शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

आजचा अग्रलेख - महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील शरदाचं चांदणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 08:02 IST

Sharad Pawar Birthday : श्रीयुत शरदचंद्र गाेविंदराव पवार... महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अखंडपणे शीतल चांदण्याचे, उत्साहाचे आणि सुसंस्कृत सार्वजनिक जीवनाचा आग्रह धरणारे सातत्यपूर्ण प्रवाहित राहणारे नेतृत्व! या चांदण्याच्या शीतल प्रकाशाचा परिसस्पर्श प्रत्येक क्षेत्रास झाला आहे.

श्रीयुत शरदचंद्र गाेविंदराव पवार... महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अखंडपणे शीतल चांदण्याचे, उत्साहाचे आणि सुसंस्कृत सार्वजनिक जीवनाचा आग्रह धरणारे सातत्यपूर्ण प्रवाहित राहणारे नेतृत्व! या चांदण्याच्या शीतल प्रकाशाचा परिसस्पर्श प्रत्येक क्षेत्रास झाला आहे. आजचा आधुनिक महाराष्ट्र आणि देशाच्या नव्या आर्थिक धाेरणाला आकार देण्यात त्यांचा माैलिक वाटा आहे, त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ लाेकशाहीची मंदिरे असलेल्या विधिमंडळ आणि संसदेत अविरत काम करण्याचादेखील त्यांचाच विक्रम आहे. त्यांच्या अंगी असलेल्या असंख्य गुणांचा अभिमान मराठी माणसांनी आपल्या काेंदणात जपून ठेवावा, असा आहे.

महाराष्ट्राचे नेतृत्व करताना समाजातील प्रत्येक  घटकाची काळजी वाहणारे त्यांचे नेतृत्व आहे. चार वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व करताना त्यांनी स्वीकारलेली धाेरणे आणि घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करण्यास बळ देत गेले. राेजगार हमीचा कायदा, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा, नव्या औद्याेगिक वसाहती स्थापन करून मराठी माणसाला उद्याेगी बनविण्याचा धडाका, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार, लातूर-किल्लारीच्या भूकंपानंतरचे पुनर्वसनाचे जगाने नाेंद घेण्याजाेगे कार्य, सहकार चळवळीला साथ, फळबाग शेतीवाढीसाठी याेजना सुरू करणारे जनक, अशी असंख्य कामे नाेंदविता येतील. सामाजिक न्याय, महिलांचे सबलीकरण, औद्याेगिक विकास, शेती सुधारणा, शिक्षणाची संधी, राेजगारवाढीसाठीचे प्रयत्न करीत राष्ट्रीय विचार आणि जागतिक पातळीवरील बदलांचे भान त्यांनी कायम ठेवले. महाराष्ट्र आज जाे विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे, त्यात अनेक नेत्यांनी आपल्या अथक परिश्रमांनी भर घातली असेल; त्यात आघाडीवरचे नाव शरदचंद्रजी पवार आहे.

गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलीच. सर्वांत माेठी कामगिरी त्यांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून केली. सलग दहा वर्षे देशाच्या कानाकाेपऱ्यांत जाऊन तेथील शेती उत्पादन कसे वाढेल, याचा ध्यास घेतला हाेता. एकेकाळी अन्नधान्य आयात करून काेट्यवधी लाेकांची दाेन वेळच्या जेवणाची साेय करावी लागत हाेती. अशा भारत देशाच्या वाढत्या लाेकसंख्येला पुरेल इतके उत्पादन करून जागतिक बाजारपेठेत भारत आता अन्नधान्य, फळे-भाज्या निर्यात करणारा देश बनविण्यात शरदचंद्र पवार यांचाच सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना जगभरातील शेतीच्या ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून दिले. राज्यकर्त्याची कर्तव्ये काेणती असतात आणि लाेककल्याणकारी व्यवस्थेमध्ये ती कशी पार पाडायची असतात, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून ठेवला आहे.राजकीय मतभेद किंवा अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व राज्यांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मदत करण्याची भूमिका त्यांनी नेहमी घेतली. याशिवाय लातूर भूकंप पुनर्वसनाच्या अनुभवाने समृद्ध झालेल्या पवारसाहेबांनी स्वत:हून गुजरातमधील कच्छ भूकंपाच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली. १९९३ मध्ये बाॅम्बस्फाेटाने मुंबई महानगरी हादरली हाेती तेव्हा त्यांनी केवळ चाेवीस तासांत ते महानगर पूर्ववत प्रवाही केले. एका खेड्यात जन्मलेले शरद पवार यांनी शहरांच्या विकासकामांतील गती ओळखली हाेती; म्हणूनच मुंबईकरांना दिलासा दिला आणि अशा हल्ल्यांचा आम्ही भारतीय लाेक धीराेदात्तपणे मुकाबला करू शकताे, याचा विश्वास दिला.
राजकारणाव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची यशस्वी जबाबदारी स्वीकारली. कुस्ती, कबड्डीसारख्या भारतीय खेळांना प्राेत्साहन दिले. मराठी भाषेत इतर भाषांतील साहित्यकृती कशा येतील, यासाठी प्रयत्न केले. अशा या धीराेदात्त नेतृत्वावर अनेक निर्णयांवरून टीका झाली, आराेप झाले, हेटाळणी करण्यात आली; पण ते कधी डगमगले नाहीत. त्यांनी विचारांशी तडजाेड कधी केली नाही. यासाठी त्यांचे नेतृत्व हे सातत्याने शीतल चांंदण्याचा प्रकाश देत सर्वांना प्रेरक ठरले आहे. आज त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘लाेकमत परिवारा’तर्फे हार्दिक हार्दिक शुभकामना!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण