शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

समाधानाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

माणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते.

- कौमुदी गोडबोलेमाणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते. नास्तिक माणूस आस्तिक होतो. भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करू लागतो. असा उत्तम बदल झाला की समाजातून विविध प्रतिक्रिया उमटतात. भगवंतांची सेवा निष्ठावंत भावानं करण्यात आनंदाची अमूल्य प्राप्ती होते. तो संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे कार्य करू लागतो. शिस्त, कौशल्य आणि सेवाभाव याचा सुरेख मेळ त्याच्या कार्यामध्ये दिसून येतो.माणूस अशा महत्त्वपूर्ण बदलामुळे समाजाला घडवण्यास सामोरा येतो. कर्तृत्व भावामुळे दु:ख भोगणारा आपले कर्तृत्व भगवंताला देऊ लागतो. कर्तेपण स्वत:कडे न घेता भगवंताकडे दिलं की कोणताच त्रास होत नाही. यश, अपयशाची काळजी उरत नाही. म्हणजे कर्म करत रहायची पण फळाची अभिलाषा बाळगायची नाही. अशा सेवाभावामुळे तो सदैव समाधानात राहतो. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील ‘‘ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान!’’ या अभंगाचा आशय जीवनात अनुभवता येतो. स्तुती- निंदा, मान अपमान याचा सहज स्वीकार करण्याच्या मनोभूमिकेमुळे मन हिंदकळत नाही.समाधान मनात पूर्णपणानं झिरपत गेलं की त्याचा झरा कधीच आटत नाही. सामाजिक, नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक संकटं आली तर खचून न जाता सदैव सेवेत राहतो. भगवंत संतांची परीक्षा घेतो मग इतरांचं काय? त्याच्या परीक्षेचा पेपर अज्ञात असतो. जे प्रश्न समोर येतील त्याची उत्तरं लिहीत जायची. उत्तरं अचूक देण्याचा प्रयत्न करायचा. पास- नापासाचा विचार करायचा नाही. किती टक्के गुण मिळतील माहीत नाही. परीक्षा देणं, पेपर सोडवणं माणसाच्या हातात असतं. निकाल भगवंताच्या हातात असतो.निष्काम भावानं कर्म करणारा परमात्म्याला, भगवंताला प्रिय असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ‘निष्काम कर्म योग’ सांगितला. जो फळाची अभिलाषा न बाळगता कर्म करतो ना त्याची कर्म मलाच येऊन मिळतात, असं श्रीकृष्ण म्हणतात. असा भक्त सर्वश्रेष्ठ ठरतो. त्याची जन्ममृत्यूच्या फेºयामधून सुटका होऊ शकते. वासनांचा क्षय होऊन कर्म करून, फळाची इच्छा न करता जीवन जगणारा भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होऊन जातो. सामान्य माणूस निष्ठावंत आणि निष्काम भावामुळे असामान्य कार्य करू शकतो. ती ताकद त्याच्या या श्रेष्ठतम् भावात सामावलेली असते.जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग येणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेनं सामोरं जाणारा माणूस असामान्य होऊन जातो. सामान्य माणसाकडून असामान्यांपर्यंतचा प्रवास लक्षावधी ठरतो. तो अशक्य असणारं कार्य शक्य करून टाकतो. अशा माणसांच्या जीवनाचा अभ्यास करून प्रतिकूलतेला अनुकूल करणारी व्यक्ती ‘आदर्श’ ठरते. 

टॅग्स :Waterपाणी