शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भंगलेली मने आणि देश जोडण्यासाठी सद्भावना यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 09:32 IST

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि बांगलादेश स्थापनेच्या सुवर्णजयंतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा सुरू होत आहे.

गिरीश कुलकर्णी, सद्भावना यात्रेचे संयोजक 

देशात हिंसा वाढते आहे. सामाजिक मनभेद वाढत आहेत. सगळीकडे अस्वस्थ वातावरण आहे. लोक एकदुसऱ्याबद्दल साशंक आहेत. अशा परिस्थतीत काय करता येईल? लोकांची मनं कशी जोडता येतील आणि त्यांच्यातला संवाद कसा वाढविता येईल? अनेक जण त्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करीत आहेत. नगर येथील ‘स्नेहालय’ या संस्थेनं यासाठी पुढाकार घेतला आहे आणि भारत-बांगलादेश सद्भावना यात्रेचे आयोजन केले. महात्मा गांधींनी जगाला शांती आणि समानतेचा संदेश दिला, म्हणून गांधी जयंतीच्या दिवशी, २ ऑक्टोबरपासून या यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. पोपटराव पवार, अण्णा हजारे, डॉक्टर एस. एन. सुबराव तथा भाईजी, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश मुक्तीसाठी समर्पण केलेल्या शहीद जवानांचे परिवार आदींसह अहमदनगर  ते नौखाली  अशी ७५ दिवसांची ३ हजार किलोमीटरची ही यात्रा आहे. १६ डिसेंबर २०२१ रोजी नौखाली येथे यात्रेचा समारोप होईल.  

बांगलादेशचे राष्ट्रपिता, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. बांगलादेशात यंदाचे वर्ष मुजीब वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्ताने दोन्ही देशांतील स्वातंत्र्य चळवळीच्या भावधारांचे जागरण, दोन्ही देशांच्या संविधानातील मूलभूत मुद्द्यांची  जागृती सायकल यात्री करणार आहेत. त्यासाठी पथनाट्य, समूहनृत्य, चौक सभा, ग्राम आणि युवा संवाद, रोजची सर्वधर्म प्रार्थना, समतेची आणि सद्भावनेची समूहगाणी गात सायकल यात्री जनजागरण करतील. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, बंगाल या राज्यांतून जाणारी ही सायकल यात्रा शेवटचे १८ दिवस बांगलादेशात प्रबोधन करणार आहे. 

आचार्य विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ नारा देत भारत आणि बांगलादेश येथे भूदान आंदोलन केले. भूमिहीन कष्टकऱ्यांना हक्काची शेतजमीन दिली. १९८० च्या दशकात बाबा आमटे यांनी ‘भारत जोडो’ नारा दिला. सायकलवर तरुणाई सोबत घेऊन हिंसा आणि दहशतवाद शमविला. सद्भावना सायकल यात्रेमागे या प्रेरणा आहेत.

भारताची फाळणी झाली तेव्हा (तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये) बांगलादेशमध्ये हिंदूंवर  अत्याचार होत होते. हे समजल्यावर महात्मा गांधी नौखाली येथे १२५ दिवस राहिले.  त्यांनी रक्तपात थांबवून हिंदू आणि मुस्लीम समाजात सद्भाव निर्माण केला. जेथे ब्रिटिश सैन्य हतबल बनले होते, तेथे एकट्या गांधींनी शांतता आणि सद्भावना निर्माण केली. म्हणूनच  सद्भावना सायकल यात्रेचा समारोप नौखाली येथे आयोजिला आहे. रस्त्यातील प्रत्येक गावात एक सद्भावना वृक्ष यात्री लावतील. यात्रेत सहभागी झालेली तरुणाई एकूण ५०० सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यापीठे, ट्रस्ट यांच्याशी संवाद साधतील. 

सायकल यात्री दररोज सुमारे ६५ किलोमीटर अंतर जाणार आहेत. विविध सामाजिक संस्था, शाळा, मंगल कार्यालये, देऊळ, मशीद, ग्रामपंचायत, चर्च, गुरुद्वारा इत्यादी ठिकाणी राहून यात्री संवाद करतील. बांगलादेशकडे कोलकातामार्गे जाताना बंगालमध्ये परिवार केंद्र, मदर तेरेसा यांची संस्था, समरिटन हेल्प मिशन, बेलूर येथील रामकृष्ण मठ, सोनागाच्छी लालबत्ती भागातील महिलांसाठीची कामे, येथील महिलांसाठी काम करणाऱ्या सनलोप आणि सिनीआशा या संस्था, कोलकाता विद्यापीठ, प्रेसिडेंट कॉलेज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शांतिनिकेतन अशा अनेक ठिकाणी सायकल यात्री भेटी देतील.

१३ नोव्हेंबर २०२१ रोजी बंगालमधील बोनगाव येथून यात्रा  बांगलादेशात प्रवेश करील. तेथून ढाकामार्गे यात्रा नौखाली येथे ५ डिसेंबर रोजी पोहोचेल. येथील गांधी आश्रम ट्रस्ट ४ दिवसांच्या लोकसंवादाचे नियोजन करीत आहे. ढाका, नौखाली  येथील  विद्यापीठातील तरुणाईशी संवाद, बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या म्युझियमला भेट आणि त्यांच्या जन्मस्थळाला (तुंगीपरा) सायकल यात्री भेट देणार आहेत. भारताच्या परराष्ट्र विभागाने या सायकल यात्रेला अधिकृतपणे पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे अद्यापही सायकल यात्रींना बांगलादेशाचा व्हिसा मिळालेला नाही. हा अडथळा दूर झाला, तर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणारे हे सर्वांत मोठे लोकअभियान ठरेल. त्यातून देशात नव्या विचारांची पेरणी होईल. समाजातील एकीची भावना विकसित होईल.

सर्वप्रथम देशाचा विचार करणारा प्रांत, अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि ख्याती आहे. सद्भावना यात्रेमुळे आपल्या या परंपरा अधिकच प्रेरक होणार आहेत.girish@snehalaya.org

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेश