शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

क्षमा वीरस्य भूषणम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:03 IST

विस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारविस्कानसीन विद्यापीठ, अमेरिका येथे झालेल्या अभ्यासाअंती असे आढळून आले की जे लोक क्षमाशील असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही क्षमा न करण्याºया लोकांपेक्षा जास्त असते व त्यांना कमी प्रमाणात आजार होतात. असे म्हणतात की तीन महिन्यापर्यंत दु:ख धरून ठेवल्यास आजाराची सुरुवात होते व सहा महिन्यापर्यंत दु:ख विसरलो नाही तर त्याचे आजारात रूपांतर होते.जेव्हा आपण दु:ख पकडून ठेवतो तेव्हा ते आतल्या आत वाढत जाते व मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण करते. त्याचे पर्यवसान क्रोध, इर्षा, मत्सर, द्वेष अशा दुर्गुणांमध्ये होते व त्यामुळे आपली मानसिक स्थिती खालावते. सुडाची भावना आपल्याच शरीरावर दुष्परिणाम करते. क्षमा करण्याºया लोकांना क्रोध कमी प्रमाणात येतो व अपमानाचा अनिष्ट प्रभावसुद्धा कमी प्रमाणात प्रकृतीवर पडतो तसेच क्षमा करणारे लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी असतात. जेव्हा आपण मनात कसलीच जळमटं ठेवत नाही व मोठ्या मनाने दुसºयाला क्षमा करतो तेव्हा आपल्या मनात जमा झालेली नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात मोकळी होते. दु:ख पकडून ठेवल्यामुळे आपल्यात नकारात्मक विचारांची शृंखला चालू होते व आपल्या आत्मिक शक्तीचा ºहास होतो. क्षमा केल्यामुळे मनाला शांती मिळते व दु:ख पकडून ठेवल्यास नैराश्यता वाढते. म्हणूनच डॉ. रॉबर्ट एनाराईट या व्यक्तीने अमेरिकेत ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे ‘इंटरनॅशनल फरगिव्हनेस डे’ हा दिवस आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जगभर साजरा केल्या जातो. महात्मा गांधी म्हणतात की कमजोर व्यक्ती कधीही क्षमा करू शकत नाही तर क्षमा करणे हा शक्तिशाली व्यक्तीचा गुण आहे. यामुळेच म्हणतात ‘क्षमा वीरस्य भूषणम’. संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’. श्रीमत भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की,तेज: क्षमा धृती: शौचमद्रोहो नातिमानिता।भविन्त सम्पंद दैवीमिभजातस्य भारत।।हे अर्जुना, तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वत:विषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. म्हणूनच जीवनाच्या प्रत्येक क्षणी क्षमाशील असणे अत्यंत आवश्यक असते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या