शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 00:31 IST

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सोमनाथदा बंगालचे असले तरी साऱ्या देशाला आपले वाटणारे व साºयांना घेऊन चालणारे नेते होते. त्याचमुळे ते डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे असतानाही २००४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने त्यांची सभापतिपदावर निवड केली. तो पदभार त्यांनी ज्या डौलाने व गांभीर्याने सांभाळला त्याची तुलना लोकसभेचे पहिले सभापती अनंत शयनम् अय्यंगार यांच्या कारकिर्दीशीच करता यावी. ते सभापती असताना घडलेल्या दोन घटना या संदर्भात नमूद करण्याजोग्या आहेत. त्यांच्या कोणत्याशा निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आपल्यासमोर हजर व्हायला सांगणारा आदेश (समन्स) काढला तेव्हा कायदे मंडळाच्या प्रमुखाला असा आदेश देण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे सोमनाथदांनी त्या न्यायालयाला ऐकविले. कायदेकारी, कार्यकारी आणि न्याय या सरकारच्या तीनही शाखांना घटनेने स्वायत्तता दिली असताना आपल्या शाखेचा अधिकार व सन्मान राखण्यासाठी सोमनाथदांनी तेव्हा एक संवैधानिक संकटच ओढवून घेतले होते. पुढे भारताने अमेरिकेशी केलेल्या अणुइंधनाच्या करारावरून भाजप व कम्युनिस्टांसह अनेक पक्षांनी तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेविरुद्ध राष्टÑपतींकडे तक्रारपत्र दिले. त्या पत्रावर सही करायला नकार देऊन सोमनाथदांनी ‘सभापतीने अशा पक्षीय भूमिका घेऊ नये’ असे त्यांच्या पक्षाचे पुढारी प्रकाश करात यांना सुनावले. त्यावर संतापलेल्या करातांनी त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करणारा आदेश काढला. सोमनाथदांनी तो आनंदाने स्वीकारला. मात्र नंतरच्या काळात त्यांची प्रतिष्ठा उंचावलेली व करातांची रसातळाला गेलेली देशाला दिसली. सोमनाथ चॅटर्जी हे भूमिका घेणारे नेते होते. १९९६ मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देवेगौडा यांची देशाच्या पंतप्रधानपदावर निवड करण्याआधी त्यांचे बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नावावर एकमत झाले होते. ज्योती बसूंनी पंतप्रधानपद स्वीकारावे या मताला सोमनाथदांची मान्यता होती. परंतु तेव्हा नव्यानेच पक्षाच्या सचिवपदावर आलेल्या करात यांनी तसे केल्याने पक्षाचे नुकसान होईल असा पवित्रा घेऊन ज्योती बसूंना ते पद मिळू दिले नाही. त्यावेळी व नंतरच्या काळातही प्रकाश करातांना साथ देणारे उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. ए.बी. बर्धन यांनी या साºया घटनाक्रमाबाबत खंत व्यक्त करताना म्हटले ‘आम्ही करातांऐवजी सोमनाथदांचे म्हणणे ऐकले असते तर ते पक्ष व देश या दोहोंसाठीही चांगले झाले असते’. मोठ्यांचे शहाणपण ज्यांच्या उशिरा लक्षात येते त्यांची व त्यांच्या संघटनांची स्थिती कशी होते हे आता करात व त्यांचा डावा कम्युनिस्ट पक्ष बंगाल व अन्यत्र अनुभवत आहे. असो, सोमनाथदांचा पक्ष देशात कधी सत्तेवर येणार नव्हता. तरीही त्यांनी सरकारला कधी ‘विरोधासाठी विरोध’ केला नाही. विकासाच्या व चांगल्या योजनांना त्यांनी नेहमी साथ दिली. झालेच तर सरकार व त्यातील नेत्यांविषयी त्यांनी कधी पातळी सोडून टीका केली नाही. त्याचमुळे सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांच्याएवढेच अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले. राजकीय विरोध करताना त्याला व्यक्तिगत विरोधाची जोड न देण्याचा त्यांचा संयम देशातील फारच थोड्या नेत्यांना राखता आला आहे. त्याचमुळे डाव्या कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी स्वीकारलेले सोमनाथदा एखाद्या सर्वपक्षीय नेत्यासारखेच देशात व संसदेत वावरले. सर्वच पक्ष व राज्ये त्यांच्याविषयीचा आदरभाव बाळगून होती. त्यांची स्मृती हा देश दीर्घकाळ जपणारही आहे.

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीPoliticsराजकारणnewsबातम्या