शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

जंगल वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:41 IST

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते.

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भातील आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील जंगलांमध्ये आगीच्या ५८४४ घटनांमध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी आतापर्यंत आगीच्या तीन हजारावर छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेत. जंगलातील या वणव्यांकडे ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सहजतेने बघण्याची एक सवयच आम्हाला लागली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण उन्हाळ्यात वणवा लागतोच, तेंदूचा हंगाम असला की लोक आग लावतातच असे आम्ही गृहितच धरून चालत असल्याने काही किरकोळ उपाययोजना वगळता या आगी नियंत्रणात आणण्याकरिता अथवा त्या लागूच नयेत या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज यंत्रणा अद्यापही आम्ही तयार केलेली नाही, आणि असली तरी ती प्रभावीपणे अमलात आणलेली नाही, हे या आगीचे प्रमाण बघितल्यावर कुणाच्याही लक्षात यावे. एकीकडे विकासाच्या नावावर जंगलांची सरेआम कत्तल सुरू असताना जंगलांमध्ये लागणाºया या वणव्यांमुळे होणारे नुकसान कधीही भरून न निघणारे असेच आहे. या आगींमुळे केवळ हजारो प्रकारच्या वनस्पतीच नष्ट होत नाहीत तर जमिनीचा पोतही खराब होतो. या जमिनीवर पुन्हा वृक्षवल्ली उगवणे,बहरणे अशक्य होऊन बसते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या जंगलांवर पोसल्या जाणारे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास कायमचा हिरावून घेतला जातो. वणवा पेटला की वन्यजीव जंगलाबाहेर पडतात आणि संकटात सापडतात ते वेगळेच. एकंदरीतच आम्ही जंगलांमधील आगी अजूनही पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. कुठल्याही जंगलात आग लागली की वनमजूर आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी ती विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे खरे. पण त्यांच्या सोबतीला जी सुसज्ज यंत्रणा असायला हवी ती आपल्याकडे आहे का? गेल्या ३० वर्षात राज्यात वृक्षलागवडीचे असंख्य कार्यक्रम घेतल्यावरही जंगलांची स्थिती काही फारशी चांगली नाही. ३५ वर्षात जवळपास १५०० चौ.किमी. वनक्षेत्र नष्ट झाले आहे. थोडेबहुत घनदाट जंगल शिल्लक आहे ते केवळ विदर्भातच. तेव्हा या आगींमुळे ते नष्ट होऊ नये,एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलnewsबातम्या