शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

सांस्कृतिक विकेंद्रीकरणाला गती देणारा कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 06:31 IST

भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे.

- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे. ते नोव्हेंबर महिन्यात १000 एकपात्री नाट्य कारकीर्द साजरी करीत आहेत.आजवर सांस्कृतिक चळवळ ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, मद्रास आदी महानगरांपुरतीच मर्यादित होती याचा अर्थ देशाच्या अन्य भागात सांस्कृतिक चळवळ रुजलेली नव्हती असे नाही. पण तेथील कलावंतांना अभावानेच राष्ट्रीय रंगमंच उपलब्ध झाला. शेखर सेन हे संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सांस्कृतिक चळवळ ही जिल्हा, तालुका पातळीवर नेली. आजवर शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि नाटक यांचाच वरचष्मा सांस्कृतिक घडामोडींवर होता; पण शेखर सेन यांनी आदिवासी वाड्यापाड्यावरील लोककलावंतांना श्रेष्ठ भारत संस्कृती समागमसारख्या चळवळीत सामावून घेतले. इतकेच नव्हेतर, देशातील शिखरस्त सर्व कलावंत आणि अभ्यासक यांचे मंडळीकरण श्रेष्ठ भारत संस्कृती समागम या उपक्रमाद्वारे साध्य केले.तुलसी, कबीर, विवेकानंद, सुरदास आणि साहेब हे एकपात्री प्रयोग त्यांनी सादर करून इतिहास घडविला आहे़ १९९७ साली त्यांनी तुलसी या एकपात्री प्रयोगाचे लेखन केले. कारण तुलसीदास यांच्या रामायणाने शेखर सेन प्रभावित झाले होते. जणू तुलसीदास यांनी स्वप्नात येऊन शेखर सेन यांना साक्षात्कार दिला की काय? असे वाटावे. कारण त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात तुलसी हा एकपात्री प्रयोग लिहिला आणि ‘धर्मयुग’चे संपादक डॉ. धर्मवीर भारती यांच्यापुढे त्यांनी तुलसीचे वाचन केले. डॉ धर्मवीर भारतीदेखील तुलसीने प्रभावित झाले. १0 एप्रिल १९९८ रोजी भाईदास सभागृहात दुपारच्या वेळी तुलसी हा एकपात्री प्रयोग शेखर सेन यांनी सादर केला़ भारतीय संस्कृतीत तुलसीदास, कबीर, सुरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांना अनन्यसाधारण महत्त्व असून परमार्थ साधनेबरोबरच विश्वबंधुत्वाचा संदेश या संतांनी दिला.त्यांच्या विचारांनी मी झपाटलो गेलो. म्हणूनच आधी तुलसी आणि नंतर कबीर असे एकपात्री प्रयोग मी करू शकलो, असे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले़ लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश आणि प्रत्यक्ष गायन व अभिनय अशा सर्वच आघाड्यांवर शेखर सेन यांना एकपात्री प्रयोग करताना एकाग्रता दाखवावी लागते़. तुलसीमध्ये ५२ गीते, कबीरमध्ये ४५ गीते, ४३ राग अशी संगीत साधना करीत शेखर सेन यांनी देशभर आणि न्यू यॉर्क, लंडनमध्ये आपले एकपात्री प्रयोग सादर केले. ३७ वर्षांची संगीतसाधना सांभाळीत एकपात्री प्रयोगांचे मार्गक्रमण करीत असताना विवेकानंदांच्या जीवनकर्तृत्वाने शेखर सेन भारावून गेले आणि जानेवारी २00४ साली त्यांनी विवेकानंद हा एकपात्री प्रयोग रंगभूमीवर आणला.आपल्याकडे अनेक सांस्कृतिक चळवळींची पुनरुक्ती होते़ अनेक संस्था तेचतेच कार्य करीत राहतात. उदा. राष्ट्रीय नाट्य विद्यालय जर नाट्यचळवळीची केंद्रीय संस्था असेल तर केंद्रीय पातळीवर पुन्हा वेगळी नाट्यचळवळ राबविणे अप्रस्तुत आहे. त्यामुळे संगीत नाटक अकादमी नाटकासोबतच लोककलांच्या जतन, संवर्धन, संशोधनासाठी कार्य करीत असल्याचे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले. त्यांनी भारतीय कलांच्या इतिहासाला आपल्या कार्यकर्तृत्वाने नवा आयाम दिला आहे.(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :cultureसांस्कृतिक