शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

समाधानाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

माणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते.

- कौमुदी गोडबोलेमाणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते. नास्तिक माणूस आस्तिक होतो. भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करू लागतो. असा उत्तम बदल झाला की समाजातून विविध प्रतिक्रिया उमटतात. भगवंतांची सेवा निष्ठावंत भावानं करण्यात आनंदाची अमूल्य प्राप्ती होते. तो संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे कार्य करू लागतो. शिस्त, कौशल्य आणि सेवाभाव याचा सुरेख मेळ त्याच्या कार्यामध्ये दिसून येतो.माणूस अशा महत्त्वपूर्ण बदलामुळे समाजाला घडवण्यास सामोरा येतो. कर्तृत्व भावामुळे दु:ख भोगणारा आपले कर्तृत्व भगवंताला देऊ लागतो. कर्तेपण स्वत:कडे न घेता भगवंताकडे दिलं की कोणताच त्रास होत नाही. यश, अपयशाची काळजी उरत नाही. म्हणजे कर्म करत रहायची पण फळाची अभिलाषा बाळगायची नाही. अशा सेवाभावामुळे तो सदैव समाधानात राहतो. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील ‘‘ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान!’’ या अभंगाचा आशय जीवनात अनुभवता येतो. स्तुती- निंदा, मान अपमान याचा सहज स्वीकार करण्याच्या मनोभूमिकेमुळे मन हिंदकळत नाही.समाधान मनात पूर्णपणानं झिरपत गेलं की त्याचा झरा कधीच आटत नाही. सामाजिक, नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक संकटं आली तर खचून न जाता सदैव सेवेत राहतो. भगवंत संतांची परीक्षा घेतो मग इतरांचं काय? त्याच्या परीक्षेचा पेपर अज्ञात असतो. जे प्रश्न समोर येतील त्याची उत्तरं लिहीत जायची. उत्तरं अचूक देण्याचा प्रयत्न करायचा. पास- नापासाचा विचार करायचा नाही. किती टक्के गुण मिळतील माहीत नाही. परीक्षा देणं, पेपर सोडवणं माणसाच्या हातात असतं. निकाल भगवंताच्या हातात असतो.निष्काम भावानं कर्म करणारा परमात्म्याला, भगवंताला प्रिय असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ‘निष्काम कर्म योग’ सांगितला. जो फळाची अभिलाषा न बाळगता कर्म करतो ना त्याची कर्म मलाच येऊन मिळतात, असं श्रीकृष्ण म्हणतात. असा भक्त सर्वश्रेष्ठ ठरतो. त्याची जन्ममृत्यूच्या फेºयामधून सुटका होऊ शकते. वासनांचा क्षय होऊन कर्म करून, फळाची इच्छा न करता जीवन जगणारा भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होऊन जातो. सामान्य माणूस निष्ठावंत आणि निष्काम भावामुळे असामान्य कार्य करू शकतो. ती ताकद त्याच्या या श्रेष्ठतम् भावात सामावलेली असते.जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग येणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेनं सामोरं जाणारा माणूस असामान्य होऊन जातो. सामान्य माणसाकडून असामान्यांपर्यंतचा प्रवास लक्षावधी ठरतो. तो अशक्य असणारं कार्य शक्य करून टाकतो. अशा माणसांच्या जीवनाचा अभ्यास करून प्रतिकूलतेला अनुकूल करणारी व्यक्ती ‘आदर्श’ ठरते. 

टॅग्स :Waterपाणी