शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

शिंजो आबे यांच्यासारखा मित्र गमावल्याचे दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 07:57 IST

शिंजो यांच्यासारख्या माणसाचे कोणाशी असे काय शत्रुत्व असेल, त्यातून त्याने यांना थेट गोळी घालावी? हा प्रश्न मला पुन:पुन्हा पडतो आहे. 

विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह 

या क्षणाला माझे मन अगदी सुन्न झाले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मृत्यूने मला खूपच मोठा धक्का बसला. शिंजो यांच्यासारख्या माणसाचे कोणाशी असे काय शत्रुत्व असेल, त्यातून त्याने यांना थेट गोळी घालावी? हा प्रश्न मला पुन:पुन्हा पडतो आहे. 

शांतताप्रिय आणि संवेदनशील जपानमध्ये असे कधी घडले नव्हते. हत्येचे कारण अजून उलगडलेले नाही. परंतु का कुणास ठाऊक, मला या हत्येमागे दूरवर बसलेल्या एखाद्या सत्तेने रचलेले षड्यंत्र असावे, अशी शंका येते आहे; कारण शिंजो घेत असलेल्या भूमिकेमुळे दमनकारी आणि हुकूमशाही प्रवृत्तींना सरळ सरळ आव्हान मिळत होते. 

शिंजो आबे यांच्या जाण्याने भारताच्या हिताचा विचार करणाऱ्या मित्रास आपण गमावले आहे. माझ्यासाठी हा आघात व्यक्तिगतही आहे, कारण  मी एक मित्र गमावला. त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला या क्षणी आठवतो आहे. टोकियोत मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. भारत-जपान संबंध सुधारण्यासाठी काम करणाऱ्या इंडिया फाउंडेशनचे विभवकांत उपाध्याय यांनी ही भेट घडवली होती. भारत-जपान मैत्रीच्या भूमिकेचा मी समर्थक आहे. आबे यांच्याशी झालेल्या पहिल्याच बैठकीत आमची गट्टी जमली.  

सप्टेंबर २००६ मध्ये पंतप्रधान म्हणून आबे शपथ ग्रहण करणार होते त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित भोजनाचे निमंत्रण मला अचानक आले. मी त्यांच्याबरोबर पुष्कळ वेळ घालवला. भारतीय माध्यमे आणि राजकारण समजून घेण्याचा ते सतत प्रयत्न करीत असत. भारताने अणुपरीक्षण केल्यानंतर जगभरातून निर्बंध लावण्यात आले तो काळ मला आठवतो. अटलजींच्या सूचनेनुसार भारतातून एक शिष्टमंडळ जपानला गेले, त्यात मी सहभागी होतो. त्यावेळी ‘भारताला शांतीपूर्ण परमाणू शक्ती का आवश्यक आहे?’ हे जपानी संसदेच्या नाराज तरुण खासदारांना  समजावण्यातही आम्ही यशस्वी झालो. भारत-जपान संबंधात काही थोडेफार योगदान देण्याचे सौभाग्य मिळाले याचा मला आनंद आहे.

आबे  पंतप्रधान म्हणून भारतात आले तेव्हा इंडिया फाउंडेशनतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी, जॉर्ज फर्नांडिस, वसुंधराराजे, सीताराम येचुरी आणि मी व्यासपीठावर उपस्थित होतो. जेव्हा-जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा तेव्हा भारत आणि जपानचे संबंध मधुर कसे राहतील, हेच बोलणे व्हायचे. त्यांच्या जाण्याने भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.vijaydarda@lokmat.com

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेJapanजपानIndiaभारत