शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

क्षमा वीरस्य भूषणम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:03 IST

विस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारविस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.जेव्हा आपण दु:ख पकडून ठेवतो तेव्हा ते आतल्या आत वाढत जाते व मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण करते. त्याचे पर्यवसान क्रोध, इर्षा, मत्सर, द्वेष अशा दुर्गुणांमध्ये होते व त्यामुळे आपली मानसिक स्थिती खालावते. सुडाची भावना आपल्याच शरीरावर दुष्परिणाम करते. क्षमा करण्याºया लोकांना क्रोध कमी प्रमाणात येतो व अपमानाचा अनिष्ट प्रभावसुद्धा कमी प्रमाणात प्रकृतीवर पडतो तसेच क्षमा करणारे लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी असतात. जेव्हा आपण मनात कसलीच जळमटं ठेवत नाही व मोठ्या मनाने दुसºयाला क्षमा करतो तेव्हा आपल्या मनात जमा झालेली नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात मोकळी होते. दु:ख पकडून ठेवल्यामुळे आपल्यात नकारात्मक विचारांची शृंखला चालू होते व आपल्या आत्मिक शक्तीचा ºहास होतो. क्षमा केल्यामुळे मनाला शांती मिळते व दु:ख पकडून ठेवल्यास नैराश्यता वाढते. म्हणूनच डॉ. रॉबर्ट एनाराईट या व्यक्तीने अमेरिकेत ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस डे’ हा दिवस आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जगभर साजरा केल्या जातो. महात्मा गांधी म्हणतात की कमजोर व्यक्ती कधीही क्षमा करू शकत नाही तर क्षमा करणे हा शक्तिशाली व्यक्तीचा गुण आहे. यामुळेच म्हणतात ‘क्षमा वीरस्य भूषणम’. संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’. श्रीमत भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की,तेज: क्षमा धृती: शौचमद्रोहो नातिमानिता।भविन्त सम्पंद दैवीमिभजातस्य भारत।।हे अर्जुना, तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वत:विषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक क्षणी क्षमाशील असणे अत्यंत आवश्यक असते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या