शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शोध सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 23:49 IST

जीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात.

- ह. भ. प. बाबामहाराज सातारकरजीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. कोणतीही लाट आली तरी ती समुद्राचीच आहे, हे लक्षात आल्यानंतर ती मोठी लाट आहे की लहान आहे, हा विचार बाजूला पडतो आणि समुद्रावर लक्ष केंद्रित होते. तसे माणसाचे जीवन सुखमय, पावनमय, आनंदमयच आहे. आपल्यापुरता आपण जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत. पण आपण जेव्हा दुसºयाकडे पाहतो तेव्हा आपण दु:खी होतो. आपली सायकल चांगली आहे, पण दुसरा मोटारसायकलवरून गेलेला पाहिल्यानंतर आपल्याला दु:ख होते. म्हणजे आपल्याकडे दु:ख नाही तर अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन आहे. दुसºयाचा चांगला संसार पाहिला की आपल्याला बरे वाटेनासे होते. अर्थात आपला वाईट आहे, असे नव्हे. काही माणसे देवमाणसे आहेत. आहे त्या परिस्थितीत सुखी असतात. कारण ती दुसºयाकडे पाहत नाहीत. मला एकदा झोपडीत राहणारे एक कुटुंब भेटले. त्यांना विचारले कसे आहात? त्यावर ते म्हणाले, आहे त्यापेक्षा छान आहे. म्हटले बरे झाले. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही दोघेही काम करतो. कष्ट करतो. लोकांना घास मिळत नाही. आम्हाला मिळतो.’ प्रभूने सुंदर जीवन दिले, असा दृष्टिकोन हवा. खरे तर, विचार केला तर जीवनात आनंद लहरीच आहेत. पण दुसºयाकडे पाहून जीवन जगायचे म्हटल्यास मात्र दु:ख होते. त्याच्याकडे जे आहे, माझ्याकडे नाही हे खरे दु:ख आहे. लंडनला थंडीचे दिवस होते. बर्फ पडत होता. खूप बर्फ साचला होता. एकाच्या पायात बुट नव्हते. तो गाडीमध्ये जाणाºया माणसांना शिव्या देत होता. हे त्याचे मोठ्याने बोलणे रस्त्याच्या कडेला असणाºया एका माणसाने ऐकले. त्याने त्यास बोलावून घेतले. काय झाले, असा प्रश्न केला. त्यावर तो त्रागा करणारा माणूस म्हणाला, हे लोक सगळे पैशावाले चाललेत आणि माझ्याकडे साधे बुटही नाहीत. त्यावर रस्त्यावरील त्या माणसाने आपली पँट वर केली तर त्यास गुडघ्यापासून पाय नव्हते. तो म्हणाला, ‘राजा तुला बुट नाही म्हणून रडतोस, मला तर पायच नाहीत. तरीही मी सुखात आणि आनंदात आहे.’ जीवनात प्रभूने जे दिलेय त्यात सुख मानावे. आनंद मानला तरच जीवन सुखी होणार आहे. माणूस दुसºयाकडे पाहून जगला तर मला नाही वाटत शेवटच्या श्वासापर्यंत सुखी होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या