शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

सांगा बापू-मालक, सोलापूर कसे विकायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:52 IST

सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे.

सोलापूरच्या मार्केटिंगची भाषा केवळ भाषणापूरती ठेवून कसे चालेल ? सध्या सोलापूर कसे ‘विकायचे?’ या प्रश्नाचा वेध जिल्ह्यातील व शहरातील सामान्य माणूस घेऊ लागला आहे.इच्छाशक्तीला कृतीची जोड न मिळाल्यास कोणत्याही चांगल्या माणसाचे नियोजन स्वप्नरंजनाच्या पलीकडे पोहोचत नाही. हा अनुभव सध्या सोलापूर जिल्हा घेऊ लागला आहे. एखाद्या कारखान्याची ‘चिमणी’ पडते की राहते किंवा राजकीय गटबाजीच्या सारीपाटावर यश संपादन करून कोणता नेता डिंग्या मारतो यात सामान्य नागरिकाला रस असू शकत नाही. इथे मात्र नको ते विषय ताणत बसणे आणि राजकारणाच्या एरंडीचे गु-हाळ गाळण्यातच आनंद मानला जात आहे. बरं एकदा ठरले की, सोलापूर जगभरात विकायचेच ! (विकायचे म्हणजे सोलापूरच्या सशक्त आणि गौरवशाली बाबींचे मार्केटिंग करायचे असं, बरंका !) मग विक्रीसाठी आवश्यक असणारी फक्त बोलबच्चनगिरी करून कसे भागेल ? अगोदर वस्तूंची गुणवत्ता जी उच्च आहे ती अबाधित राखून उच्च कोटीचे सादरीकरण करावे लागेल. मागच्या आठवड्यात ‘क्रेडाई’ या संस्थेने सोलापूर जिल्ह्याचे मार्केटिंग करणारी एक खूप चांगली व्हिडिओ क्लिप प्रसारित केली होती. ‘लोकमंगल’कार आणि राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाषबापू देशमुख यांनीही मंत्रिपदाची महावस्त्रे परिधान करण्यापूर्वीच सोलापूरच्या मार्केटिंगची महती जाणून तसे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांचे काम आणि भूमिका मर्यादित स्वरूपाची होती. त्याप्रमाणातच लोकांच्या अपेक्षाही होत्या. पण ते राज्यातले प्रमुख कॅबिनेटमंत्र्यांपैकी एक बनल्यानंतर त्या अपेक्षा दुणावल्या. सोलापूरचे मार्केटिंग आणि सोलापूर जिल्ह्याचा विकास ही केवळ सुभाषबापूंची जबाबदारी आहे असे मात्र आम्ही म्हणणार नाही. ती सर्वांचीच जबाबदारी आहे. पण पालकमंत्री म्हणून आमचे ‘आवडते मालक’ विजयकुमार देशमुख आणि जिल्ह्यातील वजनदार कॅबिनेट मंत्री म्हणून सुभाषबापू यांच्याकडे उत्तरदायित्वाचा अधिक वाटा जातो. ३८४ कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या तिजोरीत येऊन महिने लोटले तरी स्मार्ट होण्याची कुठलीही चिन्हे आम्हाला दिसेनात. रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर साडेबावीस कोटी रुपये खर्च होणार आहेत म्हणे ! स्मार्ट रस्तेच स्मार्ट करून सोलापूर शहर स्मार्ट होणार आहे का? गारमेंट पार्कच्या गप्पा झाल्या ! राज्याला लागणाºया शालेय गणवेशात अर्धा वाटा आमचा असतो अशी शेखी आम्ही मिरवतो. गारमेंट पार्क कागदावरून प्रत्यक्ष प्लॉटवर कधी येणार? राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. राजमाता अहल्याबाईएवढीच श्रद्धा आमची महात्मा बसवेश्वरांवरही आहे. नामकरण तर झाले, विद्यापीठाच्या विकासाचे काय? छोटे कार्यक्षेत्र प्रगतीला उपकारक असते असे म्हणतात. बाकीचे राजकारण सोडून आपले छोटे विद्यापीठ आंतरराष्टÑीय दर्जाचे व्हावे असे का कोणाला वाटत नाही ? उजनी धरण ११० टक्के क्षमतेने भरले. उपलब्ध पाण्याचे नियोजन बापू आणि मालकांनी काय केले? पाणी संपल्यावरच आपण सगळे जागे होणार आहोत काय? सत्ता ही खुर्चीवर बसणाºयाला अंध आणि कर्णबधीर बनवत असते असे अनेकजण म्हणतात. त्याच कारणाने बापू व मालक आपल्या असंख्य ‘चाणक्य’ दर्जाच्या मोहºयात गुंतल्याने आज विचारू वाटते, सांगा बापू-मालक, सोलापूर कसे विकायचे ?- राजा माने

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख