शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

डोंगरातील वस्त्या मृत्यूच्या छायेत

By admin | Updated: July 1, 2016 04:56 IST

दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात.

दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. पावसाळ्यात तर डोंगर कपारीत राहणारी कुटुंबे मृत्यूच्या छायेतच जगत असतात.यंदाचा भीषण दुष्काळाचा उन्हाळा सरला पावसाळा सुरु झाला. पण या दुष्काळातून महाराष्ट्र अजूनही बाहेर पडलेला नाही. मात्र विदर्भ मराठवाड्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावून दुष्काळग्रस्त भागाला थोडाफार दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोकणातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसापाठोपाठ डोंगर खचण्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली येथे बुधवारी घडली, त्यामुळे डोंगरावरील एका घराची भिंत कोसळली. जीवितहानी किंवा मोठे नुकसान नसले तरी या घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची आठवण ताजी करुन देताना प्रशासनालाही खडबडून जागे केले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावावर ३० जुलै २०१४ रोजी अस्मानी कहर कोसळला होता. डोंगराचा कडा गावावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर राज्यातील डोंगरमाथ्यावरील तसेच डोंगरालगत राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित झाला. तत्पूर्वीही डोंगर खचणे, त्याखाली घरे किंवा कुटुंबे गाडली जाणे अशा घटना घडतच होत्या. विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या घडल्या होत्या. बुधवारी ज्या तालुक्यातील डोंगर खचला त्याच तालुक्यातील काळसे गावात २००५मध्ये डोंगराचा कडा कोसळून घरावर एक कुटुंबच त्याखाली गाडले गेले होते. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात डोंगरकडे धोकादायक म्हणून प्रशासनाने घोषित केले आहेत. त्या ठिकाणी राहाणाऱ्या कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. देवली-वाघवडे हे गावही त्यामध्ये येते. तेथील ४० कुटुंबांना अशा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील सहा कुटुंबाना तातडीने बुधवारी हलविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बडदहसोले आणि शिवणे बुद्रुक ही दोन गावेही अशीच डोंगरात राहतात. वडद हसोले येथे सहा वर्षापूर्वी डोंगर कोसळून एकाच कुटुंबातील आठ जण मृत्युमुखी पडले होते. शिवणे बुद्रुक येथेही रस्त्यात, जमिनीत भेगा पडणे, जमिनीतून आवाज येणे अशा घटना अधून मधून घडत असतात. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळील राजेवाडी येथे २०१० मध्येही डोगराचा कडा घरावर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडले होते. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, सातारा तालुक्यातील सुमारे १५ हून अधिक गावे अशीच डोंगर कपारीत राहतात. त्यातील पांढरेपाणी हे गाव तर डोगराच्या शिळेखालीच राहात असल्याने नेहमी मृत्युच्या छायेत असते. वास्तविक दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटनांचे प्रमाण अधिक असते. अशा डोंगर कपारीत राहणारी कुटुंबेही नेहमीच मृत्युच्या छायेत जगत असतात. त्यात अशी एखादी दुर्घटना घडली की ती कुटुंबे उद्ध्वस्त होऊन जातात. दैवी कोप समजून दैवालाच दोष देत राहातात. यामुळे डोगरांवर किंवा डोंगरालगतच्या गावांना, विशेषत: प्रशासनाने जे डोंगर धोकादायक म्हणून निश्चित केले आहेत, तेथील कुटुंबाना पर्यायी जागा देऊन त्यांचे तातडीने पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अगदी माळीण गावाचेही अद्याप १०० टक्के पुनर्वसन झालेले नाही. नित्यनेमाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित कुटुंबाना नोटिसा बजावल्या जातात. सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले जाते आणि ते केले की आपली जबाबदारी संपल्याच्या आविर्भावात प्रशासन राहाते. एखादी दुर्घटना घडली की मगच ते खडबडून जागे होते. उपाय योजना, पुनर्वसन यावर चर्चा सुरु होते, घोषणा केल्या जातात. पण अंमलबावणीत घोडे अडते व ये रे माझ्या मागल्या सुरू राहाते. - वसंत भोसले