शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:37 IST

विजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते.

- रवी टालेविजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते. नागपुरात विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर पार पडणारा सोहळा आटोपला, की आंबेडकरी जनतेचे पाय वळतात ते अकोल्याच्या दिशेने! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकायला त्यांचे कान आतूर झालेले असतात. आंबेडकरही त्यांना कधी निराश करीत नाहीत. आपल्या अनुयायांमध्ये नवी उमेद जागविण्याचे, प्रेरणा देण्याचे, विचारांचे पंख देण्याचे काम ते चोख पार पाडतात. ती शिदोरी अनुयायांना वर्षभर पुरते.गत काही वर्षात, भारिप-बहुजन महासंघाच्या अकोल्यातील सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास थोडे अपयशाचे डाग लागले. स्वत: आंबेडकरांना १९९९ नंतर सलग तीनदा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोला जिल्हा परिषद त्यांच्याच ताब्यात असली तरी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून येऊ शकला. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यावेळी अनुयायांना कोणती दिशा देतात, कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे केवळ त्यांच्या अनुयायांचेच नव्हे, तर राजकीय विरोधक व प्रसारमाध्यमांचेही लक्ष होते.आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात निवडणुकांबाबत थेट भाष्य केले नाही; परंतु पुरेसे संकेत मात्र दिले. नरेंद्र मोदी सरकार हे हिंदूंचे नव्हे, तर मनुवाद्यांचे सरकार असल्याचे त्यांचे वक्तव्य, सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास पुढे नेण्याचेच सूतोवाच म्हणता येईल. हक्काच्या नवबौद्ध मतांना अठरापगड जातींच्या मतांची जोड देऊन, प्रस्थापितांना धोबीपछाड देण्याच्या आंबेडकरांच्या प्रयोगास १९८४ नंतर अकोल्यात चांगले यश लाभले. पुढे राम जन्मभूमी आंदोलनाच्या पाठीवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले आणि बहुजन समाज भाजपाकडे वळत गेला. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर हिंदुत्वाला विकासाच्या मुद्याची जोड देऊन भाजपाने बहुजन मतपेढीसोबतच, अल्प प्रमाणात का होईना दलित मतपेढीवरही डल्ला मारला. भारिप-बहुजन महासंघाची झालेली पिछेहाट हा त्याचाच परिपाक होता. गत काही दिवसांपासून मात्र विकासाच्या मुद्यावर भाजपाकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे. या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आंबेडकरांमधील निपुण राजनीतिज्ञाने जाणले आणि तुम्ही ज्याला हिंदुत्ववादी सरकार समजता ते प्रत्यक्षात मनुवादी सरकार असल्याचा संदेश बहुजन समाजाला देण्याचा प्रयत्न केला. ते करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भलामण करून काँग्रेसलाही संदेश दिला. अकोल्यात आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्यास भाजपाचा विजय दुष्कर होतो हा इतिहास आहे; पण सामाजिक अभियांत्रिकीच्या आंबेडकरांच्या प्रयत्नास कितपत यश लाभते, हे कळण्यासाठी आगामी निवडणुकांपर्यंत प्रतीक्षाच करावी लागेल.

ravi.tale@lokmat.com