शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शिंजो आबे यांच्यासारखा मित्र गमावल्याचे दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 07:57 IST

शिंजो यांच्यासारख्या माणसाचे कोणाशी असे काय शत्रुत्व असेल, त्यातून त्याने यांना थेट गोळी घालावी? हा प्रश्न मला पुन:पुन्हा पडतो आहे. 

विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह 

या क्षणाला माझे मन अगदी सुन्न झाले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मृत्यूने मला खूपच मोठा धक्का बसला. शिंजो यांच्यासारख्या माणसाचे कोणाशी असे काय शत्रुत्व असेल, त्यातून त्याने यांना थेट गोळी घालावी? हा प्रश्न मला पुन:पुन्हा पडतो आहे. 

शांतताप्रिय आणि संवेदनशील जपानमध्ये असे कधी घडले नव्हते. हत्येचे कारण अजून उलगडलेले नाही. परंतु का कुणास ठाऊक, मला या हत्येमागे दूरवर बसलेल्या एखाद्या सत्तेने रचलेले षड्यंत्र असावे, अशी शंका येते आहे; कारण शिंजो घेत असलेल्या भूमिकेमुळे दमनकारी आणि हुकूमशाही प्रवृत्तींना सरळ सरळ आव्हान मिळत होते. 

शिंजो आबे यांच्या जाण्याने भारताच्या हिताचा विचार करणाऱ्या मित्रास आपण गमावले आहे. माझ्यासाठी हा आघात व्यक्तिगतही आहे, कारण  मी एक मित्र गमावला. त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला या क्षणी आठवतो आहे. टोकियोत मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. भारत-जपान संबंध सुधारण्यासाठी काम करणाऱ्या इंडिया फाउंडेशनचे विभवकांत उपाध्याय यांनी ही भेट घडवली होती. भारत-जपान मैत्रीच्या भूमिकेचा मी समर्थक आहे. आबे यांच्याशी झालेल्या पहिल्याच बैठकीत आमची गट्टी जमली.  

सप्टेंबर २००६ मध्ये पंतप्रधान म्हणून आबे शपथ ग्रहण करणार होते त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित भोजनाचे निमंत्रण मला अचानक आले. मी त्यांच्याबरोबर पुष्कळ वेळ घालवला. भारतीय माध्यमे आणि राजकारण समजून घेण्याचा ते सतत प्रयत्न करीत असत. भारताने अणुपरीक्षण केल्यानंतर जगभरातून निर्बंध लावण्यात आले तो काळ मला आठवतो. अटलजींच्या सूचनेनुसार भारतातून एक शिष्टमंडळ जपानला गेले, त्यात मी सहभागी होतो. त्यावेळी ‘भारताला शांतीपूर्ण परमाणू शक्ती का आवश्यक आहे?’ हे जपानी संसदेच्या नाराज तरुण खासदारांना  समजावण्यातही आम्ही यशस्वी झालो. भारत-जपान संबंधात काही थोडेफार योगदान देण्याचे सौभाग्य मिळाले याचा मला आनंद आहे.

आबे  पंतप्रधान म्हणून भारतात आले तेव्हा इंडिया फाउंडेशनतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी, जॉर्ज फर्नांडिस, वसुंधराराजे, सीताराम येचुरी आणि मी व्यासपीठावर उपस्थित होतो. जेव्हा-जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा तेव्हा भारत आणि जपानचे संबंध मधुर कसे राहतील, हेच बोलणे व्हायचे. त्यांच्या जाण्याने भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.vijaydarda@lokmat.com

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेJapanजपानIndiaभारत