शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सुरक्षेचा पोरखेळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 21:03 IST

मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला

मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला आहे, अशी गुप्त वार्ता जेव्हां भारतीय सुरक्षा यंत्रणेला समजली तेव्हां सारे संबंधित सतर्क होणे अगदी स्वाभाविक होते. यंत्रणेला जे संभाषण ऐकावयास मिळाले त्यात ‘गुजरात’चा उल्लेख होता. दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल नासीरखान जांझुआ यांनीदेखील काही अतिरेकी भारतात घुसण्याची शक्यता असल्याच्या गुप्तवार्तेला दुजोरा दिला. सोमवारी देशभर साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या धार्मिक उत्सवाच्या वेळीच घातपात होईल असे गृहीत धरले गेले. परिणामी संपूर्ण देशभर तर सतर्कतेचा इशारा दिला गेलाच पण विशेषत: गुजरात राज्यास अधिकच सतर्क केले गेले. त्या राज्यात येणाऱ्या वा राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनाची अगदी कसून तपासणी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात सोमवारी देशात कुठेही गडबड झाली नाही आणि महाशिवरात्रीचा सण नेहमीप्रमाणेच साजरा झाला. दक्षता घेणे केव्हांही चांगलेच. खरे पाहाता घातपाताचा इशारा मिळाल्यानंतर ज्या पद्धतीची तपासणी केली जाते तशी एरवीदेखील करायला काही हरकत नाही. पण तसे सहसा होत नाही. परंतु आता संबंधित सुरक्षा यंत्रणांनीच जी शक्यता व्यक्त केली आहे ती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था म्हणजे पोरखेळ तर नव्हे अशी शंका कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहाणार नाही. सुरक्षा यंत्रणांनी ऐकलेल्या संभाषणातील गुजरात म्हणजे प्रत्यक्षात गुजरात राज्य नव्हे तर त्याच नावाचे पंजाबातील एक खेडे असावे असा तर्क या यंत्रणांनी बोलून दाखविला आहे. पंजाब सीमेपासून थोड्याच अंतरावर असलेल्या या गुजरात गावात एक प्राचीन शिवमंदीर आहे आणि तिथे शिवरात्रीला म्हणे मोठी गर्दी उसळत असते. गेल्या वर्षभरात ज्या गुरुदासपूर येथून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी केली गेली त्या ठिकाणापासूनही हे गाव अगदी जवळच आहे. अर्थात तिथेही बंदोबस्त होताच आणि कुठलीही संशयास्पद बाब तिथे आढळली नाही. अर्थात अशी सुरक्षा व्यवस्था देशातील बहुतेक सर्वच शिवमंदिरांना पुरविली गेली होती. पण यातील खरा मुद्दा वेगळाच आहे. दक्षता घेतली म्हणूनच काही झाले नाही या समाधानात सुरक्षा यंत्रणेने राहायला काही हरकत नव्हती. परंतु तसे न करता गुजरात या नावावरुन गोंधळ झाला असे जाहीर करुन एकप्रकारे त्यांनी त्यांचाच वेंधळेपणा जगजाहीर केला असेही यातून म्हणता येऊ शकते. शिवाय पाकिस्तानबाबतचा आजवरचा अनुभव लक्षात घेता तिकडून प्राप्त माहितीवर किती विश्वास ठेवायचा हाही एक नेहमीचाच प्रश्न असतो.