शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

या दांडीबहाद्दरांची बत्ती गूल करायला हवी!

By किरण अग्रवाल | Updated: March 6, 2022 11:53 IST

School bunkers teachers should be punnished : गैरहजर आढळलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांबद्दलही तसेच व्हायला नको, कारवाई व्हायलाच हवी.

- किरण अग्रवाल

लोकप्रतिनिधींच्या अचानक भेटीत जेव्हा अनागोंदी उघड होते, तेव्हा प्रशासनाचा कल सारवासारव करण्याकडेच असतो. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शाळा भेटीत गैरहजर आढळलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांबद्दलही तसेच व्हायला नको, कारवाई व्हायलाच हवी; अन्यथा या भेटींना अर्थ उरणार नाही.

 

पर्यवेक्षकीय यंत्रणा सुस्त असली की नोकरशाही बेगुमान होते हा नेहमीचाच अनुभव आहे. यातही बुडापाशीच लक्ष दिले जात नाही म्हटल्यावर दूरस्थ व्यवस्था तर अधिकच बेफिकीर होते. म्हणूनच जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या अकोल्यातील हरिपेठ परिसरातील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकासह शिक्षक गैरहजर आढळल्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने बघितले जावयास हवे.

 

सरकारी व्यवस्थेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली अवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. जिल्हा परिषदेची शाळा असो, की महापालिकेची; तेथील भौतिक सुविधांच्या उपलब्धतेपासून ते शिक्षणाच्या मूल्यात्मक व गुणात्मक दर्जाबद्दल समाधानाची स्थिती अपवादानेच आढळून येते. म्हणूनच तर मागे तीन-चार महिन्यांपूर्वी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुण्यात बोलताना ‘स्मारकेच उभारायची असतील तर शाळांची स्मारके करा’ असे जे विधान केले होते, त्यावरून अधिकतर शिकस्त शाळांची स्मारके करून काय साधणार, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर कडू पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात तरी शाळांची स्थिती सुधारेल असा अंदाज बांधला गेला होता; पण कशाचे काय? ती सुधारण्याऐवजी आणखी रसातळाला चालल्याचे प्रकार समोर येत आहेत आणि त्याला कारण म्हणजे पर्यवेक्षकीय यंत्रणांचे दुर्लक्ष.

 

जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या अकोल्यातील एका शाळेत खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली असता तेथे मुख्याध्यापक व शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले, त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधितांची झाडा-झडती घेण्याची वेळ आली ती त्यामुळेच. मुख्यालयाच्या ठिकाणीच अशी अवस्था असेल तर दूरवरच्या ग्रामीण भागात कोण कोणाकडे पाहणार? खरेतर शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष ठेवायला हवे, पण ते होत नाही. लोकप्रतिनिधी अचानक भेटी देतात तेव्हा असे गोंधळ चव्हाट्यावर येऊन प्रशासन कसे सुस्तावले आहे हे लक्षात येते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही बदल्यांमध्ये व टेंडरमध्ये स्वारस्य वाढल्याने तर हे प्रकार सोकावले नाहीत ना, याचा शोध घ्यायला हवा.

 

सरकारी व विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. कोरोनामुळे शाळा दीर्घ कालावधीसाठी बंद राहिल्याने तर या क्षेत्रापुढे नवीनच समस्या निर्माण झाल्या आहेत. अशात काही गुरूजन पदरमोड करून ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य बजावत आहेत, तर काही मात्र बेफिकीरपणे आला दिवस पुढे ढकलताना दिसत आहेत. बरेच जण शाळेवर न जाताच हजेरी भरत असल्याच्या ग्रामीण भागात तक्रारी आहेत. वरिष्ठ यंत्रणेकडून नाड्या आवळल्याखेरीज यात सुधारणा होणे नाही, परंतु तेच होताना दिसत नाही. दुर्दैव म्हणजे जि. प. अध्यक्षांनी केलेल्या पाहणीत शाळांच्या वर्गखोल्यांचा वापर चक्क शौचालयासाठी करण्यात येत असल्याचेही आढळले, तर या ठिकाणी जुगारही चालत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मागे पातुर, बाळापूरमध्येही काही शाळा बंद आढळून आल्या होत्या; पण त्यावर आजपर्यंत कारवाई नाही. ही सर्व परिस्थिती पाहता शिक्षण विभागाचे व एकूणच जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित व्हावा.

 

तेव्हा दांडीबहाद्दर मुख्याध्यापक व शिक्षकांवर केवळ निलंबनाची कारवाई करून थांबता येऊ नये, तर त्यांची बत्तीच गूल करायला हवी. शिवाय अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यवेक्षकीय यंत्रणांचेसुद्धा कान धरले गेले पाहिजेत. रस्ते, बांधकाम, दिवाबत्ती, पाणी पुरवठा यासारख्या विषयांइतकेच शिक्षण व आरोग्याच्या विषयावरही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. शाळाखोल्यांचा वापर जसा शौचालयासाठी होताना दिसतो, तसे आरोग्य उपकेंद्रांमधील औषधे व उपकरणे तेथील शौचालयांमध्ये आढळली तर आश्चर्य वाटू नये, अशी वस्तुस्थिती आहे.

 

सारांशात, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पाहणीत आढळलेली शाळांमधील बेफिकिरीची अवस्था दूर करण्यासाठी धाडसी कारवाई अपेक्षित आहे. अन्यथा भेटी होतात व नंतर सारे प्रकरण लालफितीत अडकून पडते असा समज प्रस्थापित व्हायला नको.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक