शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

शरद पवार ‘समजणे’ महाकठीण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 02:23 IST

शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जेवढे समज आहेत, त्याहून अधिक गैरसमजही आहेत. त्याला त्यांचे विरोधक जितके जबाबदार आहेत, तेवढेच ते ...

शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जेवढे समज आहेत, त्याहून अधिक गैरसमजही आहेत. त्याला त्यांचे विरोधक जितके जबाबदार आहेत, तेवढेच ते स्वत:ही आहेत. अनेक गैरसमजुतींविषयी वेळेवर त्यांचा खुलासा ते करीत नाहीत, त्यामुळे सामान्य माणसांचा गैरसमज होतो. याचा त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक वेळा फायदा उठविला आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा घोळ पाच आठवडे चालू होता. या दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतरच अजित पवार यांनी बंड करीत भाजपला पाठिंबा दिला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध नसताना तो जोडला गेला. त्यावर सामान्य माणसांचा विश्वास बसला होता.

मोदी-पवार भेट अणि अजितदादांचा शपथविधी यांच्यात काहीतरी समान धागा असल्याची चर्चा चालू झाली, तेव्हा त्यांनी तातडीने खुलासा केला नाही; कारण राजकीय घडामोडी चालू होत्या. त्या दरम्यान पवार यांच्या ख्यातीप्रमाणे अफवांचे पेव फुटले. शरद पवार काहीही करू शकतात, अशीही चर्चा चालू झाली. वास्तविक, त्यांचे राजकीय आकलन, त्यांचे इतरांशी असलेले संबंध यांचा अंदाज नसल्याने अनेक जण फसतात. विरोधकांना त्यांच्यावर मात करण्यासाठी अविश्वासार्ह नेता अशी प्रतिमा करण्यात रस असतो. अशा आरोपांना किंवा टीकेला ते तातडीने उत्तर देत नाहीत. त्यांचा इतका प्रचंड जनसंपर्क आहे की, कोणत्या कामासाठी कोणाशी संपर्क साधून ते काम ते साध्य करतील, हे कळणारही नाही. त्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही.

नरेंद्र मोदी यांनी शेतीच्या प्रश्नाशिवाय राजकारणावर केलेली चर्चा त्यांनी बाहेर सांगून मोठेपणा मिळविला नाही. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला. त्याला आपण ‘गौप्यस्फोट’ म्हणतो. राजकारणात अशा अनेक गोष्टी पडद्यामागे घडत असतात. पंजाबच्या प्रश्नावर राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी भोपाळच्या तुरुंगात जाऊन प्रकाशसिंग बादल यांची त्यांनी रातोरात भेट घेतली होती. पहाटे दिल्लीला जाऊन राजीव गांधी यांना भेटीचा वृत्तान्त सांगून ते परतले होते. तेव्हा ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. राष्ट्रीय प्रश्नांवर राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी करायच्या असतात. या भेटीवर त्यांनी कधीही भाष्य केले नाही.

राजीव गांधी यांना पंजाब कराराचे श्रेय मिळाले. त्यात त्यांनी राजकारण आणले नाही. नामांतराच्या प्रश्नावर बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेतली. ते औरंगाबादला जाऊन विरोध करणार होते. ठाकरे यांना जिल्हाबंदी घातली होती. शरद पवार मुख्यमंत्री होते. संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तंग बनले होते. शरद पवार मात्र, त्या दिवशी सांगली दौºयावर होते. एका कार्यक्रमात ते शेजारच्या घरात जाऊन फोनवर बोलून आले. बातमी न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ठाकरे नगर-औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरून परतले. प्रशासनावर असलेला हा वचक होता. शरद पवार यांच्या कार्यशैलीसह कार्यक्षमतेचाच अंदाज अनेकांना नाही. परिणामी, ते काय करू शकतात, याचा अंदाज अनेकांना येत नाही. मोदी यांची भेट ज्या कारणांसाठी होती, तेवढेच त्यांनी माध्यमांना सांगितले.

ज्या राजकारणावरून अनेक गुंतागुंती तयार होऊ शकतात, त्या त्यांनी तातडीने उघड केल्या नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणांचा परिचय नसलेले वेगळाच प्रचार करतात. अशा माध्यमांवर ते अलीकडे नाराजीही व्यक्त करीत असतात. अजित पवार यांचे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, ते पाहता शरद पवार ‘समजणे’ महाकठीण आहे. ‘महाविकास आघाडी’ स्थापन होत असताना, ठाकरे कुटुंबीयांशी असलेल्या संबंधांची चर्चा झाली. त्याचे त्यांनी कधी प्रदर्शन केले नव्हते. उलट एकमेकांवर सडकून टीका केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी दिलेली आॅफर आणि त्यावर घेतलेला निर्णय हा शरद पवार यांचा मुरब्बीपणाच म्हणावा लागेल. याची माहिती असणाऱ्यांनीच त्यांच्यावर प्रतिक्रिया द्याव्यात; अन्यथा शरद पवार समजणे कठीण जाईल. त्यासाठी हा गौप्यस्फोट महत्त्वाचा ठरतो.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार