शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, येथे नारीची पूजा होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:42 IST

भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक देश आहे हा इंग्लंडचा थॉमसन रायटर्स फाऊंडेशनने जाहीर केलेला अहवाल देश

भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक देश आहे हा इंग्लंडचा थॉमसन रायटर्स फाऊंडेशनने जाहीर केलेला अहवाल देश, सरकार, समाज आणि कुटुंबव्यवस्था या साऱ्यांनाच त्यांची मान खाली घालायला लावणारा आणि शरमेच्या सागरात बुडविणारा आहे. दर पाच मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्यातच त्यातल्या अनेकींची क्रूर हत्या, दर दहा मिनिटाला एखाद्या स्त्रीच्या विनयभंगासह अब्रूच्या लुटीचा सध्याचा आलेख पाहिला की आपल्या सामाजिक व सांस्कृतिक अधोगतीचीच लाज वाटू लागते. भारत सरकारच्या परराष्टÑ मंत्रालयाने हा अहवाल फेटाळला असला तरी त्या फेटाळण्याची भारतीयांएवढीच जगानेही दखल घेतली नाही. बलात्कार, बलात्कारितेची हत्या, अल्पवयीन मुलीवर बळजोरी आणि स्त्रियांवरचे एकूण अत्याचार यात अलीकडच्या काळात कमालीची वाढ झाली असून आपल्या सामाजिक संस्थांनी आणि स्त्रियांच्या संघटनांनी त्यांची जेवढी दखल घेतली तेवढी ती देशाच्या पुरुषप्रधान सरकारने घेतली नाही. दरदिवशीची वर्तमानपत्रे अशा घृणास्पद घटनांचे पुरावे पुढे आणतात आणि ते पाहिले की आपल्या घरातील स्त्रिया व मुलींच्या सुरक्षेचीच साºयांना चिंता वाटू लागते. यातल्या बहुतेक घटना उजेडात येत नाहीत व ते अत्याचार सहन करणाºया मुलींना व स्त्रियांना केवळ मुस्कटदाबी सहन करावी लागते. त्यातून अशा अत्याचाºयांमध्ये नात्यातल्या, जवळच्या व शेजाºयांचाही बरेचदा समावेश असल्याने त्या विषयीचे मौन सांभाळणेच मग जास्तीच्या अब्रुदारीचे लक्षण मानले जाते. याविषयीचे खटले जलदगती न्यायालयात तारखा न देता चालविले जावे, त्यातील गुन्हेगारांना फाशी व जन्मठेपेसारख्या जबर शिक्षा व्हाव्या याची चर्चाच अधिक झाली. पण तिने गुन्हेगारांच्या मनात दहशत मात्र निर्माण केली नाही. त्यातच अशा पीडित स्त्रियांची बाजू घेणाºयांना शिवीगाळ करणाºया कर्मठ परंपरावाद्यांची पातळी एवढी नीच की अशा अपराधांना प्रकाशात आणणाºयांना त्यांची भीती वाटत असते. स्त्रियांवरील अत्याचाराविषयी पोटतिडिकेने लिहिणाºया गौरी लंकेशची हत्या झाली तेव्हा स्वत:ला रामसेना म्हणविणाºया धर्ममार्तंडांच्या संघटनेच्या अध्यक्षाने ‘एका कुत्रीची हत्या झाली तर देशाने त्याची एवढी दखल घेण्याचे कारण काय’ असा हलकट प्रश्न विचारला. तात्पर्य बलात्कारासारख्या घटनांना त्यातील प्रत्यक्ष गुन्हेगार जेवढे जबाबदार तेवढे त्यांच्याकडे पाहून न पाहणाºया करणाºया संस्था, संघटना, व्यवस्था, पोलीस आणि धर्ममार्तंडही जबाबदार आहेत. या मार्तंडांना सरकारचा पाठिंबा असल्याने त्यांना कुणी हातही लावत नाही. सबब सरकार, धर्ममार्तंड, सामाजिक व्यवस्था आणि पुरुषप्रधान संस्कृती या सगळ्याच गोष्टी दूरच असतील तर त्यात बलात्कारितांनी व त्यांच्या नातेवाईकांनी न्यायाची अपेक्षा तरी कशी करायची आणि समाजातील बदमाशांना बेड्या तरी कशा पडायच्या? त्यातून कायद्यातल्या पळवाटा आहेत, त्यांचा वापर करणारे बलाढ्य वकील आहेत आणि संशयाचा फायदा गुन्हेगारांना देणारी न्यायालये आहेत. त्याचमुळे विदेशातून पर्यटक म्हणून आलेल्या महिलांवर अलीकडे जे बलात्कार झाले त्याचा परिणाम होऊन जगातील अनेक देशांनी ‘भारतात जाऊ नका’ असा सल्ला आपल्या स्त्रियांना दिला आहे. अडचण ही की स्त्री ही वापरायची वस्तू आहे, तिला इच्छा नाही, तिला व्यक्तिमत्त्व नाही आणि तिचा कोणताही सन्मान राखण्याची गरज नाही ही मानसिकताच ज्या समाजात असते त्यात या प्रकारांना आळा कोण व कसा घालील? बलात्काराचा आरोप ज्यांच्यावर आहे असे कितीजण आपल्या लोकसभेत, राज्यसभेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये सन्माननीय सभासद म्हणून आज बसत आहेत. ज्या समाजात गुन्हेगारच त्याचे पुढारीपण करतात त्या समाजात स्त्रीला वा कोणत्याही दुबळ्या जीवाला न्याय कोण देईल? आताच्या अहवालाने आपले डोळे उघडण्याऐवजी ते बंद करून त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता सरकारमध्येही असेल तर आपल्या स्त्रियांचे नष्टचर्य संपायला आणखी काही दशके लागतील.