शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जंगल वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:41 IST

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते.

विदर्भातील काही जंगलांमध्ये गेल्या पंधरवड्यापासून वणवा पेटला आहे. नवेगाव-नागझिरा कॉरिडोरमधील जंगल धुमसतेय तर इकडे गोरेवाडा वनपरिक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. नवेगाव-नागझिऱ्यात आठवडाभरात पाच हेक्टरावर जंगल नष्ट झाल्याचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागली,तेंदूचा हंगाम जवळ आला की जंगलांमध्ये आगी लागण्यास सुरुवात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यासंदर्भातील आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील जंगलांमध्ये आगीच्या ५८४४ घटनांमध्ये ३१,८७६ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले होते. यावर्षी आतापर्यंत आगीच्या तीन हजारावर छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेत. जंगलातील या वणव्यांकडे ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सहजतेने बघण्याची एक सवयच आम्हाला लागली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण उन्हाळ्यात वणवा लागतोच, तेंदूचा हंगाम असला की लोक आग लावतातच असे आम्ही गृहितच धरून चालत असल्याने काही किरकोळ उपाययोजना वगळता या आगी नियंत्रणात आणण्याकरिता अथवा त्या लागूच नयेत या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज यंत्रणा अद्यापही आम्ही तयार केलेली नाही, आणि असली तरी ती प्रभावीपणे अमलात आणलेली नाही, हे या आगीचे प्रमाण बघितल्यावर कुणाच्याही लक्षात यावे. एकीकडे विकासाच्या नावावर जंगलांची सरेआम कत्तल सुरू असताना जंगलांमध्ये लागणाºया या वणव्यांमुळे होणारे नुकसान कधीही भरून न निघणारे असेच आहे. या आगींमुळे केवळ हजारो प्रकारच्या वनस्पतीच नष्ट होत नाहीत तर जमिनीचा पोतही खराब होतो. या जमिनीवर पुन्हा वृक्षवल्ली उगवणे,बहरणे अशक्य होऊन बसते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे या जंगलांवर पोसल्या जाणारे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास कायमचा हिरावून घेतला जातो. वणवा पेटला की वन्यजीव जंगलाबाहेर पडतात आणि संकटात सापडतात ते वेगळेच. एकंदरीतच आम्ही जंगलांमधील आगी अजूनही पाहिजे तेवढ्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. कुठल्याही जंगलात आग लागली की वनमजूर आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी ती विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, हे खरे. पण त्यांच्या सोबतीला जी सुसज्ज यंत्रणा असायला हवी ती आपल्याकडे आहे का? गेल्या ३० वर्षात राज्यात वृक्षलागवडीचे असंख्य कार्यक्रम घेतल्यावरही जंगलांची स्थिती काही फारशी चांगली नाही. ३५ वर्षात जवळपास १५०० चौ.किमी. वनक्षेत्र नष्ट झाले आहे. थोडेबहुत घनदाट जंगल शिल्लक आहे ते केवळ विदर्भातच. तेव्हा या आगींमुळे ते नष्ट होऊ नये,एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :forestजंगलnewsबातम्या