शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भावकीचा नादच खुळा.. ..भाऊबंदकीचा खुळखुळा !

By सचिन जवळकोटे | Updated: December 2, 2018 01:48 IST

अकलूजपासून अक्कलकोटपर्यंत सर्वत्र वारसदारांचीच चलती.

- सचिन जवळकोटेजिल्ह्याच्या राजकारणाला तसा घराणेशाहीचा खूप जुना लळा. अकलूजपासून अक्कलकोटपर्यंत सर्वत्र वारसदारांचीच चलती. जिकडं-तिकडं भावकीचा नादच खुळा...परंतु सत्तेची चटक लागलेल्या घराण्यांमध्ये सुरू होतो सत्तेचा संघर्ष. रस्त्यावर येऊन पोहोचतो अंतर्गत कलहाचा थयथयाट; तेव्हा पुरता वाजतो भाऊबंदकीचा खुळखुळा.केवळ सत्तेचा आटापिटा नव्हे.... एकमेकांंना संपविण्याचा सुडाग्निशंकरची निवडणूक झाली. निकाल लागला. थोरले दादा अकलूजकर यांच्या ताब्यात अखेर बंद कारखाना गेला. धाकट्या दादांनीही जगज्जेत्याच्या आवेशात फाटक उघडलं. बंद मशिनरी बघितली. दोन्ही दादांचा परिसस्पर्श झाल्यामुळं कारखाना लवकरात लवकर सुरू होईल, ही सभासदांची भाबडी आशा.. मात्र यंदाचा हंगाम गेलाच म्हणायचा.या कारखान्यात पुढच्या वर्षाची तयारी आत्तापासूनच करावी लागेल. देणेकऱ्यांची धूळ झटकावी लागेल. मशिनरीचं ओव्हर आॅईलिंग करावं लागेल. हे होईल तेव्हा होईल,धाकट्या दादांचं ह्यराजकीय ओव्हर आॅईलिंग मात्र परफेक्ट झालं म्हणायचं. लोकसभेला इतर विरोधकाचं कांडकं पाडायला हा कारखाना कामाला आला की राव...कारण याचे सारे सभासद माढा लोकसभा मतदारसंघातच विखुरलेले नां..कधी काळी अख्ख्या जिल्ह्यावर हुकूमत गाजविणाºया अकलूजकरांची आजची राजकीय अवस्था एका वेगळ्या वळणावर. पूर्वी अकलूजमध्ये साधी टाचणी पडली तरी सोलापूरच्या झेडपीत जणू भूकंप व्हायचा. साºया पंचायत समित्या हादरून जायच्या, परंतु बाहेरून अभेद्य असलेल्या याच शिवरत्नशाहीत माजली रक्ताच्या नात्यातल्या द्वेषाची बेबंदशाही. बुलंद राजवाड्याला आतूनच गेले तडे. त्याचाच परिपाठ म्हणजे शंकरच्या रणांगणात खालच्या पातळीवर जाऊन केले गेलेले हिणकस आरोप-प्रत्यारोप. एकमेकांच्या भ्रष्टाचाराची लक्तरं अकलूजच्या वेशीवर मांडण्याची जहाल ईर्षा पाहून पुरता हबकला जिल्हा... कारण हा नव्हता केवळ सत्ता मिळविण्याचा आटापिटा. हा तर होता एकमेकांना राजकारणातून कायमचं संपविण्याचा सुडाग्नी.अण्णा की दादा ? अक्कलकोटमध्ये कार्यक्रम कॅन्सलराजकीय दुश्मनी निवडणुकीपुरतीच असावी, हा एक सामाजिक सभ्यतेचा संकेत. निकाल लागल्यानंतर विजेत्या विरोधकाला गळामिठी मारून त्यांचं कौतुक करण्याची पद्धत आपल्या सोलापूर जिल्ह्यात तशी फार जुनी. अगदी गेल्या लोकसभेला सातव्या फेरीचा ट्रेंड लक्षात येताच सुशीलकुमारांनीही म्हणे खासदार वकिलांचा मोबाईल नंबर हुडकून त्यांना स्वत:हून कॉल केलेला. अभिनंदन करून दिलदार राजकारणाचं दर्शन घडविलेलं; मात्र अशी दिलदारी आता बहुतांश ठिकाणी लोप पावत चाललीय.आता अक्कलकोटचंच उदाहरण घ्या नां. जुना शत्रू तर सोडाच, नवा तयार होणारा विरोधकही डोळ्याला खुपेनासा झालाय. इथल्या रोटरीनं एक आरोग्य शिबिराचं प्लॅनिंग केलेलं. त्यांनी सत्ताधारी पार्टीचे नेते म्हणून सचिनदादांना बोलावून आपल्या कार्यक्रमाचं कल्याण करण्याचं ठरविलं. त्यानंतर ते आमदार म्हणून सिद्धारामअण्णांकडं गेले. मात्र, ह्यपत्रिकेत एकाचंच नाव पाहिजे.समोरच्यांना बोलाविणार असेल तर मला बोलावू नका, असं अण्णांनी निक्षून सांगताच, संयोजक दचकले...जाम टरकले. शेवटी काय झालं, माहितीय का? कार्यक्रमच कॅन्सल झाला. अक्कलकोटमध्ये असे अनेक सोहळे परस्परच गायब का होऊ लागलेत.बार्शी अन् माढ्यातली दुश्मनी डेंजरचबार्शीतली खानदानी दुश्मनी तर अख्ख्या महाराष्ट्राला परिचित. दिलीपरावांच्या जिभेत जेवढी ऊर्जा, तेवढीच राजाभाऊंच्या हातात ताकद. एक सरस्वतीत माहीर तर दुसरा लक्ष्मीत तगडा. एकानं आमदारकी मिरवावी, तर दुसºयानं पालिका-बाजार समिती पटकवावी. त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी दोघांमध्ये घमासान. अनेक ठिकाणी बरोबरीचा सामना. दोघांमधून विस्तू जाण्याची कदापिही शक्यता नाही. चुकून-माकून एकाच स्टेजवर आल्यावर एकमेकांना नमस्कार करण्याचीही इथं परंपरा नाही. एकमेकांशी तोंडदेखलं बोलण्याचीही रितभात नाही. मात्र, अलीकडच्या काळात नाही म्हणायला आपल्या भाषणात एकमेकांचा उल्लेख करायला तरी सुरुवात झालीय. आयुष्यभर एकमेकांना नावं ठेवणारी मंडळी एवढं तरी नाव घेताहेत, हेही नसे थोडके. असो. उद्यापासून सुधीरभाऊ म्हणे पाण्यासाठी उपोषणाला बसताहेत. यातून त्यांचं वजन किती कमी होईल माहीत नाही; परंतु सोबतीला असणाºया आयर्नचं राजकीय वजन वाढणार हे निश्चित. डाएटींगचाच संदर्भ या राजकीय उपोषणाला द्यायचा असेल तर योगेश यांनीही पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन या ठिकाणी बसायला हरकत नाही. असो. अकलूज-मोहोळनंतर तिसºया पिढीला राजकारणात उतरविणारं गाव म्हणजे बार्शी. पाहू या...भविष्यात बाकीचे तालुके काय करतात ? तोपर्यंत आपलं काम चालूच...लगाव बत्ती !माढा तालुक्यातली राजकीय दुश्मनी तशी पिढ्यांनुसार बदलणारी. एकेकाळचे मित्र अर्थात् दोन संजय आता एकमेकांचं तोंडही बघत नसले तरी जुन्या पिढीला याच्याशी काही देणं-घेणं नसावं. नुकत्याच माढ्यात झालेल्या एका विवाह सोहळ्यात बबनदादा अन् कोकाटेंचे संजयबाबा एकत्र बसलेले. दुसरीकडं अरणचे शिवाजी अन् माढ्याचे चवरे यांच्यासोबत चक्क संजयमामा बसलेले. हे पाहून इकडं कोकाटेंनी बबनदादांना मारली कोपरखळी, ह्यबघाऽऽ दादा बघाऽऽ जुनी स्वाभिमानी गँग पुन्हा एकत्र येऊ लागलीय. जाता का तुम्हीपण तिकडं ? हे ऐकून बबनदादा शांतपणे हसत उत्तरले, ह्यत्यांना काय करायचं ते करू दे, मी आपला इथंच बरा आहे ! याचा अर्थ, जुन्या स्वाभिमानी गँगकडून बबनदादांना कसलीच भीती नसावी किंवा कुंपणापर्यंतच धाव घेऊ शकणाºया रंग बदलणाºया सरड्यांवर विश्वास तरी असावा. असो... समजलं तर ठीक. नाहीतर लगाव बत्ती !( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूर