शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जंगल वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:41 IST

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते.

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भातील आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील जंगलांमध्ये आगीच्या ५८४४ घटनांमध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी आतापर्यंत आगीच्या तीन हजारावर छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेत. जंगलातील या वणव्यांकडे ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सहजतेने बघण्याची एक सवयच आम्हाला लागली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण उन्हाळ्यात वणवा लागतोच, तेंदूचा हंगाम असला की लोक आग लावतातच असे आम्ही गृहितच धरून चालत असल्याने काही किरकोळ उपाययोजना वगळता या आगी नियंत्रणात आणण्याकरिता अथवा त्या लागूच नयेत या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज यंत्रणा अद्यापही आम्ही तयार केलेली नाही, आणि असली तरी ती प्रभावीपणे अमलात आणलेली नाही, हे या आगीचे प्रमाण बघितल्यावर कुणाच्याही लक्षात यावे. एकीकडे विकासाच्या नावावर जंगलांची सरेआम कत्तल सुरू असताना जंगलांमध्ये लागणाºया या वणव्यांमुळे होणारे नुकसान कधीही भरून न निघणारे असेच आहे. या आगींमुळे केवळ हजारो प्रकारच्या वनस्पतीच नष्ट होत नाहीत तर जमिनीचा पोतही खराब होतो. या जमिनीवर पुन्हा वृक्षवल्ली उगवणे,बहरणे अशक्य होऊन बसते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या जंगलांवर पोसल्या जाणारे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास कायमचा हिरावून घेतला जातो. वणवा पेटला की वन्यजीव जंगलाबाहेर पडतात आणि संकटात सापडतात ते वेगळेच. एकंदरीतच आम्ही जंगलांमधील आगी अजूनही पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. कुठल्याही जंगलात आग लागली की वनमजूर आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी ती विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे खरे. पण त्यांच्या सोबतीला जी सुसज्ज यंत्रणा असायला हवी ती आपल्याकडे आहे का? गेल्या ३० वर्षात राज्यात वृक्षलागवडीचे असंख्य कार्यक्रम घेतल्यावरही जंगलांची स्थिती काही फारशी चांगली नाही. ३५ वर्षात जवळपास १५०० चौ.किमी. वनक्षेत्र नष्ट झाले आहे. थोडेबहुत घनदाट जंगल शिल्लक आहे ते केवळ विदर्भातच. तेव्हा या आगींमुळे ते नष्ट होऊ नये,एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलnewsबातम्या