ना हो?’

कात्रज घाटातून पुढं सरकत दादा म्हणाले, ‘तेवढं कोल्हापूरला एकदा का होईना निवडून यायचं राहिलंच बघा.’एवढ्यात सातारा-कोल्हापूर रस्त्यावर सोमय्या भेटले. पत्रकार मंडळी जसं पोलीस ठाण्याला कॉल करून विचारतात, ‘आज काय विशेष?’ तसंच सीबीआयवाले यांना विचारत होते, ‘आज काय नवीन पुरावा?’.. मुनींनी विचारलं, ‘काय किरीटभाई.. केम छो?. कोल्हापूरच्या पिकनिकची हौस फिटली का नाही? आता कोणती इच्छा राहिली तुमची?’ 

कोल्हापुरातील कार्यकर्त्यांच्या जमावाकडं बारीक लक्ष ठेवत सोमय्या उत्तरले, ‘निम्म्या लोकांना गायब करणं अन् निम्म्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवणं.. ही नवी जादू शिकण्याची इच्छा तेवढी राहिलीय.’ मुनींनी ‘मिस्टर क्रो’कडं बघितलं. त्यानंही नकळत मान हलवली. मग ठरलं. दोघांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मुश्रीफ यांची भेट घेतली. 

त्यांचा चेहरा खरंच साऱ्या इच्छा संपल्यागत झालेला, तरीही त्यांना हळूच विचारलं, तेव्हा ते पुटपुटले, ‘आयुष्यभर कीर्तनात-दानधर्मात इमेज जपली. आता नको  तो तमाशा मांडून विरोधक करतायत माझी इमेज क्रॅश. तरीही किरीटभाईंना कोल्हापुरात कुठं धक्का लागू नये, हीच माझी इच्छा.’ 

हे ऐकून मुनींचा ऊर भरून आला, ‘व्वाऽऽ काय हा सात्त्विकपणा. काय हा सोज्वळपणा.’ 

मात्र याच वेळी आजूबाजूचे कॅमेरे काकदृष्टीतून सुटले नाहीत. तो नारदांच्या कानात लागला, ‘पण कॅमेऱ्यामागची भाषाही कधीतरी ऐकायला हवी.’ 

मुंबईच्या रस्त्यावर गिते अन् आठवले यांच्यात वाद रंगला  होता. अनेक दशकांपूर्वीचा रक्ताळलेला खंजीर  नेमका कुणी वापरला, यावरून दोघांत पेटलं होतं. दिल्ली फिरून आलेल्या गितेंना बारामतीकरांचं नेतृत्व मान्य नाही, ही त्यांची इच्छा स्पष्टपणे दिसून आली. रामदासांची इच्छा मात्र समजतच नव्हती. शेवटी नेहमीप्रमाणे कवितेतून भावना प्रकट झाली, ‘कमळ मातोश्रीवर फुलावं किंवा बारामतीत झुलावं.. अंतिम इच्छा एकच,  आमचंच सरकार यावं.’ 

आता बारामतीकडं जाणं क्रमप्राप्त. वाटेत मिस्टर क्रोनं सहज विचारलं, ‘अजितदादांची इच्छा काय असावी?’  यावर मुनी गालातल्या गालात हसत हळूच उत्तरले, ‘कुठल्याही पार्टीसोबत गेले तरीही त्यांची सीएमपदाची इच्छा काही पूर्ण होण्याची शक्यता कमीच. पूर्वी ‘हात’वाल्यांबरोबर डीसीएम. फडणवीसांसोबतही डीसीएम.. अन् आता ‘धनुष्य’वाल्यांसोबतही डीसीएमच.’ 

हे ऐकताच चमकलेले काक महाशय पुन्हा आपल्या घाटाकडं उडाले, ‘जिथं भल्याभल्यांची इच्छा पूर्ण होत नाही तिथं मी किस झाड का पंछी?’  मुनी खुदकन हसले. नारायणऽऽ नारायणऽऽ sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण