शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Shankar Bhau Patil: शिवशंकरभाऊ : मातीत रुजलेल्या समर्पणाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 05:51 IST

Shiv Shankar Bhau Patil: शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निस्पृह जीवनाची सार्थक वाटचाल त्यांच्या निधनाने विसावली आहे...

- - राजेश शेगोकार(उपवृत्त संपादक, लोकमत, अकोला)दर शुक्रवारी शेगावातील संत गजानन महाराज संस्थानमधील दान पेट्या उघडल्या जातात. मंदिराच्या परिसरातच असलेल्या पाठशाळेत विश्वस्त व दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या उपस्थितीत भक्तांनी दिलेले दान माेजले जाते. दानपेटीत निघालेले साेने, चांदी, हजार पाचशेच्या नाेटा, वेगवेगळ्या केल्या जात असताना एका व्यक्तीचे लक्ष मात्र या दानपेटीत आलेल्या दहा, वीस व पंचवीस पैशांच्या नाण्यांकडे असते, ही नाणी दिसली म्हणजे एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पसरताे... जाेपर्यंत दानपेटीत ही नाणी येतील ताेपर्यंत संस्थानच्या सेवाकार्यावरील गरिबांचा विश्वास कायम राहील, अशी धारणा असलेली ती व्यक्ती म्हणजे संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील. त्यांच्या लेखी सामान्य भक्तांनी दिलेले हे दान संस्थानसाठी ‘लाख’मोलाचेच राहिले. कारण अशा भक्तांच्या श्रद्धेतूनच संस्थानचा आदर्शवत डोलारा उभा राहिला. या संस्थेच्या उभारणीसाठी सामान्य भक्तांनी दिलेला खारीचा वाटा सदैव लक्षात ठेवूनच उपक्रम राबविले जातात. त्यामुळे हे संस्थान इतकं चांगलं व्यवस्थापन कसे काय करू शकते, हा कुतूहलाचा विषय झाला आहे. हे सर्व शक्‍य झाले ते केवळ  शिवशंकरभाऊ पाटील यांच्या दूरदृष्टी व्यक्तिमत्त्वामुळेच. भाऊ म्हणजे व्यवस्थापनाचे चालतेबोलते आदर्श विद्यापीठ. पांढरे शुभ्र धोतर, सदरा, डोक्यावर गांधी टोपी अन्‌ गळ्यात पांढरा रुमाल अशा वेशातील भाऊंनी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले, पूर्णत्वास नेले. पण, कोटीच्या कोटी उड्डाणे त्यांच्यातील साधूवृत्तीला कधीही विचलित करू शकले नाहीत. कारण सर्वसामान्य भक्तांच्या कष्टाच्या पाच-दहा पैशाचे मूल्य त्यांनी जाणले... त्यामुळे एकेकाळी केवळ ४५ लाखांचे उत्पन्न असलेले श्री संत गजानन महाराज संस्थानचे बजेट आता दाेनशे काेटींच्या घरात पोहोचले आहे. मात्र, तरीही संस्थानमध्ये सोन्या-चांदीचा झगमगाट नाही तर मानवतेचा व सेवेचा भाव पदोपदी दिसून येतो तो केवळ शिवशंकरभाऊ नावाच्या विद्यापीठामुळेच. १९५८पासून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या सेवेत सेवाधारी असलेले भाऊ, १९६२ मध्ये विश्‍वस्त झाले व १९७८ मध्ये व्यवस्थापक झाले. संस्थानच्या सेवेत येण्यापूर्वी भाऊ राजकारणाचाही दरवाजा ठोठावून  आले. थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी केलेल्या विकासकामांची आजही चर्चा होते. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांना विधानसभा किंवा लोकसभेची उमेदवारी देऊ केली होती. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कुठल्याही नेत्यासाठी ही सुवर्णसंधी होती. मात्र, हा माझा मार्ग नाही, असे ठामपणे सांगत भाऊंनी सेवावृत्ती निवडली ती आयुष्याच्या अखेरपर्यंत जपली. भाऊंनी व्यवस्थापनशास्त्रालाही अचंबित होईल असे विश्‍व उभारले आहे. ‘आनंद सागर’ हा त्यातीलच एक उपक्रम. या प्रकल्पाचे काम सुमारे १५ वर्षे चालेल व किमान ३०० ते ५०० कोटींचा खर्च येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. संस्थेकडे तेव्हा केवळ ३० लाख शिल्लक होते. त्यामुळे आनंद सागरसाठी बँकेचे १५ कोटी रुपये कर्ज घेऊन केवळ तीन वर्षात म्हणजे २५ कोटीमध्ये प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचे  व संस्थानचे व्यवस्थापन पाहून जागतिक कीर्तीचे विक्रम पंडित यांनासुद्धा भुरळ पडली व आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपली सेवा रुजू केली. त्यांनी ७०० कोटी रुपये देऊ केले, मात्र भाऊंनी आराेग्य याेजनेचा आराखडा तयार करत फक्त ७० कोटी रुपये घेतले. त्याची परतफेड केली. शंकरबाबा पापळकर या शेकडाे अनाथांच्या बापाला त्यांचा मदतीचा हात सतत मिळाला; पण भाऊंनी कुठेही गवगवा केला नाही, देवावर श्रद्धा नसलेले बाबा आमटेही भाऊंच्या कामाने प्रभावित झाले हाेते. शेगावातील यात्राेत्सवात लाखाे भाविक येतात, मात्र कुठेही अव्यवस्था दिसून येत नाही. प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मिळेलच याची खात्री असते. अतिशय कमी खर्चात निवासव्यवस्था, मोफत प्रवासव्यवस्था, नाममात्र शुल्कामध्ये वैद्यकीय उपक्रम हे सारे प्रकल्प राबविताना जे व्यवस्थापनशास्त्र वापरले गेले आहे तो पॅटर्न देशभरात कुठल्याही संस्थेत दिसत नाही. संत गजानन महाराजांच्या जुन्या मंदिराचा जीर्णाेद्धार करताना संपूर्ण मंदिरच बदलले; पण एकही दिवस दर्शन व्यवस्था बंद नव्हती व कुठेही बांधकामाचा मलबा दिसून आला नाही,  संस्थानने पंढरपूर व त्र्यंबकेश्वर येथे श्रींचे मंदिर उभारले. कपिलधारा, आळंदी, ओंकारेश्वर, गिरडा आदी ठिकाणी शाखा सुरू केल्या. संस्थानच्या या प्रत्येक शाखेत तीच शिस्त, तोच सेवाभाव व तीच व्यवस्था दिसून येते.  माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेत उभारलेले अभियांत्रिकी महाविद्यालय जसे नव्या युगाचे प्रतीक करण्याचे तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविलेल्या प्रकल्पांसोबतच आज सातपुड्यातील आदिवासींची संपूर्ण पिढी शिक्षित करण्याचे श्रेयसुद्धा शिवशंकरभाऊ यांनाच जाते. मनाचा पवित्रपणा अन्‌ सेवेची वृत्ती यामधूनच व्यवस्थापन गुरू कसा असावा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांच्या कार्याचे भाविकांना कायम स्मरण राहील. 

टॅग्स :ShegaonशेगावAkolaअकोला