शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शोध सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 23:49 IST

जीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात.

- ह. भ. प. बाबामहाराज सातारकरजीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. कोणतीही लाट आली तरी ती समुद्राचीच आहे, हे लक्षात आल्यानंतर ती मोठी लाट आहे की लहान आहे, हा विचार बाजूला पडतो आणि समुद्रावर लक्ष केंद्रित होते. तसे माणसाचे जीवन सुखमय, पावनमय, आनंदमयच आहे. आपल्यापुरता आपण जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत. पण आपण जेव्हा दुसºयाकडे पाहतो तेव्हा आपण दु:खी होतो. आपली सायकल चांगली आहे, पण दुसरा मोटारसायकलवरून गेलेला पाहिल्यानंतर आपल्याला दु:ख होते. म्हणजे आपल्याकडे दु:ख नाही तर अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन आहे. दुसºयाचा चांगला संसार पाहिला की आपल्याला बरे वाटेनासे होते. अर्थात आपला वाईट आहे, असे नव्हे. काही माणसे देवमाणसे आहेत. आहे त्या परिस्थितीत सुखी असतात. कारण ती दुसºयाकडे पाहत नाहीत. मला एकदा झोपडीत राहणारे एक कुटुंब भेटले. त्यांना विचारले कसे आहात? त्यावर ते म्हणाले, आहे त्यापेक्षा छान आहे. म्हटले बरे झाले. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही दोघेही काम करतो. कष्ट करतो. लोकांना घास मिळत नाही. आम्हाला मिळतो.’ प्रभूने सुंदर जीवन दिले, असा दृष्टिकोन हवा. खरे तर, विचार केला तर जीवनात आनंद लहरीच आहेत. पण दुसºयाकडे पाहून जीवन जगायचे म्हटल्यास मात्र दु:ख होते. त्याच्याकडे जे आहे, माझ्याकडे नाही हे खरे दु:ख आहे. लंडनला थंडीचे दिवस होते. बर्फ पडत होता. खूप बर्फ साचला होता. एकाच्या पायात बुट नव्हते. तो गाडीमध्ये जाणाºया माणसांना शिव्या देत होता. हे त्याचे मोठ्याने बोलणे रस्त्याच्या कडेला असणाºया एका माणसाने ऐकले. त्याने त्यास बोलावून घेतले. काय झाले, असा प्रश्न केला. त्यावर तो त्रागा करणारा माणूस म्हणाला, हे लोक सगळे पैशावाले चाललेत आणि माझ्याकडे साधे बुटही नाहीत. त्यावर रस्त्यावरील त्या माणसाने आपली पँट वर केली तर त्यास गुडघ्यापासून पाय नव्हते. तो म्हणाला, ‘राजा तुला बुट नाही म्हणून रडतोस, मला तर पायच नाहीत. तरीही मी सुखात आणि आनंदात आहे.’ जीवनात प्रभूने जे दिलेय त्यात सुख मानावे. आनंद मानला तरच जीवन सुखी होणार आहे. माणूस दुसºयाकडे पाहून जगला तर मला नाही वाटत शेवटच्या श्वासापर्यंत सुखी होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या