शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

शाहीनबागची कोंडी फुटायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:15 IST

निषेधाचा अतिरेक झाला तर लोकांना त्यांच्या हेतूविषयी प्रेम वाटण्याऐवजी ते आंदोलकांचा दु:स्वास करू लागतील. यातून कोणता तरी मध्यममार्ग काढल्यास कुणाची हार झाली आणि कुणाचा विजय झाला, असे समजण्याचे कारण नाही.

- डॉ. एस. एस. मंठा, माजी चेअरमन, एआयसीटीई, सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरणदक्षिण दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर बहुसंख्य मुस्लीम रहिवासी असलेली वस्ती सध्या चर्चेत आहे. गेल्या ७० दिवसांपासून तेथील मुस्लीम महिला रस्त्यावर बसून निषेध आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समस्येवर अद्याप मार्ग निघालेला नाही. त्या महिलांच्या आंदोलनाचा कुणी वापर करून घेत आहे की त्या खरोखर आपल्या उद्दिष्टांविषयी प्रामाणिक आहेत? उजव्या राजकारणाचा चुकीच्या कारणांसाठी त्या निषेध करीत आहेत की डाव्यांच्या राजकारणाचे योग्य कारणांसाठी समर्थन करीत आहेत? या संघर्षात कुणी विजेते आणि कुणी पराभूत असणार आहेत का? १० जानेवारी २०२० रोजी मंजूर करण्यात आलेल्या सीएए कायद्याच्या विरोधात सुरू असलेले हे आंदोलन शांततामय पद्धतीने सुरू आहे. हे आंदोलनकारी महिलांच्या शहाणपणाची, चिकाटीची आणि संयमाची खात्री पटवणारे आहे.

सीएए, एनपीआर आणि एनआरसीसारख्या विषयाचा आंदोलनावर प्रभाव असल्यामुळे त्याहून अधिक वादाचे विषय असलेल्या वस्तूंची भाववाढ, वाढती बेरोजगारी आणि गरिबी किंवा जामिया मिलिया इस्लामिया संस्थेच्या विद्यार्थ्यांवरील पोलिसांचा हस्तक्षेप किंवा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हे सर्व विषय मागे पडले आहेत. या महिलांनी १९ डिसेंबर २०१९ पासून हा महत्त्वाचा महामार्ग रोखून धरल्यामुळे त्या मार्गाने जा-ये करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. तसाच हा निषेध करणाऱ्या महिलांनाही मोठ्या शारीरिक, मानसिक आणि मनोवैज्ञानिक यातना सोसाव्या लागत आहेत.
निषेध - मग तो योग्य असो की अयोग्य, तो लोकमतावर प्रभाव गाजवीत असतो आणि सरकारच्या धोरणात बदलही घडवून आणीत असतो. मग हा निषेध योग्य आहे का? सरकारचा निषेध करणाऱ्या या महिलांची भावना आहे की, त्यांच्या नागरिकत्वाच्या अधिकारांना या कायद्याने डावलण्यात आले आहे आणि त्यांच्या बाबतीत सापत्नभाव बाळगण्यात येत आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की, हा कायदा दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला आहे. लोकनियुक्त सरकारने लोकशाही पद्धतीने हा कायदा अमलात आणला असल्याने त्याचा आदर केलाच पाहिजे. त्यामुळे त्याला होणारा विरोध हा अयोग्यच आहे. लोकशाहीमध्ये एखाद्या गोष्टीला पाठिंबा देणारे लोक जसे असतात, तसेच त्याचा विरोध करणारे लोकही असतात. अशी लोकशाही लोकांना त्यांच्यावरील अन्यायाचे न्यायालयातून निवारण करण्याची संधीही देत असते.
हा कायदा भारतीयांवर परिणाम करीत नाही तसेच त्यांच्यात कोणताही भेदभाव करीत नाही, ही गोष्ट पंतप्रधानांनी अनेकदा स्पष्ट केली आहे. न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत तरी त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायला हवा, असा सारासार विवेक लोकांनी बाळगायला हवा. अशा पार्श्वभूमीवर निषेधाचे शस्त्र उपसणे कितपत योग्य आहे? निषेधाची प्रतिक्रिया त्या निषेधाचा निषेध करून होत असते आणि लोकांमध्ये कोणत्या तरी एका बाजूला उभे राहण्याची प्रवृत्ती वाढते. त्यातून समाजात जर दुहीची बीजे पेरली गेली तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती असते. शाहीनबागच्या आंदोलनात आंदोलकांनी स्वत:चा अधिकार बजावत असताना इतरांच्या हक्कांवर गदा आणली नाही का? ‘घटनेचा सन्मान राखा’ असे आवाहन करणारे फलक ते मिरवीत असताना त्यांनी घटनेने त्यांच्याकडून अपेक्षिलेल्या कर्तव्याचे कितपत पालन केले? लोकांचा कामावर जाण्याचा रस्ता त्यांनी तसेच सुरक्षारक्षकांनी अडवून धरल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अशा तऱ्हेचे आंदोलन करण्यासाठी त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली आहे का? या आंदोलनाचा हेतू स्पष्ट करताना, आंदोलनात किती लोक भाग घेणार आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले आहे का? त्यांनी हे जर केले नसेल तर त्यांना तेथून बाहेर काढण्याचा पोलिसांना निश्चित अधिकार आहे.या आंदोलनात भाग घेणाऱ्या महिलांनी त्यांची नवजात अर्भके सोबत आणली आहेत. त्यात एक लहान मूल थंडीमुळे दगावले. आंदोलनकर्त्यांपैकी अनेक जण तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या तंबूत राहणारे कामगार आहेत. त्या लहान बालकाच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची नोंद सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे; पण एवढ्या लहान बालकांना निषेध व्यक्त करण्याचा अधिकार असतो का? त्यांच्या आया या नागरिक असल्याने त्यांना तो अधिकार नक्कीच आहे.
या महिलांना स्वत:च्या लहान मुलांना जवळ बाळगता आले नसते तर ते त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे ठरले असते. त्याच तर्कानुसार आपल्या काम करण्याच्या ठिकाणी लहान बालकांना नेण्यास महिला कामगारांवर बंदी आणावी लागेल किंवा सरकारला त्यांच्या बालकांसाठी पाळणाघरे उघडावी लागतील. शाहीनबागच्या आंदोलकांनी असे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांच्यासाठी उत्तम मार्ग हा आहे की त्यांनी हे आंदोलन मागे घ्यायला हवे. निषेधाचा अतिरेक झाला तर लोकांना त्यांच्या हेतूविषयी प्रेम वाटण्याऐवजी ते आंदोलकांचा दु:स्वास करू लागतील. यातून कोणता तरी मध्यममार्ग काढल्यास कुणाची हार झाली आणि कुणाचा विजय झाला, असे समजण्याचे कारण नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक