शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

By विजय दर्डा | Updated: July 11, 2022 07:47 IST

मनमानी राज्यकर्त्यांची बेशरम मौजमस्ती आणि बेलगाम वर्तनाने भडकलेल्या सामान्य नागरिकांच्या झुंडी जेव्हा सत्तास्थानांवर कब्जा करतात...

विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह 

जेव्हा एखादा प्रशासक किंवा लोकशाही पद्धतीने निवडून येऊन खुर्चीत बसलेला लोकप्रतिनिधी सर्व-सत्ताधीश होतो, भ्रष्टाचारात आकंठ बुडून जातो, तरुणांना छळतो, जनतेचा विश्वासघात करतो आणि तिला भुकेने कासावीस व्हायला लावतो, तेव्हा जनता विद्रोह करून उठते. श्रीलंकेत यावेळी हेच होत आहे. तिथे केवळ राजकीय सत्तापालट नाही, तर संघर्ष पेटला आहे. हा चिमुकला देश पोटातील भुकेमुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या आगीत जळतो आहे. आपण रशियातल्या महानायकांच्या मूर्ती भुईसपाट होताना पाहिल्या, इराकमध्ये सद्दाम हुसेन यांचे भव्य पुतळे धराशायी होताना पाहिले; पण  श्रीलंकेत घडले तसे दुसरे उदाहरण दिसणार नाही.

या सगळ्याला  राजपक्षे कुटुंब जबाबदार आहे.  या कुटुंबाने श्रीलंकेला मन भरेपर्यंत लुटले. लोकांना गाडीत भरायला एक लिटर पेट्रोल नसताना यांची मुले चालवत असलेल्या गाड्या मात्र एका लिटरमध्ये फक्त चार किलोमीटर जात होत्या. लोकांना प्यायला पाणी नसताना हे लोक दारूच्या अंघोळी करीत होते. लोकांजवळ दोन वेळा खायला अन्न नसताना हे भरपेट खाऊन उलट्या करीत होते. अशी परिस्थिती असेल तर जनता काय करील? पोटाची आग विझली नाही तर राजवटी जळणारच! एरवी शांत प्रकृतीच्या बौद्ध भिक्षूंनीही श्रीलंकेतील राजवटीविरुद्ध मशाल हाती घेतली, यावरून इथली परिस्थिती किती बिघडली होती हे लक्षात येईल. हे बौद्ध भिक्षू जनतेबरोबर उभे राहिले आहेत.

राजपक्षे कुटुंबाने श्रीलंकेची लूट कशी केली याची उदाहरणे चकित करणारी आहेत. २००५ ते २०१५ या काळात राष्ट्रपती म्हणून सत्तेवर राहिलेल्या महिंदा राजपक्षे यांनी विदेशातील बँकांत १८ अब्ज डॉलर्सची संपत्ती जमा केली. देशात विद्रोहाची स्थिती निर्माण झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. महिंदा यांचे छोटे भाऊ गोटबाया राजपक्षे यांनी लोक राष्ट्रपती भवनात घुसल्यावर राजीनामा दिला. गोट बाया फरार झाले नसते तर लोकांनी त्यांचे तुकडे-तुकडे केले असते. २०१५ साली ते संरक्षण सचिव असताना सैन्याच्या खरेदीत दहा दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा झाला होता. महिंदा राजपक्षे यांचे छोटे भाऊ बासील राजपक्षे अर्थमंत्री होते आणि त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्यांच्या भ्रष्टाचारी उद्योगामुळेच त्यांना ‘मिस्टर टेन पर्सेंट’ म्हटले जायचे. २०१६ मध्ये श्रीलंकेतील एका कोर्टाने  १६ एकरांत वसलेल्या बासिल यांच्या आरामदायी महालाचा लिलाव करण्यास फर्मावले होते. तामिळींच्या समस्येमुळे श्रीलंका जळत असतानाही हे सत्ताधीश चैनीची बासरी वाजवत होते आणि पैसा लुटत होते. 

चीनकडून विनाकारण कर्ज घेऊ नका, असे सगळे तज्ज्ञ सांगत असतानाही राजपक्षे परिवार चीनबरोबर व्यवहार करीत राहिला. या कुटुंबाने चीनकडूनही बरीच धनदौलत कमावल्याचा आरोप आहे. तूर्तास श्रीलंका भिकेला लागल्यात जमा आहे. तिथले पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी राजीनामा दिला आहे. दुर्दैवाने अशीच परिस्थिती पाकिस्तानातही दिसते. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानही कंगाल झाला आहे. एखाद्या दिवशी श्रीलंकेसारखा विद्रोह पाकिस्तानातही उसळला,  तर आश्चर्य वाटायला नको.vijaydarda@lokmat.com

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था