शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

सांस्कृतिक विकेंद्रीकरणाला गती देणारा कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 06:31 IST

भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे.

- प्रा. डॉ. प्रकाश खांडगे भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक शेखर सेन यांनी देशातील सांस्कृतिक चळवळीला विकेंद्रित करण्याचे मोठे कार्य सुरू ठेवले आहे. ते नोव्हेंबर महिन्यात १000 एकपात्री नाट्य कारकीर्द साजरी करीत आहेत.आजवर सांस्कृतिक चळवळ ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, मद्रास आदी महानगरांपुरतीच मर्यादित होती याचा अर्थ देशाच्या अन्य भागात सांस्कृतिक चळवळ रुजलेली नव्हती असे नाही. पण तेथील कलावंतांना अभावानेच राष्ट्रीय रंगमंच उपलब्ध झाला. शेखर सेन हे संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सांस्कृतिक चळवळ ही जिल्हा, तालुका पातळीवर नेली. आजवर शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि नाटक यांचाच वरचष्मा सांस्कृतिक घडामोडींवर होता; पण शेखर सेन यांनी आदिवासी वाड्यापाड्यावरील लोककलावंतांना श्रेष्ठ भारत संस्कृती समागमसारख्या चळवळीत सामावून घेतले. इतकेच नव्हेतर, देशातील शिखरस्त सर्व कलावंत आणि अभ्यासक यांचे मंडळीकरण श्रेष्ठ भारत संस्कृती समागम या उपक्रमाद्वारे साध्य केले.तुलसी, कबीर, विवेकानंद, सुरदास आणि साहेब हे एकपात्री प्रयोग त्यांनी सादर करून इतिहास घडविला आहे़ १९९७ साली त्यांनी तुलसी या एकपात्री प्रयोगाचे लेखन केले. कारण तुलसीदास यांच्या रामायणाने शेखर सेन प्रभावित झाले होते. जणू तुलसीदास यांनी स्वप्नात येऊन शेखर सेन यांना साक्षात्कार दिला की काय? असे वाटावे. कारण त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात तुलसी हा एकपात्री प्रयोग लिहिला आणि ‘धर्मयुग’चे संपादक डॉ. धर्मवीर भारती यांच्यापुढे त्यांनी तुलसीचे वाचन केले. डॉ धर्मवीर भारतीदेखील तुलसीने प्रभावित झाले. १0 एप्रिल १९९८ रोजी भाईदास सभागृहात दुपारच्या वेळी तुलसी हा एकपात्री प्रयोग शेखर सेन यांनी सादर केला़ भारतीय संस्कृतीत तुलसीदास, कबीर, सुरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांना अनन्यसाधारण महत्त्व असून परमार्थ साधनेबरोबरच विश्वबंधुत्वाचा संदेश या संतांनी दिला.त्यांच्या विचारांनी मी झपाटलो गेलो. म्हणूनच आधी तुलसी आणि नंतर कबीर असे एकपात्री प्रयोग मी करू शकलो, असे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले़ लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश आणि प्रत्यक्ष गायन व अभिनय अशा सर्वच आघाड्यांवर शेखर सेन यांना एकपात्री प्रयोग करताना एकाग्रता दाखवावी लागते़. तुलसीमध्ये ५२ गीते, कबीरमध्ये ४५ गीते, ४३ राग अशी संगीत साधना करीत शेखर सेन यांनी देशभर आणि न्यू यॉर्क, लंडनमध्ये आपले एकपात्री प्रयोग सादर केले. ३७ वर्षांची संगीतसाधना सांभाळीत एकपात्री प्रयोगांचे मार्गक्रमण करीत असताना विवेकानंदांच्या जीवनकर्तृत्वाने शेखर सेन भारावून गेले आणि जानेवारी २00४ साली त्यांनी विवेकानंद हा एकपात्री प्रयोग रंगभूमीवर आणला.आपल्याकडे अनेक सांस्कृतिक चळवळींची पुनरुक्ती होते़ अनेक संस्था तेचतेच कार्य करीत राहतात. उदा. राष्ट्रीय नाट्य विद्यालय जर नाट्यचळवळीची केंद्रीय संस्था असेल तर केंद्रीय पातळीवर पुन्हा वेगळी नाट्यचळवळ राबविणे अप्रस्तुत आहे. त्यामुळे संगीत नाटक अकादमी नाटकासोबतच लोककलांच्या जतन, संवर्धन, संशोधनासाठी कार्य करीत असल्याचे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले. त्यांनी भारतीय कलांच्या इतिहासाला आपल्या कार्यकर्तृत्वाने नवा आयाम दिला आहे.(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :cultureसांस्कृतिक