शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शरीफ यांची शराफत

By admin | Updated: February 19, 2016 03:05 IST

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतावर कारगिल युद्ध लादणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून भारताच्या पाठीत खंजीर खुपसणे होते अशी जाहीर कबुली देऊन

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतावर कारगिल युद्ध लादणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून भारताच्या पाठीत खंजीर खुपसणे होते अशी जाहीर कबुली देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जी शराफत दाखविली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदनच केले पाहिजे. १९९९मध्ये पाकने कारगिल युद्ध लादण्याच्या काहीच दिवस अगोदर वाजपेयी यांनी लाहोर बसयात्रेचे आयोजन केले होते व उभय देशांदरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता व त्याचे साऱ्या जगानेही कौतुकच केले होते. त्या काळातही नवाझ शरीफ हेच पाकिस्तानचे निर्वाचित पंतप्रधान होते. लाहोर बसयात्रेमुळे जे सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती तिला कारगिल युद्धाने मोठा छेद दिला. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याची जी भावना भारतात पसरली ती योग्य होती आणि वाजपेयी यांच्या जागी आपण असतो तर आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न झाली असती असेदेखील शरीफ यांनी आता म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनीच अतिरेक्यांचा वेष करुन कारगिल या उंचावरील ठाण्यावर कब्जा केला आणि श्रीनगर-लेह महामार्ग संपर्कहीन करण्याचा पाकी लष्कराचा डाव होता असेही शरीफ यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरातील मुझफ्फराबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शरीफ यांनी संबंधित कबुली दिली याला एक महत्व आहे. अर्थात भारत सरकारने या कबुलीबाबत सावध प्रतिक्रिया देताना अद्याप पाक सरकारकडून प्रस्तुत कबुलीसंबंधी अधिकृतपणे काहीही कळवले गेले नसले तरी शरीफ खरोखरीच तसे बोलले असतील तर ते स्वागतार्हच असल्याचे म्हटले आहे. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख होते आणि कारगिल युद्ध सुरु करण्याचा निर्णय त्यांनी पंतप्रधानांना अंधारात ठेऊन घेतला होता, असे खुद्द शरीफ यांनी याआधीच म्हटले होते. परंतु त्यावर भारतात विश्वास ठेवला जाणे कठीणच होते. कारगिल युद्धात मार बसल्यानंतर त्याच वर्षी मुशर्रफ यांनी एका लष्करी उठावात शरीफ यांना सत्ताच्युत करुन पाकिस्तानची सत्ता आपल्या हाती घेतली होती. जोवर ते पाकिस्तानचे सर्वेसर्वा होते तोवर तेदेखील भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचीच भाषा करीत होते. त्या काळात त्यांनी भारताचा दौरादेखील केला होता आणि दिल्लीतील स्वत:च्या जन्मस्थळाला भेटदेखील दिली होती. पण वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्या दरम्यानची त्याच दौऱ्यातील आग्रा वार्ता मात्र निष्फळ ठरली होती. पाकिस्तानातील मुशर्रफ यांची लोकप्रियता घसरणीला लागल्यानंतर तिथे सार्वजनिक निवडणुका पार पडून नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर आरुढ झाले. त्यानंतर मात्र मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाच्या बढाया मारायला सुरुवात केली आणि आपण भारताला कसे जेरीस आणले याच्या कथा प्रसृत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘आॅल पाकिस्तान मुस्लीम लीग’ नावाच्या एका राजकीय पक्षाची स्थापनादेखील केली आहे. या पक्षामार्फत बोलताना अलीकडेच त्यांनी वाजपेयी आणि मोदी यांची तुलना करताना वाजपेयी यांची प्रशंसा करताना मोदी यांना अनेक दूषणे प्रदान केली आहेत. पण मग वाजपेयी सच्चे होते तर त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला याबाबत मात्र ते चकार शब्द बोलायला तयार नाहीत. आता प्रथमच तो उच्चार किंवा तशी कबुली नवाझ शरीफ यांनी दिली आहे. परंतु ती देतानाच कारगिल प्रकरणी तक्रार करायची म्हटले तरी कुठे आणि कोणाकडे असा हतबलता व्यक्त करणारा प्रश्नदेखील त्यांनीच उच्चारुन दाखविला आहे. तरीदेखील शरीफ आता जे बोलत आहेत तो त्यांच्या अंतर्मनाचा आवाज आहे असे गृहीत धरायचे झाले आणि पाकिस्तानी लष्कराच्या कपटीपणाचे त्यांनी केलेले रहस्योद्घाटन प्रामाणिक असल्याचे मान्य करायचे झाले तर पठाणकोटच्या हवाई तळावर अलीकडेच जो अतिरेकी हल्ला केला गेला आणि त्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे भारताच्या हाती लागले त्याबाबत शरीफ नेमके काय करणारा हा प्रश्न विद्यमान परिस्थितीत भारताच्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे. त्याबाबत पाकिस्तानकडून किंवा व्यक्तिश: शरीफ यांच्याकडूनही कोणतेही नि:संदिग्ध आश्वासन अथवा प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. आजवर त्या राष्ट्रात जितके म्हणून लोकनियुक्त पंतप्रधान होऊन गेले ते कधीही भारताशी ठेवावयाच्या संबंधांबाबत स्वायत्तपणे कोणताही निर्णय वा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करु शकलेले नाहीत. लष्करच तिथे सर्वोसर्वा असल्याची स्थिती आहे. रशियातील उफा येथे जे ठरले व त्याची पुढे जी वासलात लागली तो इतिहास ताजाच आहे. परिणामी नवाझ शरीफ यांनी कबुली देण्याची जी हिंमत आणि शराफत दाखविली आहे तिच्याबाबत किती आशा बाळगायची हा प्रश्नच आहे.