शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या छायेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:36 IST

एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली पºहाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे.

एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली प-हाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे. मुंबईकरांनी असा पाऊस न येण्यासाठी तर विदर्भवासींनी पाऊस बरसण्यासाठी गणरायाला निरोप देताना साकडे घातले आहे.गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्र- मराठवाड्याने दुष्काळ अनुभवला. शासनही मदतीला धावले. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यापासून ते लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यापर्यंतचे उपाय योजले गेले. मात्र, तीच परिस्थिती येत्या उन्हाळ्यात नागपूरकरांवर येते की काय, याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ९२० दलघमी इतका म्हणजे केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प हे खºया अर्थाने लोकवस्ती व शेतीसाठी संजीवनी असतात. मात्र, मध्यम प्रकल्पातही फक्त ३७ टक्के जलसाठा आहे.एक गोसेखुर्द सोडले तर एकही धरण भरलेले नाही. तोतलाडोह प्रकल्पात केवळ १२ टक्के, रामटेक (खिंडसी) २३ टक्के, इटियाडोह ३४ टक्के, बोर ३४ टक्के, धाम ५४ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२८ टक्के) अशी धरणांची बिकट अवस्था आहे. आॅगस्ट संपला. सप्टेंबरचाही पहिला आठवडा संपत आला आहे. गणेश स्थापनेला दोन-तीन दिवस हजेरी लावलेल्या पावसाने आता विसर्जनाला मात्र दडी मारली आहे. गणरायासोबत पाऊसही निघून गेला तर शेतीसह पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होईल, अशा भयावह परिस्थितीला विदर्भवासीयांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी याच काळात जलसाठा ६० टक्क्यांपर्यंत होता. आता परतीचा मान्सून विदर्भात किती बरसेल यात शंका आहे. परततानाही वरुण राजाने कृपादृष्टी केली नाही तर विदर्भातील शेतकºयांना पुन्हा एकदा ‘देवेंद्रांवरच’ अवलंबून राहावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी