शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

मनाचिये गुंथी - आनंदी जीवनाचं सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:12 IST

जगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.

- कौमुदी गोडबोलेजगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.स्वत: आनंदात जीवन जगावे! लोकांनाही आनंदी जीवन जगू द्यावे. जगा आणि जगू द्या हे सूत्र आहे. या सूत्रानुसार जो जगतो आणि अनेकांना प्रोत्साहन देतो तो लोकप्रिय होतो. प्रत्येकाने उत्तम ... उदात्त वर्तन करून आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला दुसºयांनी आपल्याशी चांगले वर्तन करावे अशी अपेक्षा असते. आपल्याकडून ती अपेक्षा पूर्ण होते का याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण कसे घडलो हे समाज न्याहाळत असतो. निराधार, दु:खी लोकांना सर्व प्रकरचा आधार देऊन, प्रेमाने जवळ करून उभं करून चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करणे अगत्याचे आहे. आपण प्रेम दिले की आपल्यावर प्रेमाची पखरण होणार! जसे पेराल तसे उगवते! प्रेम पेरले तर प्रेमाचे अमाप पीक येते.नि:स्पृह, नि:स्वार्थी प्रेमावर अवघे जग उभे राहते! छोट्या छोट्या बिंदूचा मिळून सिंधू होतो. अपेक्षारहित सहकार्याचा हात व त्यामधून साकारते सहकाराची साथ! सुसंस्कारामधून माणूस घडत जातो आणि त्यामध्ये घडविण्याची क्षमता निर्माण होते. संस्कार परिस्थिती... मन:स्थितीनुसार झिरपत जातात. एकदा झिरपले की सुकून जाण्याचे भय उरत नाही. अनेक अंगांनी माणूस घडत असतो. त्याला सुयोग्य आकार देणारा सुरेख हात मिळाला की झाले! दोन हाताचे चार आणि पुढे चारशे झाले की सुसंस्कृत, सालस समाज तयार होतो. त्यागाचा स्वीकार करून सर्वार्थाने आदर्श प्रस्थापित करणाºयांचे जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.माणूस घडणं आणि घडवणे यासाठी अनेक पिढ्या कष्ट सोसतात. अपमान, अवहेलना पचवतात. आपल्या जगण्याला चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजवतात. तेव्हा पुढील पिढ्यांना सुगंधाचा लाभ होतो. अशा आदर्शाचा सहवास लाभणे याला भाग्य लागते! जो त्यांच्या सहवासात येईल ना त्याच्या आयुष्याचे सोने होते. सुवर्णाची झळाळी अवघ्या समाजमनाला आकर्षित करते. सहवास, संगतीमधून उन्नतीचे ... प्रगतीचे सुंदर कमळ फुलते. यामधून आनंदाचा अलौकिक सुगंध सर्वत्र दरवळतो. प्रेम, त्याग आणि आनंद ही त्रिसूत्री भारतीय संस्कृतीने सकल विश्वाला स्वत: अंगीकार करून प्रदान केलेले मौलिक मोती आहेत. विश्वाच्या अंतापर्यंत हे ‘अमूल्य मोती’ तयार होत राहतील व त्याच्या सुंदर माळा तयार होत जातील यात शंका नाही.