शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरातील वस्त्या मृत्यूच्या छायेत

By admin | Updated: July 1, 2016 04:56 IST

दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात.

दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. पावसाळ्यात तर डोंगर कपारीत राहणारी कुटुंबे मृत्यूच्या छायेतच जगत असतात.यंदाचा भीषण दुष्काळाचा उन्हाळा सरला पावसाळा सुरु झाला. पण या दुष्काळातून महाराष्ट्र अजूनही बाहेर पडलेला नाही. मात्र विदर्भ मराठवाड्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावून दुष्काळग्रस्त भागाला थोडाफार दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोकणातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसापाठोपाठ डोंगर खचण्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली येथे बुधवारी घडली, त्यामुळे डोंगरावरील एका घराची भिंत कोसळली. जीवितहानी किंवा मोठे नुकसान नसले तरी या घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची आठवण ताजी करुन देताना प्रशासनालाही खडबडून जागे केले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावावर ३० जुलै २०१४ रोजी अस्मानी कहर कोसळला होता. डोंगराचा कडा गावावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर राज्यातील डोंगरमाथ्यावरील तसेच डोंगरालगत राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित झाला. तत्पूर्वीही डोंगर खचणे, त्याखाली घरे किंवा कुटुंबे गाडली जाणे अशा घटना घडतच होत्या. विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या घडल्या होत्या. बुधवारी ज्या तालुक्यातील डोंगर खचला त्याच तालुक्यातील काळसे गावात २००५मध्ये डोंगराचा कडा कोसळून घरावर एक कुटुंबच त्याखाली गाडले गेले होते. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात डोंगरकडे धोकादायक म्हणून प्रशासनाने घोषित केले आहेत. त्या ठिकाणी राहाणाऱ्या कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. देवली-वाघवडे हे गावही त्यामध्ये येते. तेथील ४० कुटुंबांना अशा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील सहा कुटुंबाना तातडीने बुधवारी हलविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बडदहसोले आणि शिवणे बुद्रुक ही दोन गावेही अशीच डोंगरात राहतात. वडद हसोले येथे सहा वर्षापूर्वी डोंगर कोसळून एकाच कुटुंबातील आठ जण मृत्युमुखी पडले होते. शिवणे बुद्रुक येथेही रस्त्यात, जमिनीत भेगा पडणे, जमिनीतून आवाज येणे अशा घटना अधून मधून घडत असतात. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळील राजेवाडी येथे २०१० मध्येही डोगराचा कडा घरावर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडले होते. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, सातारा तालुक्यातील सुमारे १५ हून अधिक गावे अशीच डोंगर कपारीत राहतात. त्यातील पांढरेपाणी हे गाव तर डोगराच्या शिळेखालीच राहात असल्याने नेहमी मृत्युच्या छायेत असते. वास्तविक दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटनांचे प्रमाण अधिक असते. अशा डोंगर कपारीत राहणारी कुटुंबेही नेहमीच मृत्युच्या छायेत जगत असतात. त्यात अशी एखादी दुर्घटना घडली की ती कुटुंबे उद्ध्वस्त होऊन जातात. दैवी कोप समजून दैवालाच दोष देत राहातात. यामुळे डोगरांवर किंवा डोंगरालगतच्या गावांना, विशेषत: प्रशासनाने जे डोंगर धोकादायक म्हणून निश्चित केले आहेत, तेथील कुटुंबाना पर्यायी जागा देऊन त्यांचे तातडीने पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अगदी माळीण गावाचेही अद्याप १०० टक्के पुनर्वसन झालेले नाही. नित्यनेमाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित कुटुंबाना नोटिसा बजावल्या जातात. सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले जाते आणि ते केले की आपली जबाबदारी संपल्याच्या आविर्भावात प्रशासन राहाते. एखादी दुर्घटना घडली की मगच ते खडबडून जागे होते. उपाय योजना, पुनर्वसन यावर चर्चा सुरु होते, घोषणा केल्या जातात. पण अंमलबावणीत घोडे अडते व ये रे माझ्या मागल्या सुरू राहाते. - वसंत भोसले