शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

समाधानाचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

माणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते.

- कौमुदी गोडबोलेमाणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते. नास्तिक माणूस आस्तिक होतो. भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करू लागतो. असा उत्तम बदल झाला की समाजातून विविध प्रतिक्रिया उमटतात. भगवंतांची सेवा निष्ठावंत भावानं करण्यात आनंदाची अमूल्य प्राप्ती होते. तो संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे कार्य करू लागतो. शिस्त, कौशल्य आणि सेवाभाव याचा सुरेख मेळ त्याच्या कार्यामध्ये दिसून येतो.माणूस अशा महत्त्वपूर्ण बदलामुळे समाजाला घडवण्यास सामोरा येतो. कर्तृत्व भावामुळे दु:ख भोगणारा आपले कर्तृत्व भगवंताला देऊ लागतो. कर्तेपण स्वत:कडे न घेता भगवंताकडे दिलं की कोणताच त्रास होत नाही. यश, अपयशाची काळजी उरत नाही. म्हणजे कर्म करत रहायची पण फळाची अभिलाषा बाळगायची नाही. अशा सेवाभावामुळे तो सदैव समाधानात राहतो. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील ‘‘ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान!’’ या अभंगाचा आशय जीवनात अनुभवता येतो. स्तुती- निंदा, मान अपमान याचा सहज स्वीकार करण्याच्या मनोभूमिकेमुळे मन हिंदकळत नाही.समाधान मनात पूर्णपणानं झिरपत गेलं की त्याचा झरा कधीच आटत नाही. सामाजिक, नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक संकटं आली तर खचून न जाता सदैव सेवेत राहतो. भगवंत संतांची परीक्षा घेतो मग इतरांचं काय? त्याच्या परीक्षेचा पेपर अज्ञात असतो. जे प्रश्न समोर येतील त्याची उत्तरं लिहीत जायची. उत्तरं अचूक देण्याचा प्रयत्न करायचा. पास- नापासाचा विचार करायचा नाही. किती टक्के गुण मिळतील माहीत नाही. परीक्षा देणं, पेपर सोडवणं माणसाच्या हातात असतं. निकाल भगवंताच्या हातात असतो.निष्काम भावानं कर्म करणारा परमात्म्याला, भगवंताला प्रिय असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ‘निष्काम कर्म योग’ सांगितला. जो फळाची अभिलाषा न बाळगता कर्म करतो ना त्याची कर्म मलाच येऊन मिळतात, असं श्रीकृष्ण म्हणतात. असा भक्त सर्वश्रेष्ठ ठरतो. त्याची जन्ममृत्यूच्या फेºयामधून सुटका होऊ शकते. वासनांचा क्षय होऊन कर्म करून, फळाची इच्छा न करता जीवन जगणारा भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होऊन जातो. सामान्य माणूस निष्ठावंत आणि निष्काम भावामुळे असामान्य कार्य करू शकतो. ती ताकद त्याच्या या श्रेष्ठतम् भावात सामावलेली असते.जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग येणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेनं सामोरं जाणारा माणूस असामान्य होऊन जातो. सामान्य माणसाकडून असामान्यांपर्यंतचा प्रवास लक्षावधी ठरतो. तो अशक्य असणारं कार्य शक्य करून टाकतो. अशा माणसांच्या जीवनाचा अभ्यास करून प्रतिकूलतेला अनुकूल करणारी व्यक्ती ‘आदर्श’ ठरते. 

टॅग्स :Waterपाणी