शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:37 IST

विजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते.

- रवी टालेविजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते. नागपुरात विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर पार पडणारा सोहळा आटोपला, की आंबेडकरी जनतेचे पाय वळतात ते अकोल्याच्या दिशेने! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकायला त्यांचे कान आतूर झालेले असतात. आंबेडकरही त्यांना कधी निराश करीत नाहीत. आपल्या अनुयायांमध्ये नवी उमेद जागविण्याचे, प्रेरणा देण्याचे, विचारांचे पंख देण्याचे काम ते चोख पार पाडतात. ती शिदोरी अनुयायांना वर्षभर पुरते.गत काही वर्षात, भारिप-बहुजन महासंघाच्या अकोल्यातील सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास थोडे अपयशाचे डाग लागले. स्वत: आंबेडकरांना १९९९ नंतर सलग तीनदा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोला जिल्हा परिषद त्यांच्याच ताब्यात असली तरी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून येऊ शकला. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यावेळी अनुयायांना कोणती दिशा देतात, कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे केवळ त्यांच्या अनुयायांचेच नव्हे, तर राजकीय विरोधक व प्रसारमाध्यमांचेही लक्ष होते.आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात निवडणुकांबाबत थेट भाष्य केले नाही; परंतु पुरेसे संकेत मात्र दिले. नरेंद्र मोदी सरकार हे हिंदूंचे नव्हे, तर मनुवाद्यांचे सरकार असल्याचे त्यांचे वक्तव्य, सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास पुढे नेण्याचेच सूतोवाच म्हणता येईल. हक्काच्या नवबौद्ध मतांना अठरापगड जातींच्या मतांची जोड देऊन, प्रस्थापितांना धोबीपछाड देण्याच्या आंबेडकरांच्या प्रयोगास १९८४ नंतर अकोल्यात चांगले यश लाभले. पुढे राम जन्मभूमी आंदोलनाच्या पाठीवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले आणि बहुजन समाज भाजपाकडे वळत गेला. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर हिंदुत्वाला विकासाच्या मुद्याची जोड देऊन भाजपाने बहुजन मतपेढीसोबतच, अल्प प्रमाणात का होईना दलित मतपेढीवरही डल्ला मारला. भारिप-बहुजन महासंघाची झालेली पिछेहाट हा त्याचाच परिपाक होता. गत काही दिवसांपासून मात्र विकासाच्या मुद्यावर भाजपाकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे. या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आंबेडकरांमधील निपुण राजनीतिज्ञाने जाणले आणि तुम्ही ज्याला हिंदुत्ववादी सरकार समजता ते प्रत्यक्षात मनुवादी सरकार असल्याचा संदेश बहुजन समाजाला देण्याचा प्रयत्न केला. ते करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भलामण करून काँग्रेसलाही संदेश दिला. अकोल्यात आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्यास भाजपाचा विजय दुष्कर होतो हा इतिहास आहे; पण सामाजिक अभियांत्रिकीच्या आंबेडकरांच्या प्रयत्नास कितपत यश लाभते, हे कळण्यासाठी आगामी निवडणुकांपर्यंत प्रतीक्षाच करावी लागेल.

ravi.tale@lokmat.com