शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

‘सेल्फि’शपणा

By admin | Updated: January 12, 2016 02:56 IST

वांद्रे येथील बॅण्डस्टँडच्या दुर्घटनेने सेल्फी पुन्हा एकदा चर्चेत आला. मुळात सेल्फी काढावा की नाही? हा मुद्दा नाही. तर सेल्फी काढताना लगतच्या वातावरणाचे भान का सुटत जाते

वांद्रे येथील बॅण्डस्टँडच्या दुर्घटनेने सेल्फी पुन्हा एकदा चर्चेत आला. मुळात सेल्फी काढावा की नाही? हा मुद्दा नाही. तर सेल्फी काढताना लगतच्या वातावरणाचे भान का सुटत जाते; हा मुद्दा आहे. वांद्रे येथील घटनेने तरुणाई हेलावली असली, तरी भानावर आलेली नाही हे वास्तव आहे. एकविसाव्या शतकात आपण तंत्रज्ञानाच्या एवढे आहारी गेलो आहोत; की त्याने आपला जीव जातोय, हेही लक्षात येऊ नये? ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. पण अशा ‘सेल्फी’च्या ‘सेल्फिश’पणाचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असून, असे सेल्फी आणखी किती जीव घेणार? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. थोडेसे इतिहासात डोकावून पाहायचे म्हटले, तर १८३९ साली रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील सर्वांत पहिला सेल्फी काढल्याची नोंद आढळते. म्हणजे सुमारे १७५ वर्षांपूर्वी ‘पहिला सेल्फी’ काढण्यात आला. परंतु, सध्याच्या युगात तंत्रज्ञानाने अवघ्या तरुणाईला अक्षरश: झपाटून टाकले आहे. त्यात सेल्फी तर कहर करत आहे. या क्रेझमुळेच की काय ‘सेल्फायटिस’ हा नवा मानसिक आजार असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी जाहीर केले आहे. निधनासारख्या प्रसंगांमध्येही लोक सेल्फी काढून आपल्या ‘विकृती’चे प्रदर्शन करताना दिसतात. चर्चगेटला भल्या पहाटे लोकलचा झालेला अपघात असो वा अन्य काही. लोक सेल्फी काढण्यातच धन्यता मानताना दिसतात. खरे म्हणजे अशावेळी गरज असते ती तातडीने मदतीला धावून जाण्याची. पण तसे होतानाही दिसत नाही. ‘स्मार्ट’ बनण्याच्या नावाखाली आपण विकृतीचे शिकार बनत असल्याची जाणीवही आता हरवत चालली आहे. दिवसेंदिवस वेगवान होणाऱ्या उत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या व्यसनाची चटक लागलेली दिसून येते. त्यात सोशल नेटवर्क साईट्स भर घालत आहेत. पहिला सेल्फी काढून तो सोशल नेटवर्क साईट्सवर पोस्ट करण्याची केविलवाणी घाईदेखील सुज्ञ मनांची चिंता वाढवणारी आहे. अशाच ‘सेल्फि’शपणाने वांद्र्यात तरुणीचा बळी गेला. सामाजिक जबाबदारीचे भाव ठेवत रमेश वळुंज या तरुणाने दोघा तरुणींना तर वाचवले; पण तिसऱ्या तरुणीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यालाही जिवाला मुकावे लागले. यातून आपण काही धडा घेणार की नाही?