शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘सेल्फि’शपणा

By admin | Updated: January 12, 2016 02:56 IST

वांद्रे येथील बॅण्डस्टँडच्या दुर्घटनेने सेल्फी पुन्हा एकदा चर्चेत आला. मुळात सेल्फी काढावा की नाही? हा मुद्दा नाही. तर सेल्फी काढताना लगतच्या वातावरणाचे भान का सुटत जाते

वांद्रे येथील बॅण्डस्टँडच्या दुर्घटनेने सेल्फी पुन्हा एकदा चर्चेत आला. मुळात सेल्फी काढावा की नाही? हा मुद्दा नाही. तर सेल्फी काढताना लगतच्या वातावरणाचे भान का सुटत जाते; हा मुद्दा आहे. वांद्रे येथील घटनेने तरुणाई हेलावली असली, तरी भानावर आलेली नाही हे वास्तव आहे. एकविसाव्या शतकात आपण तंत्रज्ञानाच्या एवढे आहारी गेलो आहोत; की त्याने आपला जीव जातोय, हेही लक्षात येऊ नये? ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. पण अशा ‘सेल्फी’च्या ‘सेल्फिश’पणाचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असून, असे सेल्फी आणखी किती जीव घेणार? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. थोडेसे इतिहासात डोकावून पाहायचे म्हटले, तर १८३९ साली रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील सर्वांत पहिला सेल्फी काढल्याची नोंद आढळते. म्हणजे सुमारे १७५ वर्षांपूर्वी ‘पहिला सेल्फी’ काढण्यात आला. परंतु, सध्याच्या युगात तंत्रज्ञानाने अवघ्या तरुणाईला अक्षरश: झपाटून टाकले आहे. त्यात सेल्फी तर कहर करत आहे. या क्रेझमुळेच की काय ‘सेल्फायटिस’ हा नवा मानसिक आजार असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी जाहीर केले आहे. निधनासारख्या प्रसंगांमध्येही लोक सेल्फी काढून आपल्या ‘विकृती’चे प्रदर्शन करताना दिसतात. चर्चगेटला भल्या पहाटे लोकलचा झालेला अपघात असो वा अन्य काही. लोक सेल्फी काढण्यातच धन्यता मानताना दिसतात. खरे म्हणजे अशावेळी गरज असते ती तातडीने मदतीला धावून जाण्याची. पण तसे होतानाही दिसत नाही. ‘स्मार्ट’ बनण्याच्या नावाखाली आपण विकृतीचे शिकार बनत असल्याची जाणीवही आता हरवत चालली आहे. दिवसेंदिवस वेगवान होणाऱ्या उत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या व्यसनाची चटक लागलेली दिसून येते. त्यात सोशल नेटवर्क साईट्स भर घालत आहेत. पहिला सेल्फी काढून तो सोशल नेटवर्क साईट्सवर पोस्ट करण्याची केविलवाणी घाईदेखील सुज्ञ मनांची चिंता वाढवणारी आहे. अशाच ‘सेल्फि’शपणाने वांद्र्यात तरुणीचा बळी गेला. सामाजिक जबाबदारीचे भाव ठेवत रमेश वळुंज या तरुणाने दोघा तरुणींना तर वाचवले; पण तिसऱ्या तरुणीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यालाही जिवाला मुकावे लागले. यातून आपण काही धडा घेणार की नाही?