शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेवग्याचं झाड आणि म्हातारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:54 PM

​​​​​​​दादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले.

- अतुल कुलकर्णीदादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले. म्हातारी दिसली की तिला म्हणाले, चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हातारीला पण काम नव्हते. ती म्हणाली सांगा आणि दादासाहेब सुरू झाले. एका गावात एक सुखी कुटुंब राहत होते. सगळे भाऊ-बहीण गुण्यागोविंदाने नांदत होते. त्या घरात एकेदिवशी एक साधू आला. त्याने घरात दोन-चार दिवस मुक्काम केला. घरातले कर्ते पुरुष सकाळी उठायचे. परसबागेत शेवग्याच्या शेंगाचे झाड होते. घरातल्या तरुणांचा एकच कार्यक्रम असे. सकाळी उठून झाडाजवळ जायचे. शेंगा तोडायचे. बाजारात नेऊन शेंगा विकायच्या आणि येणाऱ्या पैशात घरचं सामानसुमान घेऊन ते परत यायचे. ते पाहून साधूने त्या तरुणाला विचारले...बाबारे हे किती दिवस चालूयं?- अनेक वर्षांपासून चालूयं.पण तुम्हाला दुसरं नवीन काही करावं असं वाटत नाही का? किती दिवस याच झाडाच्या शेंगा तोडत आयुष्य काढणार? त्यावर त्या तरुणाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तो म्हणाला, चालूयं. आता तर माझा मुलगादेखील याच झाडाच्या शेंगा तोडायला मदत करतो आणि तो पण माझ्यासोबत बाजारात येतो. तोही या झाडावरच गुजराण करतो. साधू काही बोलला नाही. रात्री सगळे झोपल्यावर साधूने शेवग्याच्या झाडाखाली अ‍ॅसिड टाकले. झाड उभ्या उभ्या जळून गेले. सकाळी सगळे उठले. शेंगा तोडायला गेले तर झाडं कोसळले. होत्या तेवढ्या शेंगा सगळ्यांनी तोडून घेतल्या आणि दुसºया दिवसापासून सगळे काम शोधायला लागले. कुणी कुठे तर कुणी कुठे काम शोधू लागले. कालांतराने तोच साधू पुन्हा त्या गावात आला. तरुणांनी त्या साधूला ओळखले. प्रेमाने घरी नेले आणि सांगितले, तुम्ही झाड तोडले म्हणून आम्ही हातपाय हलवू शकलो. नाही तर आम्ही आहे त्याच ठिकाणी राहिलो असतो...तात्पर्य काय माहिती आहे का म्हातारे... असं म्हणत दादासाहेब म्हणाले, म्हातारे, कलियुगातही असचं आहे. साचलेल्या संचितावर किती दिवस काढायचे...? कधी ना कधी साचलेले धन संपते, जमा केलेले पाणी संपते... मात्र वाहते पाणी आणि सतत येणारे धन कधी संपत नाही. हे त्यांना कळाले नाही म्हणून त्या साधूने ते झाडंच तोडून टाकले. पण झाड तोडणं हा काही उपाय नाही ना म्हातारे... तूच सांग बरं...त्यावर म्हातारी हसली आणि म्हणाली, गोष्ट चांगली, तात्पर्यही चांगले पण आपल्याकडे कोणत्या राजकीय पक्षाला हे लागू होते सांग बरं... दादासाहेब हसले आणि म्हणाले, तूच सांग... त्यावर म्हातारी हसत हसत म्हणाली, काँग्रेसला लागू होते का रे ही गोष्ट...? त्यांच्या पक्षातले लोकही असेच भारी. नवीन काही करायचे नाही, त्यांना वाटते अजूनही लोक हातावरच ठप्पा मारतात. म्हणून ते दुसरं काही नवीन करण्याची इच्छाच ठेवत नाहीत. जे आहेत तेही आपापसात एकमेकांना कसं कोंडीत पकडता येईल त्याच कामावर असतात... म्हणून विचारते... त्यावर दादासाहेब म्हणाले, म्हातारे, ही गोष्ट राष्टÑवादी पक्षाला लागू होते की नाही...? तेही तसेच असं नाही वाटत... त्यावर म्हातारी म्हणाली, मी काय बोलणार...? काही लोकांना स्वत:च झाड आहे असं वाटतं....

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस