शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

‘स्व’चा शोध घडविणारा एकांतवास...

By किरण अग्रवाल | Updated: October 8, 2020 08:21 IST

प्राणाचा आयाम शरीराच्या नश्वर देहाचा व्यायाम घडवून आणतो तेव्हा ही ‘स्व’ची घंटी अंतरात्म्याला जागवून जाते. 

- किरण अग्रवालकोरोनाच्या निमित्ताने एकांतवासातून आत्मावलोकनाकडे जाण्याची संधी मिळते हे खरे, पण हा प्रवास म्हणावा तितका सोपा खचितच नाही. स्वत:तले स्वत्व जेव्हा मनाच्या डोहात पूर्णांशाने विरघळून टाकणे शक्य होते, तेव्हा कुठे त्यासाठीचा मार्ग किलकिला होतो; प्रकाशाची किरणे विचारांच्या ताटव्यांना धडका देत सुवर्णमयी आल्हादकतेची पखरण करू पाहतात, घनगर्द काळोखाची किर्र कवने उजेडाचे गीत गायला अधीर होतात, स्वरांना शब्दांचा आकार-उकार लाभू पाहतो, तो जो काही उत्सव असतो... चेतनेचा प्रकटोत्सव म्हणूया त्याला, तोच तर असतो तिमिरातून तेजाकडे नेणारा. एकांतातला वाटाड्या. अध्यात्माची जाणीव करून देणारा व ‘स्व’चा साक्षात्कार घडविणारा...एकदा का हा ‘स्व’चा साक्षात्कार झाला, की त्याच्या विलयाची प्रक्रिया सोपी होऊन जाते. जलाचे जलातील अर्पण जितक्या सहजपणे घडून येते, तितक्याच सहजतेने हे ‘स्व’चे तर्पण करता येणे हेच तर अध्यात्म आहे. शेवटी तर्पणदेखील काय, तर तो आहुतीचा, मुक्तीचाच मार्ग असतो. ‘मृत्योऽर्मा अमृतम्गमय’ची दिशा स्वच्छंदी करणारा. म्हणून ‘स्व’ला जाणायचे. त्या स्वमध्ये स्वत:ला समाहित, संमिलीत व संमोहितही करून घ्यायचे; कारण या तिन्ही प्रकारात मननाची प्रकिया अंतर्भूत असते. मनाने, वाचेने, कायेने विलयाचा भाव त्यात अभिभूत असतो, जो ‘स्व’च्या जाणिवेतून मुक्तीच्या राजमार्गाकडे नेतो. स्व हा मूलगामी निर्गुण, निराकार, निरवैर असाच असतो. नवजात बाळासारखा. कसलीही चिंता, भीती वा कपटाचा लवलेश नसलेला. आनंद व केवळ आनंदाचे निधान असलेला. या स्वची जितकी प्रामाणिक गळाभेट घ्याल, तितके मनाचे झरे निर्झर होतील. भवतालचे षड्रिपु यात बाधा आणण्यापूर्वी हे काम करायचे असते, कारण ते मनाची मलिनता वाढवीत असतात. काम, क्रोध, मद, मोह-मत्सराचे जाळे घट्ट असते. या जाळ्याचे तार एकमेकांत असे विणलेले असतात, की कुणा एकास सोडताच येऊ नये. भौतिक सुखासीनतेकडे नेणारी आभासी दिशाभूल तर त्यातून घडून येतेच, शिवाय विचारांची शृंखलाही या मलिनतेत अवरुद्ध होते. स्वच्या आहार, विहारात स्वत:ला झोकून देणे व स्वच्या एकारांततेकडून आत्मसिद्धीच्या उकारांततेकडे मार्गस्थ होणे हे म्हणूनच अवघड असते.आत्म्याचे अवलोकन घडून येण्यासाठी ‘स्व’चा विलय याकरिताही गरजेचा असतो, की त्याभोवतीच तर आशा अपेक्षांचे इमले उभे होत असतात. या अपेक्षा निरंकुश असतात. समाधान ही संकल्पना तिथे थिटी पडते, संकुचित होते. आहे त्यापेक्षा अधिक प्राप्तीचा लोभ त्यात डोकावल्याखेरीज राहत नाही. लोभाला सहोदरही अनेक असतात. न बोलावता ते येतात, लाभतात व जिवाभावाचे होतात. अशात मार्ग सुटतात, रस्ते खुंटतात व वाटा तेवढ्या उरतात. चालण्याची मर्यादा यातून जोखता येते. जशी ही चाल, तसा ज्याचा त्याचा हाल. त्या चालीत संयम असला तर ठीक, घाई करायला गेले की रिपूंच्या आहारी जाणे ओघाने येते. ‘स्व’चा आहार म्हणूनच बळकट असला तर वाटेतली वावटळ निरस्त करणे अवघड ठरत नाही. या वावटळीचा क्षय घडवून आणायचा तर आशय मजबूत हवा. स्वच्या धारणा जितक्या प्रगल्भ, तितके जाणिवांचे आकाश निरभ्र. पारदर्शीता त्यात अधिक. प्रतिक्रिया ही क्रियेची उत्सर्जनावस्था असते, तसे विकारांचे विसर्जन घडवता आले तर कुविचारांचा क्षय आपोआप घडून येतो. निग्रहाचे बळ मात्र त्यासाठी असावे लागते. सद्विवेकाचा आग्रह व विचारांचा निग्रह, हेदेखील स्वला जोखण्यातून तसेच आत्म्याच्या अनुलोम विलोमातूनच साकारतात. प्राणाचा आयाम शरीराच्या नश्वर देहाचा व्यायाम घडवून आणतो तेव्हा ही ‘स्व’ची घंटी अंतरात्म्याला जागवून जाते. 

थोडक्यात वाटा वेगळ्या, पण गंतव्य एकच आहे. ‘स्व’चे म्हणजे आत्म्याचे अवलोकन. चेतनेच्या उत्सवाची तीच तर नांदी असते. तेथूनच आयुष्याचा, जगण्याच्या जीवनदर्शनाचा पडदा उघडतो. तो उघडण्यापूर्वीचे, मनाच्या विंगेतले हे कथानक ज्याला उमजले तो या रंगमंचावरचा असली हिरो. त्याला अचेतनेतील भैरवीची चिंता सतावत नाही, त्यालाच जीवन कळले असे म्हणायचे...  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या