शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

सांगा बापू-मालक, सोलापूर कसे विकायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:52 IST

सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे.

सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे.इच्छाशक्तीला कृतीची जोड न मिळाल्यास कोणत्याही चांगल्या माणसाचे नियोजन स्वप्नरंजनाच्या पलीकडे पोहोचत नाही. हा अनुभव सध्या सोलापूर जिल्हा घेऊ लागला आहे. एखाद्या कारखान्याची ‘चिमणी’ पडते की राहते किंवा राजकीय गटबाजीच्या सारीपाटावर यश संपादन करून कोणता नेता डिंग्या मारतो यात सामान्य नागरिकाला रस असू शकत नाही. इथे मात्र नको ते विषय ताणत बसणे आणि राजकारणाच्या एरंडीचे गु-हाळ गाळण्यातच आनंद मानला जात आहे. बरं एकदा ठरले की, सोलापूर जगभरात विकायचेच ! (विकायचे म्हणजे सोलापूरच्या सशक्त आणि गौरवशाली बाबींचे मार्केटिंग करायचे असं, बरंका !) मग विक्रीसाठी आवश्यक असणारी फक्त बोलबच्चनगिरी करून कसे भागेल ? अगोदर वस्तूंची गुणवत्ता जी उच्च आहे ती अबाधित राखून उच्च कोटीचे सादरीकरण करावे लागेल. मागच्या आठवड्यात ‘क्रेडाई’ या संस्थेने सोलापूर जिल्ह्याचे मार्केटिंग करणारी एक खूप चांगली व्हिडिओ क्लिप प्रसारित केली होती. ‘लोकमंगल’कार आणि राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषबापू देशमुख यांनीही मंत्रिपदाची महावस्त्रे परिधान करण्यापूर्वीच सोलापूरच्या मार्केटिंगची महती जाणून तसे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांचे काम आणि भूमिका मर्यादित स्वरूपाची होती. त्याप्रमाणातच लोकांच्या अपेक्षाही होत्या. पण ते राज्यातले प्रमुख कॅबिनेटमंत्र्यांपैकी एक बनल्यानंतर त्या अपेक्षा दुणावल्या. सोलापूरचे मार्केटिंग आणि सोलापूर जिल्ह्याचा विकास ही केवळ सुभाषबापूंची जबाबदारी आहे असे मात्र आम्ही म्हणणार नाही. ती सर्वांचीच जबाबदारी आहे. पण पालकमंत्री म्हणून आमचे ‘आवडते मालक’ विजयकुमार देशमुख आणि जिल्ह्यातील वजनदार कॅबिनेट मंत्री म्हणून सुभाषबापू यांच्याकडे उत्तरदायित्वाचा अधिक वाटा जातो. ३८४ कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या तिजोरीत येऊन महिने लोटले तरी स्मार्ट होण्याची कुठलीही चिन्हे आम्हाला दिसेनात. रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर साडेबावीस कोटी रुपये खर्च होणार आहेत म्हणे ! स्मार्ट रस्तेच स्मार्ट करून सोलापूर शहर स्मार्ट होणार आहे का? गारमेंट पार्कच्या गप्पा झाल्या ! राज्याला लागणाºया शालेय गणवेशात अर्धा वाटा आमचा असतो अशी शेखी आम्ही मिरवतो. गारमेंट पार्क कागदावरून प्रत्यक्ष प्लॉटवर कधी येणार? राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. राजमाता अहल्याबाईएवढीच श्रद्धा आमची महात्मा बसवेश्वरांवरही आहे. नामकरण तर झाले, विद्यापीठाच्या विकासाचे काय? छोटे कार्यक्षेत्र प्रगतीला उपकारक असते असे म्हणतात. बाकीचे राजकारण सोडून आपले छोटे विद्यापीठ आंतरराष्टÑीय दर्जाचे व्हावे असे का कोणाला वाटत नाही ? उजनी धरण ११० टक्के क्षमतेने भरले. उपलब्ध पाण्याचे नियोजन बापू आणि मालकांनी काय केले? पाणी संपल्यावरच आपण सगळे जागे होणार आहोत काय? सत्ता ही खुर्चीवर बसणाºयाला अंध आणि कर्णबधीर बनवत असते असे अनेकजण म्हणतात. त्याच कारणाने बापू व मालक आपल्या असंख्य ‘चाणक्य’ दर्जाच्या मोहºयात गुंतल्याने आज विचारू वाटते, सांगा बापू-मालक, सोलापूर कसे विकायचे ?- राजा माने

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख