शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेपेक्षा श्रेयवादाची एक्स्प्रेस सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:33 IST

मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर या ३५४ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला अंतिम मान्यता मिळाल्याने खान्देशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. आता या मार्गाच्या श्रेयावरून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि भाजपाचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांच्या गटात सुरू झालेला विवाद हा अशोभनीय असा आहे.

मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर या ३५४ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला अंतिम मान्यता मिळाल्याने खान्देशच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे. आता या मार्गाच्या श्रेयावरून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि भाजपाचे धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांच्या गटात सुरू झालेला विवाद हा अशोभनीय असा आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. गडकरी यांच्याकडील शिपिंग मंत्रालयाने या मार्गासाठीची ६ हजार १८५ कोटींची तरतूद स्वनिधीतून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने रेल्वे मंत्रालय, महाराष्टÑ व मध्य प्रदेश सरकारला आर्थिक तोशीस लागणार नाही. असे नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत निश्चित झाले आहे. लवकरच या मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. हा मार्ग व्हावा यासाठी सर्वपक्षीय नेते, विविध व्यावसायिक, नागरिक, सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांनी अनेक वर्षे आंदोलने केली. प्रत्येक निवडणुकीत या रेल्वे मार्गाचा प्रचाराचा मुद्दा असायचा.धुळेकर तर हा मार्ग होईल, यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. परंतु डॉ.सुभाष भामरे हे केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झाले आणि त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रश्नाला गती दिली. भामरे यांच्या निमंत्रणावरून दोन महिन्यांपूर्वी प्रभू धुळ्यात आले आणि त्यांनी या रेल्वे मार्गाची घोषणा केली. रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केल्याने धुळेकरांना आनंद झाला.अचानक प्रभू यांच्याकडील रेल्वे मंत्रालय काढले गेले. पुन्हा या रेल्वेमार्गाविषयी अनिश्चितता पसरली. श्रेयवादातून पुन्हा नकारात्मक वातावरण तयार होऊ लागले. माहिती अधिकारात रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीचा वापर करीत संभ्रम वाढविला गेला. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे हा मार्ग होणारच, असा विश्वास भाजपा कार्यकर्ते देत होते. पण अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता धुळेकर संभ्रमात होते.नवी दिल्लीत गडकरी यांनी महाराष्टÑाच्या जलसंपदा, जहाजबांधणी या विषयांशी संबंधित प्रश्नांसाठी बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्याचवेळी भामरे हे संरक्षणविषयक परिषदेसाठी कॅनडाला गेले होते. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित नव्हते. आमदार अनिल गोटे मात्र हजर होते. त्यामुळे भामरे नव्हे, तर आमच्यामुळे हा मार्ग मंजूर झाला, असा दावा गोटे आणि त्यांचे समर्थक आता करीत आहेत. तर भामरे समर्थकांकडून गोटेंचा या मार्गाला असलेला विरोध, त्यांनी या रेल्वेमार्गाविषयी केलेला अपप्रचार याविषयी दाखल्यांसह माहिती प्रसारित होत आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर दोन्ही सुजाण लोकप्रतिनिधींच्या समर्थकांकडून होणारी ही श्रेयवादाची लढाई धुळेकरांना रुचणारी नाही. आता कुठे रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. भूसंपादन, उभारणी हे सगळे बाकी असताना त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याऐवजी एकाच पक्षातील दोन लोकप्रतिनिधींमध्ये अशा प्रकारे श्रेयवाद रंगणे हे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने योग्य नाही. भामरे सेनेतून तर गोटे लोकसंग्राममधून या निवडणुकीत भाजपामध्ये आले आहेत, त्यामुळे निष्ठावंत मंडळी कुंपणावर बसून या वादाकडे बघ्याची भूमिका घेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते मात्र या लढाईतून करमणूक करून घेत आहेत.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे