शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

सुरक्षेचा पोरखेळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 21:03 IST

मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला

मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला आहे, अशी गुप्त वार्ता जेव्हां भारतीय सुरक्षा यंत्रणेला समजली तेव्हां सारे संबंधित सतर्क होणे अगदी स्वाभाविक होते. यंत्रणेला जे संभाषण ऐकावयास मिळाले त्यात ‘गुजरात’चा उल्लेख होता. दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल नासीरखान जांझुआ यांनीदेखील काही अतिरेकी भारतात घुसण्याची शक्यता असल्याच्या गुप्तवार्तेला दुजोरा दिला. सोमवारी देशभर साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या धार्मिक उत्सवाच्या वेळीच घातपात होईल असे गृहीत धरले गेले. परिणामी संपूर्ण देशभर तर सतर्कतेचा इशारा दिला गेलाच पण विशेषत: गुजरात राज्यास अधिकच सतर्क केले गेले. त्या राज्यात येणाऱ्या वा राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनाची अगदी कसून तपासणी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात सोमवारी देशात कुठेही गडबड झाली नाही आणि महाशिवरात्रीचा सण नेहमीप्रमाणेच साजरा झाला. दक्षता घेणे केव्हांही चांगलेच. खरे पाहाता घातपाताचा इशारा मिळाल्यानंतर ज्या पद्धतीची तपासणी केली जाते तशी एरवीदेखील करायला काही हरकत नाही. पण तसे सहसा होत नाही. परंतु आता संबंधित सुरक्षा यंत्रणांनीच जी शक्यता व्यक्त केली आहे ती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था म्हणजे पोरखेळ तर नव्हे अशी शंका कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहाणार नाही. सुरक्षा यंत्रणांनी ऐकलेल्या संभाषणातील गुजरात म्हणजे प्रत्यक्षात गुजरात राज्य नव्हे तर त्याच नावाचे पंजाबातील एक खेडे असावे असा तर्क या यंत्रणांनी बोलून दाखविला आहे. पंजाब सीमेपासून थोड्याच अंतरावर असलेल्या या गुजरात गावात एक प्राचीन शिवमंदीर आहे आणि तिथे शिवरात्रीला म्हणे मोठी गर्दी उसळत असते. गेल्या वर्षभरात ज्या गुरुदासपूर येथून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी केली गेली त्या ठिकाणापासूनही हे गाव अगदी जवळच आहे. अर्थात तिथेही बंदोबस्त होताच आणि कुठलीही संशयास्पद बाब तिथे आढळली नाही. अर्थात अशी सुरक्षा व्यवस्था देशातील बहुतेक सर्वच शिवमंदिरांना पुरविली गेली होती. पण यातील खरा मुद्दा वेगळाच आहे. दक्षता घेतली म्हणूनच काही झाले नाही या समाधानात सुरक्षा यंत्रणेने राहायला काही हरकत नव्हती. परंतु तसे न करता गुजरात या नावावरुन गोंधळ झाला असे जाहीर करुन एकप्रकारे त्यांनी त्यांचाच वेंधळेपणा जगजाहीर केला असेही यातून म्हणता येऊ शकते. शिवाय पाकिस्तानबाबतचा आजवरचा अनुभव लक्षात घेता तिकडून प्राप्त माहितीवर किती विश्वास ठेवायचा हाही एक नेहमीचाच प्रश्न असतो.