शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गंभीर खेळ

By admin | Updated: February 2, 2016 03:13 IST

मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ४० फूट लांब देवमाशाच्या कलेवराला सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. बातम्या बघून, वाचून अनेकजण हळहळले अन् आपापल्या कामाला लागले

मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ४० फूट लांब देवमाशाच्या कलेवराला सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. बातम्या बघून, वाचून अनेकजण हळहळले अन् आपापल्या कामाला लागले. केवळ हळहळून काय होणार, असा प्रश्न कुणी विचारलाच, तर आपण सर्वसामान्य काय करू शकतो, हे उत्तर तयारच असते! प्रश्न तसा बिनतोड म्हणायला हवा; परंतु देवमाशांच्या मृत्यूला सर्वसामान्यही बऱ्याच प्रमाणात जबाबदार असल्याचे सांगितले, तर असा प्रश्न उपस्थित करणारे नक्कीच चक्रावून जातील. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशीच आहे. गत काही दिवसांपासून मृत देवमासे समुद्रकिनाऱ्यांवर वाहून येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. गत वर्षभरातच जगभरातील समुद्रकिनाऱ्यांवर शेकडो देवमासे मृतावस्थेत आढळले. ऐंशीच्या दशकात जगभरातील देवमाशांच्या शिकारीवर बंदी लादण्यात आली. परिणामी देवमाशांच्या शिकारीचे प्रमाण बरेच घटले आहे. असे असताना देवमासे मृतावस्थेत समुद्रकिनारी वाहून येण्याचे प्रमाण मात्र वाढतच आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चिलीच्या एका किनाऱ्यावर एकाच वेळी तब्बल ३३७ मृत देवमासे आढळले होते. मुंबई किंवा चिलीच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या देवमाशांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेणे अद्यापही सुरूच असले तरी, मनुष्य जातीने निर्माण केलेल्या विषाक्त कचऱ्याचे समुद्रातील वाढते प्रमाणच त्यासाठी कारणीभूत असल्याची शक्यता संशोधक व्यक्त करीत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या अनेक पटींनी गंभीर झाली आहे. एलेन मॅकआर्थर फाउण्डेशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, २०५०मध्ये समुद्रातील माशांच्या एकूण वजनापेक्षा प्लास्टिकचे वजन जास्त भरेल. सध्याच्या घडीला पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपैकी केवळ १४ टक्के प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केल्या जात आहे. उर्वरित प्लास्टिक अंतत: समुद्रातच पोहोचते! या भयावह वस्तुस्थितीवरून, आपण पर्यावरणासोबत किती गंभीर खेळ करीत आहोत, याची कुणालाही सहज कल्पना यावी! दुर्दैवाने, अशी उदाहरणे वारंवार समोर येऊनही आपण मात्र डोळे उघडण्यास तयार नाही. समुद्रात मोठ्या प्रमाणात जो विषाक्त कचरा जात आहे, त्यासाठी या पृथ्वीतलावरील मोजके अपवाद वगळता इतर प्रत्येक मनुष्य जबाबदार आहे; पण मी एकटा काय करू शकतो, हा प्रश्न त्यापैकी प्रत्येकाच्या ओठांवर आहे. एकटा कुणीही काहीही करू शकत नाही, हे अगदी खरे आहे; पण प्रत्येकाने आपापला वाटा उचलल्यास, खूप काही साध्य केले जाऊ शकते. त्यासाठी कुणाच्या पुढाकाराची वाट बघण्याची गरज नाही, केवळ स्वत:पासून प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. हे होईल का, हाच प्रश्न मृत्युमुखी पडणारा प्रत्येक देवमासा नक्कीच विचारत असणार!ा