शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

डगमगलेला तपास

By admin | Updated: June 19, 2017 00:56 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी गेली दीड वर्षे पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी गेली दीड वर्षे पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्याने या खटल्याचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील सनातन संस्थेचा साधक असलेल्या समीर गायकवाड याच्याविरोधात पुरवणी आरोपपत्रात सबळ पुरावे नाहीत. गुन्ह्यातील शस्त्र आणि इतर फरारी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येत नसल्याने समीरला कोठडीत ठेवणे हे त्याच्या अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे समीरला जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. ती मान्य झाल्याने केवळ पोलीस दलालाच हादरा बसला असे नाही तर अनेक प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाले आहेत. दोन कोटी मोबाईल फोन कॉल ट्रेस करून त्यातील काही कॉलचे संदर्भ गोळा करीत समीर गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्याच्याविरोधात थेट पुरावे गोळा करण्यात पोलीस यंत्रणा अद्याप तरी अपयशी ठरली आहे. अशा संवेदनशील खटल्यातील रखडलेला तपास, त्यातही हाती आलेल्या मुख्य संशयिताचे जामिनावर सुटणे या बाबींमुळे पोलीस यंत्रणेवरील आधीच डळमळीत असलेला सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिकच कमकुवत होणार आहे. जामिनावर सुटलेला समीर फरार होऊ शकतो, त्याचबरोबर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, अशी शंका उपस्थित करीत या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारतर्फेही आव्हान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. ही सारी प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र तोपर्यंत मेघा पानसरे यांनी उपस्थित केलेल्या शंकांबाबत नेमके काय याबाबत कोणतेही स्पष्टीकरण सर्वसामान्यांना मिळणार नाही, हे उघड आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विचारवंत आणि समाजधुरिणांच्या दिवसाढवळ्या हत्या होऊनही आरोपी पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे मोकाटच राहतात, असा संदेश गेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबाबतची प्रगतीही अशीच संभ्रम निर्माण करणारी आहे.