शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

समाधानाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

माणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते.

- कौमुदी गोडबोलेमाणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते. नास्तिक माणूस आस्तिक होतो. भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करू लागतो. असा उत्तम बदल झाला की समाजातून विविध प्रतिक्रिया उमटतात. भगवंतांची सेवा निष्ठावंत भावानं करण्यात आनंदाची अमूल्य प्राप्ती होते. तो संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे कार्य करू लागतो. शिस्त, कौशल्य आणि सेवाभाव याचा सुरेख मेळ त्याच्या कार्यामध्ये दिसून येतो.माणूस अशा महत्त्वपूर्ण बदलामुळे समाजाला घडवण्यास सामोरा येतो. कर्तृत्व भावामुळे दु:ख भोगणारा आपले कर्तृत्व भगवंताला देऊ लागतो. कर्तेपण स्वत:कडे न घेता भगवंताकडे दिलं की कोणताच त्रास होत नाही. यश, अपयशाची काळजी उरत नाही. म्हणजे कर्म करत रहायची पण फळाची अभिलाषा बाळगायची नाही. अशा सेवाभावामुळे तो सदैव समाधानात राहतो. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील ‘‘ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान!’’ या अभंगाचा आशय जीवनात अनुभवता येतो. स्तुती- निंदा, मान अपमान याचा सहज स्वीकार करण्याच्या मनोभूमिकेमुळे मन हिंदकळत नाही.समाधान मनात पूर्णपणानं झिरपत गेलं की त्याचा झरा कधीच आटत नाही. सामाजिक, नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक संकटं आली तर खचून न जाता सदैव सेवेत राहतो. भगवंत संतांची परीक्षा घेतो मग इतरांचं काय? त्याच्या परीक्षेचा पेपर अज्ञात असतो. जे प्रश्न समोर येतील त्याची उत्तरं लिहीत जायची. उत्तरं अचूक देण्याचा प्रयत्न करायचा. पास- नापासाचा विचार करायचा नाही. किती टक्के गुण मिळतील माहीत नाही. परीक्षा देणं, पेपर सोडवणं माणसाच्या हातात असतं. निकाल भगवंताच्या हातात असतो.निष्काम भावानं कर्म करणारा परमात्म्याला, भगवंताला प्रिय असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ‘निष्काम कर्म योग’ सांगितला. जो फळाची अभिलाषा न बाळगता कर्म करतो ना त्याची कर्म मलाच येऊन मिळतात, असं श्रीकृष्ण म्हणतात. असा भक्त सर्वश्रेष्ठ ठरतो. त्याची जन्ममृत्यूच्या फेºयामधून सुटका होऊ शकते. वासनांचा क्षय होऊन कर्म करून, फळाची इच्छा न करता जीवन जगणारा भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होऊन जातो. सामान्य माणूस निष्ठावंत आणि निष्काम भावामुळे असामान्य कार्य करू शकतो. ती ताकद त्याच्या या श्रेष्ठतम् भावात सामावलेली असते.जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग येणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेनं सामोरं जाणारा माणूस असामान्य होऊन जातो. सामान्य माणसाकडून असामान्यांपर्यंतचा प्रवास लक्षावधी ठरतो. तो अशक्य असणारं कार्य शक्य करून टाकतो. अशा माणसांच्या जीवनाचा अभ्यास करून प्रतिकूलतेला अनुकूल करणारी व्यक्ती ‘आदर्श’ ठरते. 

टॅग्स :Waterपाणी