शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जंगल वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:41 IST

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते.

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भातील आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील जंगलांमध्ये आगीच्या ५८४४ घटनांमध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी आतापर्यंत आगीच्या तीन हजारावर छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेत. जंगलातील या वणव्यांकडे ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सहजतेने बघण्याची एक सवयच आम्हाला लागली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण उन्हाळ्यात वणवा लागतोच, तेंदूचा हंगाम असला की लोक आग लावतातच असे आम्ही गृहितच धरून चालत असल्याने काही किरकोळ उपाययोजना वगळता या आगी नियंत्रणात आणण्याकरिता अथवा त्या लागूच नयेत या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज यंत्रणा अद्यापही आम्ही तयार केलेली नाही, आणि असली तरी ती प्रभावीपणे अमलात आणलेली नाही, हे या आगीचे प्रमाण बघितल्यावर कुणाच्याही लक्षात यावे. एकीकडे विकासाच्या नावावर जंगलांची सरेआम कत्तल सुरू असताना जंगलांमध्ये लागणाºया या वणव्यांमुळे होणारे नुकसान कधीही भरून न निघणारे असेच आहे. या आगींमुळे केवळ हजारो प्रकारच्या वनस्पतीच नष्ट होत नाहीत तर जमिनीचा पोतही खराब होतो. या जमिनीवर पुन्हा वृक्षवल्ली उगवणे,बहरणे अशक्य होऊन बसते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या जंगलांवर पोसल्या जाणारे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास कायमचा हिरावून घेतला जातो. वणवा पेटला की वन्यजीव जंगलाबाहेर पडतात आणि संकटात सापडतात ते वेगळेच. एकंदरीतच आम्ही जंगलांमधील आगी अजूनही पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. कुठल्याही जंगलात आग लागली की वनमजूर आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी ती विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे खरे. पण त्यांच्या सोबतीला जी सुसज्ज यंत्रणा असायला हवी ती आपल्याकडे आहे का? गेल्या ३० वर्षात राज्यात वृक्षलागवडीचे असंख्य कार्यक्रम घेतल्यावरही जंगलांची स्थिती काही फारशी चांगली नाही. ३५ वर्षात जवळपास १५०० चौ.किमी. वनक्षेत्र नष्ट झाले आहे. थोडेबहुत घनदाट जंगल शिल्लक आहे ते केवळ विदर्भातच. तेव्हा या आगींमुळे ते नष्ट होऊ नये,एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलnewsबातम्या