शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मनाचिये गुंथी - आनंदी जीवनाचं सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:12 IST

जगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.

- कौमुदी गोडबोलेजगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.स्वत: आनंदात जीवन जगावे! लोकांनाही आनंदी जीवन जगू द्यावे. जगा आणि जगू द्या हे सूत्र आहे. या सूत्रानुसार जो जगतो आणि अनेकांना प्रोत्साहन देतो तो लोकप्रिय होतो. प्रत्येकाने उत्तम ... उदात्त वर्तन करून आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला दुसºयांनी आपल्याशी चांगले वर्तन करावे अशी अपेक्षा असते. आपल्याकडून ती अपेक्षा पूर्ण होते का याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण कसे घडलो हे समाज न्याहाळत असतो. निराधार, दु:खी लोकांना सर्व प्रकरचा आधार देऊन, प्रेमाने जवळ करून उभं करून चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करणे अगत्याचे आहे. आपण प्रेम दिले की आपल्यावर प्रेमाची पखरण होणार! जसे पेराल तसे उगवते! प्रेम पेरले तर प्रेमाचे अमाप पीक येते.नि:स्पृह, नि:स्वार्थी प्रेमावर अवघे जग उभे राहते! छोट्या छोट्या बिंदूचा मिळून सिंधू होतो. अपेक्षारहित सहकार्याचा हात व त्यामधून साकारते सहकाराची साथ! सुसंस्कारामधून माणूस घडत जातो आणि त्यामध्ये घडविण्याची क्षमता निर्माण होते. संस्कार परिस्थिती... मन:स्थितीनुसार झिरपत जातात. एकदा झिरपले की सुकून जाण्याचे भय उरत नाही. अनेक अंगांनी माणूस घडत असतो. त्याला सुयोग्य आकार देणारा सुरेख हात मिळाला की झाले! दोन हाताचे चार आणि पुढे चारशे झाले की सुसंस्कृत, सालस समाज तयार होतो. त्यागाचा स्वीकार करून सर्वार्थाने आदर्श प्रस्थापित करणाºयांचे जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.माणूस घडणं आणि घडवणे यासाठी अनेक पिढ्या कष्ट सोसतात. अपमान, अवहेलना पचवतात. आपल्या जगण्याला चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजवतात. तेव्हा पुढील पिढ्यांना सुगंधाचा लाभ होतो. अशा आदर्शाचा सहवास लाभणे याला भाग्य लागते! जो त्यांच्या सहवासात येईल ना त्याच्या आयुष्याचे सोने होते. सुवर्णाची झळाळी अवघ्या समाजमनाला आकर्षित करते. सहवास, संगतीमधून उन्नतीचे ... प्रगतीचे सुंदर कमळ फुलते. यामधून आनंदाचा अलौकिक सुगंध सर्वत्र दरवळतो. प्रेम, त्याग आणि आनंद ही त्रिसूत्री भारतीय संस्कृतीने सकल विश्वाला स्वत: अंगीकार करून प्रदान केलेले मौलिक मोती आहेत. विश्वाच्या अंतापर्यंत हे ‘अमूल्य मोती’ तयार होत राहतील व त्याच्या सुंदर माळा तयार होत जातील यात शंका नाही.