शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शीतल गादेकरचे मारेकरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 07:57 IST

मंत्रालयात येणारे नागरिकांचे लोंढे थांबलेले नाहीत. कोरोना काळात मंत्रालय ठप्प झालेले होते.

मंत्रालयात दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेने विष पिऊन आत्महत्या करावी, ही बाब पुरोगामी महाराष्ट्राचे सरकार आणि प्रशासनाला शोभणारी  नाही. सामान्य माणसांना कोणी वाली राहिलेला नाही ही आम भावना होय. मंत्रालयात आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न या घटना हीच भावना अधोरेखित करतात. सत्तेचे विकेंद्रीकरण हा घासूनपुसून गुळगुळीत झालेला शब्द. तसे बोलतात सारेच, पण अंमलात आणण्याबाबत ठणठणाट असतो. ‘सरकार आपल्या दारी‘ अशा वल्गनादेखील केल्या जातात, प्रत्यक्षात सामान्य माणसांना त्यांच्या कामासाठी वर्षानुवर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात हे वास्तव आजही कायम आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण विभागीय आणि जिल्हा पातळीवर केले होते. मंत्रालयातील गर्दी नियंत्रित होण्यास त्यामुळे मदत झाली होती. या निर्णयामुळे मंत्र्यांमध्ये अस्वस्थता होती, कारण त्यांचे अधिकार कमी झाले होते, पण त्या नाराजीची चिंता न करता फडणवीस निर्णयाच्या अंमलबजावणीवर ठाम राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे मंत्र्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केलेले नाही. उलटपक्षी खाली असलेले अधिकार आपल्या हातीच राहावेत, असे प्रयत्न अनेक मंत्री करताना दिसतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकार आपल्या हाती एकवटण्यावर मंत्र्यांचा भर होता. या सरकारमध्येही तेच दिसत आहे. या अधिकारांच्या अनुषंगाने येणारा अर्थपूर्ण लाभ कोणाला नको असेल? कर्तव्यांचा मात्र सोयीस्कर  विसर पडतो.

बऱ्याच अधिकारांची विभागणी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात केली जाते. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री याबाबत भाग्यवान आहेत. कारण  अधिकारशाहीत वाटेकरी ठरतील असे राज्यमंत्रीच या मंत्रिमंडळात नाहीत. एकेका मंत्र्यांकडे तीन-चार खाती आहेत. त्यातून मग फायली साठत जातात आणि रावांपासून रंकांपर्यंतचे प्रश्नही!  मंत्रालयातील आत्महत्येच्या घटनेपासून बोध घेऊन आता सामान्य प्रशासन विभागाने “जनतेला कधी भेटणार ते दालनाबाहेर लिहा”, असे आदेश मंत्र्यांना दिले आहेत. मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसाठी असे आदेश पूर्वीदेखील होते, पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही. केवळ मंत्रीच नव्हे, सर्वच नोकरशहांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य माणसांना मंत्रालयाची पायरी चढण्याची तसदी घ्यावी लागू नये म्हणून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी पातळीवर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करून नवी संकल्पना रुजविली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावे आलेले अर्ज जिल्हा वा विभागीय पातळीवरच निकाली निघावेत, या दृष्टीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असला तरी अनेकांना अजूनही त्याबाबतची माहिती नाही. जुलै २०२२ पासून जानेवारी २०२३ पर्यंत या मुख्यमंत्री सचिवालयांकडे २५८६ अर्ज आले. त्यातील १२५६ निकाली काढण्यात आले. ही आकडेवारी त्या दृष्टीने बोलकी आहे.

अर्थात,  मंत्रालयात येणारे नागरिकांचे लोंढे थांबलेले नाहीत. कोरोना काळात मंत्रालय ठप्प झालेले होते. मुख्यमंत्रीच मंत्रालयात फिरकत नव्हते. त्यामुळे लोकांची कामे होत नव्हती. आता लोक पुन्हा मोठ्या अपेक्षेने मंत्रालयाच्या पायऱ्या चढत आहेत. त्यातल्या अनेकांना मंत्रालयात कोणाला भेटावे हेच माहिती नसते. जत्रेत हरवल्यासारखे असे अनेक चेहेरे गावातील एखाद्या कार्यकर्त्याचे बोट धरून येतात. त्या कार्यकर्त्यांचे मंत्रालयातील दलालांशी संधान असते. बरेच जण अशा दलालांवर विश्वास टाकतात आणि फसतात. मंत्रालयात येरझारा घालणाऱ्या अशा दलालांचे उच्चाटन करणे आवश्यक आहे.

अधिकाऱ्यांनी खाबुगिरी करू नये या सद्हेतूने अधिकारी महासंघाने काही वर्षांपूर्वी ‘पगारात भागवा’ असे अभियान राबविले होते, ते फलद्रूप झाले नाही. ग्रामपंचायत, नगरपालिका असो की मंत्रालय; सामान्य माणसांना न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण होणे हे दिवास्वप्न आहे. औष्णिक वीज प्रकल्पात गेलेल्या शेतीच्या मोबदल्यात अन्याय झाल्याची तक्रार करणारे धुळे जिल्ह्यातील विखरण (ता. शिंदखेडा) येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी जानेवारी २०१८ मध्ये मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आता शीतल गादेकर या धुळ्यातील महिलेने मंत्रालयात विष पिऊन केलेल्या आत्महत्येनंतर तरी सामान्यांच्या प्रश्नांची जलद गतीने तड लावणारी व भ्रष्टाचाराने जेरीस आलेल्यांना दिलासा देणारी व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार