शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

मनाचिये गुंथी - आनंदी जीवनाचं सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:12 IST

जगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.

- कौमुदी गोडबोलेजगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.स्वत: आनंदात जीवन जगावे! लोकांनाही आनंदी जीवन जगू द्यावे. जगा आणि जगू द्या हे सूत्र आहे. या सूत्रानुसार जो जगतो आणि अनेकांना प्रोत्साहन देतो तो लोकप्रिय होतो. प्रत्येकाने उत्तम ... उदात्त वर्तन करून आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला दुसºयांनी आपल्याशी चांगले वर्तन करावे अशी अपेक्षा असते. आपल्याकडून ती अपेक्षा पूर्ण होते का याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण कसे घडलो हे समाज न्याहाळत असतो. निराधार, दु:खी लोकांना सर्व प्रकरचा आधार देऊन, प्रेमाने जवळ करून उभं करून चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करणे अगत्याचे आहे. आपण प्रेम दिले की आपल्यावर प्रेमाची पखरण होणार! जसे पेराल तसे उगवते! प्रेम पेरले तर प्रेमाचे अमाप पीक येते.नि:स्पृह, नि:स्वार्थी प्रेमावर अवघे जग उभे राहते! छोट्या छोट्या बिंदूचा मिळून सिंधू होतो. अपेक्षारहित सहकार्याचा हात व त्यामधून साकारते सहकाराची साथ! सुसंस्कारामधून माणूस घडत जातो आणि त्यामध्ये घडविण्याची क्षमता निर्माण होते. संस्कार परिस्थिती... मन:स्थितीनुसार झिरपत जातात. एकदा झिरपले की सुकून जाण्याचे भय उरत नाही. अनेक अंगांनी माणूस घडत असतो. त्याला सुयोग्य आकार देणारा सुरेख हात मिळाला की झाले! दोन हाताचे चार आणि पुढे चारशे झाले की सुसंस्कृत, सालस समाज तयार होतो. त्यागाचा स्वीकार करून सर्वार्थाने आदर्श प्रस्थापित करणाºयांचे जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.माणूस घडणं आणि घडवणे यासाठी अनेक पिढ्या कष्ट सोसतात. अपमान, अवहेलना पचवतात. आपल्या जगण्याला चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजवतात. तेव्हा पुढील पिढ्यांना सुगंधाचा लाभ होतो. अशा आदर्शाचा सहवास लाभणे याला भाग्य लागते! जो त्यांच्या सहवासात येईल ना त्याच्या आयुष्याचे सोने होते. सुवर्णाची झळाळी अवघ्या समाजमनाला आकर्षित करते. सहवास, संगतीमधून उन्नतीचे ... प्रगतीचे सुंदर कमळ फुलते. यामधून आनंदाचा अलौकिक सुगंध सर्वत्र दरवळतो. प्रेम, त्याग आणि आनंद ही त्रिसूत्री भारतीय संस्कृतीने सकल विश्वाला स्वत: अंगीकार करून प्रदान केलेले मौलिक मोती आहेत. विश्वाच्या अंतापर्यंत हे ‘अमूल्य मोती’ तयार होत राहतील व त्याच्या सुंदर माळा तयार होत जातील यात शंका नाही.