शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सरपंच, इयत्ता दहावी

By admin | Updated: May 27, 2017 00:00 IST

गावचे सरपंच व्हायचे असेलतर उमेदवार दहावी पास असावा, अशी अट टाकण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. सरपंच थेट जनतेतून निवडण्याचेही प्रस्तावित आहे.

गावचे सरपंच व्हायचे असेलतर उमेदवार दहावी पास असावा, अशी अट टाकण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. सरपंच थेट जनतेतून निवडण्याचेही प्रस्तावित आहे. पंचायतराजसंदर्भात राज्यात जी तज्ज्ञ समिती आहे, त्या समितीच्या शिफारशीवरून ग्रामविकास विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. ग्रामपंचायतचा विस्तारलेला कारभार पाहता तसेच चौदाव्या वित्त आयोगात केंद्राचा निधी हा थेट ग्रामपंचायतला येत असल्याने सरपंच हा शिक्षित असला पाहिजे, ही अपेक्षा स्वाभाविक आहे. पूर्वीचा सरपंच व आत्ताच्या सरपंचाचा कारभार यात मोठी तफावत आहे. ग्रामपंचायतच्या योजना व जनतेच्या अपेक्षा आता प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्व योजना समजावून घेणे, सरकारी परिपत्रके वाचणे, वरच्या कार्यालयात पत्रव्यवहार करणे यासाठी सरपंचाचे शिक्षित असणे अगत्याचे ठरते. तरुण पिढीही यामुळे गावचा कारभार पाहण्यासाठी पुढे येईल. त्यामुळे एका अर्थाने हा निर्णय स्वागतार्ह ठरतो. परंतु, आपल्या देशाने स्वीकारलेल्या लोकशाही मूल्यांच्या चौकटीत हा निर्णय जोखावा लागेल. घटना समितीतही मताचा अधिकार देताना शिक्षण, संपत्ती, जात, धर्म या निकषांचा विचार झाला होता. त्यावेळी या सर्व निकषांच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती, एक मत, एक पत हे तत्त्व स्वीकारले गेले. आपल्याकडे निवडणुकीस उभे राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नाही. सर्व समाज एका समान पातळीवर नसल्याने व संधीचीही समानता नसल्याने मतात समानता आणली गेली. त्यामुळे घटनेच्या तत्त्वाप्रमाणे अगदी निरक्षर व्यक्तीही आमदार, खासदार व अगदी राष्ट्रपती होण्यास पात्र आहे. यात निरक्षरतेचे समर्थन नसून व्यक्तीचे स्वातंत्र्य महत्त्वाचे मानले गेले. या पार्श्वभूमीवर एकट्या सरपंचाला शिक्षणाची अट घालणे हे घटनात्मकदृष्ट्या योग्य ठरेल का? शालांत परीक्षाही उत्तीर्ण नसलेले वसंतदादा पाटील हे प्रभावशाली मुख्यमंत्री ठरले, तर उच्चशिक्षित मुख्यमंत्र्यांना ‘विदूषक’ म्हणून हिणवले गेले, अशी दोन टोकाची उदाहरणे आपल्या राज्याने पाहिलेली आहेत. त्यामुळे शिकलेला माणूसच उत्तम प्रशासक होऊ शकतो, असे अनुमान काढता येत नाही. अर्थात विकसनशील राष्ट्रात लोकप्रतिनिधी शिक्षित असावेत, असा आग्रह धरला जाणे हेही एकदम धुडकावून चालणार नाही. किमान या चर्चेतून शिक्षणाचे महत्त्व आणखी अधोरेखित होईल. लोकप्रतिनिधींना अक्षरज्ञान असायलाच हवे. नसेल तर तसे प्रशिक्षण वर्ग सरकारनेच चालवून तेथे अशी संधी उपलब्ध करून द्यायला हवी. त्यानंतरही साक्षर होण्याची तयारी नसेल तर निवडणुकीतून अपात्र ठरविणे योग्य ठरेल. मराठीचे ज्ञान नसलेल्या परप्रांतीय अधिकाऱ्यांना भाषा शिकण्याची संधी दिली जाते. त्या धर्तीवर असा प्रयोग करता येऊ शकेल. अर्थात केवळ पदवी घेतली म्हणजे गावगाडा हाकता येतो, हाही गैरसमज आहे.