शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार बाबूंसाठी हेडमास्तर मोदींचा ‘तास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:02 IST

बाबू लोक फक्त फायली सरकवतात अशी नरेंद्र मोदी यांची तक्रार असते, आता त्यांनी बाबूंना कामाला लावायचे नवे तंत्र शोधले आहे !

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

मोदी आपले सरकार कसे चालवतात हे कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या एखाद्या वर्गात हजेरी लावावी लागेल. अमेरिकेला जाण्यापूर्वी या हेडमास्तरांनी सलग ६ तासांचा एक वर्ग घेतला. या विशेष आढावा बैठकीला बोलावलेल्या ७० हून अधिक सचिवांशी मोदी व्यक्तिश: बोलले. दोन वर्षांत अशी बैठक प्रथमच झाल्याने सचिवांपैकी बहुतेक गोंधळले होते. कोरोना काळात अशी भेट झाली नव्हती. आणखी महत्त्वाचे म्हणजे हे काही कोरड्या विचारविनिमयाचे चिंतन शिबिर नव्हते, तर केल्या कामाचा चोख हिशेब मागणारी झाडाझडतीची बैठक  होती. 

आपल्या खात्याने केलेल्या कामांचा तपशील घेऊनच सचिवांना या बैठकीला बोलावले होते. मागचा तपशील द्यायचा, आणि पुढच्या १०० दिवसांत काय करणार हेही सांगायचे होते. मोदींनी या सर्व सचिवांना राष्ट्रपती भवनात बोलावले. या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक सचिवाला एक टिपण देण्याची सूचना मुख्य सचिव पी. के. मिश्रा आणि मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना देण्यात आलेली होती.

मोदी आणि त्यांचे ७० सचिव व्यवस्थित टाईप केलेले ७० कागद मोदी यांनी त्यांच्या समोरच्या टेबलावर उजव्या बाजूला ठेवले होते. संबंधित सचिव आणि त्याच्या मंत्रालयाची तपशीलवार माहिती त्या प्रत्येक कागदावर होती. याआधी त्या सचिवाने कोणकोणत्या मंत्रालयात काम केले आहे, निवृत्त कधी होणार आहेत, याचीही माहिती त्यात होती. एक सचिव बोलायला उभे राहताच मोदी त्यांना म्हणाले, ‘आपण गेल्या तीन दिवसांपूर्वीच या खात्यात आला आहात, हे मला माहिती आहे.’ 

दुसरे एक सचिव म्हणाले, ‘मी माझ्या मंत्र्यांकडून निर्देश घेत असतो’. त्यावर मोदी म्हणाले, ‘ही बैठक तुम्ही आणि तुमच्या कामाबद्दल आहे. मंत्र्यांना अनेक कामे असतात. २०१९ साली तुम्ही तुमच्या कामाबाबत काय लक्ष्य ठेवले होते आणि ते किती पूर्ण झाले ते सांगा.’ ‘राज्य सरकारे काही फायली अडवून ठेवतात’ असे एका ज्येष्ठ सचिवाने निदर्शनास आणल्यावर ‘हे तुम्ही पंतप्रधान कार्यालयाला आधीच का सांगितले नाही?’ असा थेट प्रश्न मोदी यांनी केला. देशात कोणताही प्रकल्प अडला असेल तर पंतप्रधान कार्यालयाला त्वरित लेखी कळवले गेले पाहिजे, अशा सूचना मोदींनी दिल्या. संबंधित मुख्यमंत्र्यांशी आपण स्वत: बोलू, असेही त्यांनी सांगितले.

कार्यप्रवण करण्याचा नवा पायंडा सचिवांकडून काम करून घेण्याची आणखी एक पद्धत मोदी यांनी विकसित केली आहे. बैठकीत त्यांनी एकदम वेगळा पवित्रा घेतला. पंतप्रधान कार्यालयाला रोज अहवाल पाठवायचा, असे त्यांनी सर्व सचिवांना या बैठकीदरम्यान सांगितले. रोज कार्यालय सोडण्यापूर्वी दिवसभरात काय कामे केली, याचा ई-मेल या सर्व सचिवांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवायचा आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी पुढचे १०० दिवस रोज प्रत्येक सचिवाने हे करायचे आहे. प्रत्येक मंत्रालय आणि त्याचे सचिव यांच्या कामाचा आढावा १०० दिवसांनी घेण्यात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या बैठकीत कोणीही पॉवरपॉईंटचे सादरीकरण केले नाही.

काळ बदलतो आहे...नोकरशाहीबरोबर काम करण्याचा दीर्घ अनुभव आता नरेंद्र मोदी यांच्या गाठीला आहे. ‘मी ल्युटन्स दिल्लीवाला नाही, बाहेरचा आहे’ असे म्हणणे आता त्यांनी सोडून दिलेले दिसते. एकेकाळी ते बाबू लोकांवर रागवत. ‘नोकरशाहीतले लोक फक्त फायली सरकवतात’ असे या बाबूंना उद्देशून मोदी खासगीत म्हणत असत. एकदा रागाच्या भरात एका नोकरशहाशी बोलताना मोदींनी त्यांना सुनावले होते, ‘एक परीक्षा उत्तीर्ण झालात म्हणजे देश चालवण्याचा परवाना तुम्हाला मिळाला, या समजुतीत राहू नका.’

सेवेत असताना आणि निवृत्तीनंतर या अधिकाऱ्यांना सगळे काही मिळत असते, पण काम मात्र ते काडीचे करत नाहीत, हे लक्षात आल्यावर पंतप्रधान खूप अस्वस्थ झाले होते. वरिष्ठ अधिकारी फक्त फायली इकडून तिकडे सरकवायचे काम  कसेबसे करतात, अशी मोदींची धारणा होती. पण आता ७ वर्षे सर्वोच्च पदावरून दिल्लीत काम केल्यावर त्यांनी थोडा वेगळा पवित्रा घेतल्याचे दिसते आहे. 

याआधी प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी मोदींच्या वक्रदृष्टीला घाबरून गोल्फ खेळायला क्लबमध्ये जाईनासे झाले होते. अनेकांनी तर पंचतारांकित हॉटेलेही वर्ज्य केली होती, पण आता थोडे बदल होत आहेत. वेळेत काम करायचे तर नोकरशाहीला कामाला लावले पाहिजे, हे मोदींनी जाणले आहे.  दुसरे म्हणजे सरकारबाहेरचे हुशार लोक मदतीला घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. सहसचिव आणि त्यावरच्या पदांवर त्यांनी बाहेरून माणसे आणली आहेत. तज्ज्ञ तसेच तंत्रज्ञांना त्यांनी हाताशी धरले आहे. एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, हरदीपसिंग पुरी किंवा अगदी निर्मला सीतारामन यांच्यासारख्या आपापल्या विषयात तज्ज्ञ व्यक्तींच्या हाती मोदींनी महत्त्वाची मंत्रालये सोपवली आहेत. या सगळ्यातले जुने जाणते रुळलेले नोकरशहा मात्र काही अभिनव कल्पना मांडण्याऐवजी केवळ श्रवणभक्ती करत आपले दिवस घालवत  असतात, हा भाग वेगळा.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी