शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

सत्तर वर्षातील भीषण आर्थिक संकट, श्रीलंकेतल्या संतापाचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 07:23 IST

भ्रष्ट व कर्तव्यशून्य सरकारबद्दल संतापाची आग नागरिकांच्या मनात आहे. तिला घाबरून अध्यक्ष राजपक्षे बुधवारी राजीनामा देणार आहेत.

गेल्या १५ ऑगस्टला अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केला. अध्यक्ष अशरफ घनी यांचे राजधानी काबूलमधील सरकारी निवासस्थान ताब्यात घेतले, तेव्हा डोंगरदऱ्यांमध्ये आयुष्य काढलेले तालिबानी अध्यक्षांच्या शयनकक्षाचा आनंद घेताना, प्रांगणातील झोपाळ्यावर झुलताना दिसले. अगदी तसेच चित्र दोन दिवस श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या महालात दिसले. देशाची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असतानाही अध्यक्ष मात्र ऐषारामी जीवन जगत असावेत. त्याचा राग म्हणून सामान्य नागरिकांनी वातानुकूलित शयनकक्षातील मऊमऊ गाद्यांचा आनंद घेतला.

तरुण आंदोलकांनी तरणतलावाची मजा घेतली. लोक कॅरम खेळताना दिसले. पैशाच्या बॅगा घेऊन अध्यक्ष राजपक्षे श्रीलंका नेव्हीच्या गजाबाहू युद्धनौकेवर पळून गेल्यानंतरही उरलेले लाखो अमेरिकन डॉलर्स जमा करताना लोक दिसले. अशरफ घनीदेखील असेच बॅगा घेऊन पळून गेले होते. दृष्ये सारखी असली तरी दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. लंकेतील आंदोलक तालिबानी नाहीत. अतिरेकी नाहीत. त्यांच्या खांद्यावर मशिनगन नाहीत. उपाशीपोटी टाचा घासून मरण्याऐवजी आंदोलनाचे हत्यार त्यांनी उपसले आहे. भ्रष्ट व कर्तव्यशून्य सरकारबद्दल संतापाची आग मनात आहे. तिला घाबरून अध्यक्ष राजपक्षे बुधवारी राजीनामा देणार आहेत.सत्तर वर्षांतील सर्वाधिक भीषण आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हेदेखील राजीनामा देतील. श्रीलंका उद्ध्वस्त होण्यातील चीनच्या भूमिकेवर आता जगभरातून टीका होऊ लागली आहे. चिनी ड्रॅगनने दक्षिण आशियावर प्रभुत्व गाजविण्यासाठी श्रीलंकेला जाणीवपूर्वक कर्जाच्या सापळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. भ्रष्ट सरकार, पारदर्शकतेचा अभाव आणि शंभर टक्के सेंद्रिय शेतीसारखे अचाट प्रयोग, हे सर्व ऐन कोरोना महामारीच्या काळात, यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आला. तिजोरी रिकामी झाली. देश कर्जाच्या सापळ्यात अडकू लागला.चीन हा श्रीलंकेचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्ज देणारा देश आहे. त्याचा गैरफायदा चीनने घेतला. कर्जाचे हप्ते लांबविण्याच्या मोबदल्यात हंबनटोटा व कोलंबो ही बंदरे शंभर वर्षांच्या भाडेपट्ट्यावर ताब्यात घेतली आणि प्रत्यक्षात श्रीलंकेला संकटातून बाहेर निघण्यासाठी काहीच मदत केली नाही. दोन महिन्यांपूर्वी जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. पेट्रोल, डिझेल हे इंधन, तसेच तेल-साखर-दूध, अन्नधान्य अशा खाण्या-पिण्याच्या चिजा बाजारातून गायब झाल्या. महागाई प्रचंड वाढली. जनतेने उठाव केला. राजपक्षे बंधूंवर लोकांचा राग होता. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना पायउतार व्हावे लागले. माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पुन्हा पाचारण करण्यात आले.भारतही या धाकट्या शेजाऱ्याच्या मदतीला धावून गेला. इंधनासाठी पाचशे दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि इतर भारतीय वस्तूंच्या आयातीसाठी एक अब्ज डॉलर्सची उधारी भारताने मंजूर केली. चलन अदलाबदलीत आणखी २.४ अब्ज डॉलर्सच्या मदतीचा शब्द देण्यात आला. परंतु, इतके सारे होत असताना राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचे ऐषारामी जगणे काही थांबले नाही. रानिल विक्रमसिंघे व अन्य काही मंत्री अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी झटत असूनही परिणाम दिसेनात, तेव्हा पुन्हा जनता संतापून उठली. हजारो लोकांनी कोलंबोमधील अध्यक्षांच्या निवासस्थानावर कूच केले. अनेक ठिकाणी पोलीसच आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसले. लष्कराच्या हाती बरीच सूत्रे आहेत. पण, लष्करालाही सर्वसामान्यांच्या सात्त्विक संतापाची जाणीव असल्याने एकूण दृष्टिकोन बळाचा वापर करून आंदोलकांना रोखण्याऐवजी हिंसाचार उफाळू नये म्हणून सबुरीचाच आहे.श्रीलंका वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींचा नुकताच दौरा झाला आहे. भारताशी मदतीसाठी बोलणी सुरू आहेत. हे प्रयत्न यशस्वी होतील व आर्थिक आगीत लंकेचे दहन होणार नाही, ही अपेक्षा! श्रीलंकेची सध्याची दुर्दशा हा इतर देशांनाही धडा आहे. सामान्य देशवासीयांचा विचार न करता मनमानी कारभार, भ्रष्टाचार कराल तर एका मर्यादेनंतर लोकांची सहनशक्ती संपते. लोक स्वत:च देशाचा कारभार हातात घेतात, हा संदेश श्रीलंकेने दिला आहे.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्थाPresidentराष्ट्राध्यक्ष