शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

‘क्षमा वीरस्य भूषणम्’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:16 AM

‘ज्यांच्यासोबत मी लहानपणी बॅडमिंटन खेळलो त्याच शिपायांनी माझ्या आजीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली.

‘ज्यांच्यासोबत मी लहानपणी बॅडमिंटन खेळलो त्याच शिपायांनी माझ्या आजीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली. त्याचा राग दीर्घकाळ मनात होता. पण पुढे तो मावळत गेला. त्यानंतर लिट्टेच्या ज्या मारेकऱ्यांनी माझ्या वडिलांचा स्फोटक मृत्यू घडवून आणला त्यांचाही राग मनात होता. तोही आता राहिला नाही. आता मला त्या मारेकºयांच्या घरातल्या मुला-मुलींची अधिक आठवण येते. मी त्यांना मनापासून क्षमा केली आहे. त्यांना मोकळे करण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही. माझ्याएवढे माझ्या बहिणीचे, प्रियंकाचे मनही मोठे व मोकळे असल्याने तिनेही त्यांना क्षमा केली आहे.’ हे राहुल गांधी यांनी सिंगापूरमधील एका वार्तालापात काढलेले उद्गार हिंसा आणि हिंसाचार व सूड आणि सूडाचार या वृत्ती मनात बाळगणाºया साºयांनीच लक्षात घ्यावे असे आहेत. राहुल गांधी संत नाहीत, ते राजकीय नेते आहेत. पण राजकारणातली काही माणसे अशी की त्यांच्यावर अहिंसेचा व मनुष्यधर्माचा संस्कार टिकला आहे. मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या पत्नी स्वरूपादेवी यांनी स्वराज्याच्या आंदोलनात अनेकदा तुरुंगवास अनुभवला. विजयालक्ष्मी आणि कृष्णा या त्यांच्या दोन कन्यांनीही आंदोलने करून तुरुंगवास ओढवून घेतला. त्यांचे चिरंजीव जवाहरलाल हे तर स्वातंत्र्यलढ्याचे नेतेच होते. राहुल गांधींवर मोतीलालजींपासून राजीव गांधीपर्यंतच्या चार पिढ्यांचा देशभक्ती व अहिंसापरतेचा संस्कार आहे. १९५० च्या सुमाराची येथे नोंदविण्याजोगी एक घटना. पं. जवाहरलाल नेहरू इंग्लंडच्या दौºयावर होते. त्यांच्यासोबत त्यांची कन्या इंदिराही होती. त्यावेळी सर विन्स्टन चर्चिल हे दुसºयांदा इंग्लंडच्या पंतप्रधानपदावर आले होते. त्यांची भेट झाली तेव्हा चर्चिल यांनी इंदिरा गांधींना विचारले ‘तुझ्या वडिलांना आम्ही अकरा वर्षे तुरुंगात ठेवले, त्यात त्यांचा छळही केला. त्याचा राग तुझ्या मनात अजून आहे काय’. एका क्षणाचाही विचार न करता इंदिरा गांधी म्हणाल्या ‘नाही’. आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. त्यांनी आम्हाला सूड शिकविला नाही. ममत्व आणि उदारपणच तेवढे सांगितले. त्यामुळे तुम्हीही तुमच्या तेव्हाच्या निर्णयांचा आता पश्चात्ताप करण्याचे कारण नाही.’ शेवटी हिंसा वा सूड ही एक प्रवृत्ती आहे. तिचा संस्कारही सहज साध्य नसतो. तो दीर्घकाळच्या शिकवणुकीतून वा घरातल्या वातावरणातूनच यावा लागतो. तो धर्मातून वा धार्मिक म्हणवून घेणाºया संघटनांमधून येत नाही. नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या घालून त्यांचा खून केला. त्याच्यावर खुनाचा खटला सुरू असताना त्याने रामदास गांधी या गांधीजींच्या चिरंजीवांना पत्र लिहून आपण तो खून का केला ते सांगितले. पुढे रामदास आणि नथुराम यांच्यात बरेच दिवस पत्रव्यवहार चालला. रामदासांनी नथुरामच्या साºया प्रश्नांची त्याला निरुत्तर करणारी उत्तरे दिली. अखेरच्या पत्रात रामदासांनी लिहिले ‘साºया देशाने ज्याला आपला पिता मानले तो गांधी माझा बाप होता. तू त्याची हत्या केलीस. हा देश तुला कदाचित क्षमा करणार नाही. पण मी बापूंच्या संस्कारात वाढलो आहे. जा, मी तुला क्षमा केली आहे.’ क्षमाशीलता ही उपजतच असावी वा संस्कारातून येत असावी. महावीरांनी तर क्षमा हे शूराचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. दुबळ्यांना फक्त द्वेष करता येतो, भयभीतांना शस्त्रे बाळगावीशी वाटतात. दया, क्षमा व शांती या गोष्टी फक्त सामर्थ्यवानांनाच साधत असतात असे उद्गार प्रत्यक्ष कस्तुरबांनीही एकदा काढले आहेत. ज्यांना कसलेही भय नाही ते निर्भय लोक गांधींसारखे शत्रूच्या राज्यातही नि:शस्त्र राहतात व सत्तेशी लढा देतात. गांधींनी या देशावर नि:शस्त्र व निर्भय राहण्याचा संस्कार केला तसा शत्रूवरही प्रेम करण्याचा संदेश दिला. तो ज्यांना स्वीकारता आला नाही, त्या करंट्यांना काही म्हणायचे नसते. त्यांची फक्त कीवच करायची असते. राहुल आणि प्रियंका या दोघांनी त्यांच्या वडिलांच्या मारेकºयांबाबत जी क्षमाशील वृत्ती धारण केली ती गांधीजींच्या शिकवणीची व भ. महावीरांच्या ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ या संदेशाची साक्ष देणारी आहे.