शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘खिचडी’ शिजविणाऱ्या शिक्षकांनीच आता ‘पराठे’ही लाटावे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:28 IST

शालेय पोषण आहारात खिचडीसोबत ‘मल्टिग्रेन’ मेन्यू वाढण्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. पण या प्रक्रियेत अनंत अडचणी आहेत, त्यांचे काय?

- बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, लोकमत, नागपूर

अधिकाऱ्यांची गाडी शाळेत धडकते. ते थेट  किचनकडे वळतात. स्वच्छता असली तर बरे; नाहीतर मुख्याध्यापक, शिक्षकांवर खापर फुटलेच समजा ! अधिकारी पुन्हा खिचडीच्या चवीवर येतात. शाळेची गुणवत्ता, पटसंख्या याबाबत ‘ब्र’ उच्चारत नाहीत. अळ्या निघाल्या की गुरूजी जबाबदार, विषबाधा झाली की मुख्याध्यापक, शिक्षक जबाबदार. अळ्या असलेले धान्य पुरविणाऱ्या कंत्राटदारांना मात्र कुरणात चरूनही रान मोकळे. 

पोषण आहाराच्या कामात भरडला जातोय तो मुख्याध्यापक, शिक्षक. रोजचा आहार बनविणे, रोजची कमी-जास्त होणारी पटसंख्या हा हिशोब ठेवत सगळे सोपस्कार करणे सोपे काम नाही. शालेय पोषण आहाराच्या ‘खिचडी’वरून काय काय झालं, याची उदाहरणं दिली तर ही ‘खिचडी’ पचलेलीच नाही. पचली ती यंत्रणेलाच. हाच या योजनेचा मतितार्थ निघेल. केंद्र असो की राज्य सरकार, योजना चांगल्या आणते. पण पुढे त्या यंत्रणेमार्फत राबविताना त्याची ‘खिचडी’ होते, हे खरे !

सरकारी शाळेत गुणवत्ता नाही म्हणून आज पटसंख्या कमी होत आहे. हीच चिंता सरकारला सतावत असल्याने भविष्यात सरकारी शाळा बंद पडू नयेत म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. पोषण आहारातले ‘पोषण’ वाढविण्यासाठी आता  इडली, पराठे, भगर वगैरे देण्याबाबतचा मनोदय सरकारने  व्यक्त केला आहे. तो अंमलात येईलही. सरकारने ग्रामीण भागातील लेकरांसाठी अन्नछत्र उघडावे, याला शिक्षकांचा अजिबात विरोध नाही. मात्र, यासाठी वेगळी यंत्रणा उभी करायला हवी. कारण अगोदरच शालेय पोषण आहाराचा दैनंदिन हिशोब ठेवून, लिहून शिक्षक पूर्णत: मेटाकुटीला आला आहे. आता इडली, पराठ्यासह धान्य धान्यादीचा हिशोब, दर्जा, त्याची चव, शिजविणाऱ्या यंत्रणेवरील नियंत्रण या सगळ्यात  शंभर टक्के ‘आचार्या’चे ‘आचारी’ होणार आहेत. सरकारला डी. एड्., बी. एड्., एम. एड्. केलेल्या सरकारी शिक्षकांकडूनच जर हे काम करून घ्यायचे असेल तर सरकारी शाळेतील मुलांच्या गुणवत्तेची अपेक्षा  कशाला करावी? 

अनेक खासगी शाळांत वर्गाला शिक्षक आहेत, सेवक आहेत. शिजविणारी यंत्रणा भक्कम आहे. स्वतंत्र किचनशेड आहेत. त्यांना पोषण आहार पुरविताना वा पोषण आहाराचा हिशोब ठेवताना किंवा शिजविणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवताना शिक्षकांना वेठीस धरण्याची गरज भासत नाही. उलट सरकारी शाळेत शिक्षकच मुख्याध्यापक, शिक्षकच सेवक, कारकून व शिक्षकच पोषण आहार योजनेचा नियंत्रक असतो. या शिक्षकाने  शिकवायचे कधी, हा प्रश्न सरकारला का पडत नाही? 

- आता तर ‘मल्टीग्रेन’ पोषणशक्ती देताना गुरूजींची नव्याने कसोटी लागणार आहे.  सध्या पोषण आहारात पुरविला जाणारा मेन्यूही चांगलाच आहे. मात्र, त्यासाठी मिळणारे धान्य आणि इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. पुरवठादार आपली मलई राखून ठेवण्यासाठी काही अर्थपूर्ण वाटेकरी मिळवतो. त्यामुळे शाळेपर्यंत पोहोचणारे तांदूळ, चणे, वाटाणे, मसूर, तूरडाळ, मूगडाळ, चटणी, मीठ अतिशय हलक्या दर्जाचे असते.  मुलांचे भरण होते, मात्र पोषणाच्या नावाने नन्नाच ! ज्यांच्याकडून पराठे, इडली आणि भगर बनवून घेतली जाण्याच्या योजना आखल्या जात आहेत, ते पोषण आहार कर्मचारी, त्यांना मिळणारे मानधन याचा विचार कोण करणार? आतापर्यंत फक्त दीड हजार रुपये महिना मानधनावर हे स्वयंपाकी आणि मदतनीस राबायचे ! आता या सत्रापासून त्यांना अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे. इतक्या कमी मानधनात त्यांच्याकडून पोषण आहात शिजविणे, त्याचे वाटप करणे, मुलांची ताटे आणि भांडी धुणे, शाळेचे वर्ग, कार्यालय, मैदान  स्वच्छता करणे ही कामे करून घेतली जातात.  पोषण आहार कर्मचारी सध्या सर्वात कमी मानधन घेणारे सरकारी वेठबिगार ठरले आहेत, हे वास्तव कसे नाकारता येईल ? ग्रामीण भागासाठी आणि शहरातील सरकारी शाळांसाठी ही योजना चांगली असली, तरी शहरी अनुदानित शाळांसाठी ही योजना निव्वळ डोकेदुखी आहे. शिवाय भ्रष्टाचाराचे मोठे कुरण आहे. योजनेतील भ्रष्टाचार संपवून ही योजना अधिक प्रभावी आणि परिणामकारक करता आली तरी ती आहे तशीही चांगलीच आहे. balaji.devarjanker@lokmat.com

टॅग्स :Schoolशाळा