शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शेतकऱ्यांना सहा हजार; हा तर चुनावी जुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 01:25 IST

पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतकºयांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली.

- राजू शेट्टी(स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते)पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतक-यांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली. आम्हीही त्याला भुललो; परंतु अनेक चांगल्या गोष्टी करता येणे शक्य असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती व शेतकºयांसाठी काही केले नाही.आता हा वर्ग खवळला आहे व तो येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असे वाटल्यानेच केंद्र सरकारने शेतकºयाला सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हा निर्णयही चुनावी जुमला आहे. गेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देतो, असे आश्वासन याच सरकारने दिले होते व नंतर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी व ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी ‘तो एक चुनावी जुमला होता,’ असे जाहीर केले. त्यामुळे या सहा हजारांचाही ‘चुनावी जुमला’च होणार अशी भीती वाटत आहे. हा अर्थसंकल्प मतदारांना लालूच दाखविणारा व भाजपला मतदान करणाºया मध्यमवर्गीय जनतेचे हित साधणारा आहे.शेतमालाच्या दरावरच नियंत्रण का?सरकारने अर्थसंकल्प मांडताना महागाई नियंत्रणात आणली म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली; परंतु त्यांनी महागाई नियंत्रणात आणताना इंधनाचे दर, साबण-सोडा, कपडालत्ता यांचे दर नियंत्रणात आणले नाहीत; तर आणले ते फक्त शेतमालाचे दर. गेल्या निवडणुकीत याच मोदी सरकारने आम्ही शेतकºयांना दीडपट हमीभाव देतो, असे गाजर दाखविले व नंतर न्यायालयात तसे देता येणार नाही, असे लिहून दिले. साखर, वस्त्रोद्योग व प्रक्रिया यांबद्दल या अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद नाही. दीडपट हमीभाव द्यायचा राहू दे, जो हमीभाव सरकारनेच निश्चित केला आहे, तोदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत व त्याबद्दल या पंतप्रधानांना काहीच वाटत नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी