शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संतोष थिपे : ऋणमोचनाचा नवा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

परवाच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे १६ वर्षांपूर्वीचा संतोष सापडला आणि ऋणमोचनाचा नवा अर्थदेखील गवसला...

- गजानन जानभोर

चंद्रपूरलगतच्या जंगलातील परवाचा थरार साऱ्यांचेच प्राण कंठाशी आणणारा. झुडपात लपून असलेल्या बिबट्याने एका वनाधिकाºयावर हल्ला केला. या दोघांतील ही झुंज तब्बल पाच मिनिटे सुरू होती. अखेर बिबट्या जेरबंद झाला. वनाधिकाºयाच्या धाडसाचे माध्यमांनी कौतुक केले. समाजमाध्यमांवर ही झुंज व्हायरलही झाली. तो मात्र ही घटना विसरून आपल्या कामाला लागला. आई-बाप असूनही लहानपणापासून अनाथपण भोगणाºयांना अशा झुंजीचे फारसे अप्रूप राहात नाही. संतोष थिपे त्याचे नाव. बारावीचा निकाल लागला त्या दिवशी गडचांदूरच्या माणिकगढ सिमेंट फॅक्टरीत कामावर असलेला हाच तो संतोष.१६ वर्षांपूर्वीची ही गोष्ट, २००२ ची. निकालाच्या दिवशी शाळेत मुले जमली होती. जल्लोष सुरू होता. या आनंदोत्सवात संतोष कुठेच दिसत नव्हता. तो नागपूर विभागातून गुणवत्ता यादीत झळकल्यामुळे साºयांच्याच नजरा त्याला शोधत होत्या. कुणीतरी सांगितले, तो सिमेंट फॅक्टरीत आहे. शिक्षक, विद्यार्थी तिथे गेले, संतोषला मेरिट आल्याची आनंदादायक वार्ता दिली. अभिनंदनाने तो सुखावला पण पुढे काय? या प्रश्नाने अस्वस्थ झाला. कौटुंबिक वादामुळे संतोषचे बालपण आजोबांकडेच गेले. सातव्या वर्गापासून तो मजुरीवर जायचा. कुणाचे मार्गदर्शन नाही, पाठबळही नाही. मजुरीवरून घरी परतल्यानंतर रात्री रस्त्यालगतच्या दिव्याखाली तो अभ्यास करायचा. तो गुणवत्ता यादीत येईल, असे कुणालाही वाटले नाही. अगदी त्यालासुद्धा नाही. अभावग्रस्त मुले पोटासाठी शिकतात, गुणवत्ता यादीसाठी नाही. संतोषचे शिक्षक त्याला लोकमत, चंद्रपूर कार्यालयात घेऊन आले. लोकमतने मदतीचा हात पुढे केला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जगन्नाथन यांनी पोलीस अधिकारी संदीप दिवान व शिरीष सरदेशपांडे यांच्यावर संतोषची जबाबदारी सोपवली. त्याला डीएड करायचे होते. शिक्षक होऊन वृद्ध आजी-आजोबांवरील कुटुंबाचे ओझे स्वत:च्या खांद्यावर पुढे न्यायचे होते. संतोषने डीएडला प्रवेश घेतला खरा पण सर्वांचा आग्रह स्पर्धा परीक्षेचा. ‘तुझ्या आजी-आजोबांची काळजी आम्ही घेऊ, तू केवळ स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित कर’ शाळेतील प्रा. धनंजय काळे, लिपिक शशांक नामेवार यांनी त्याला धीर दिला. दरम्यानच्या काळात पोलीस अधीक्षक जगन्नाथन यांची बदली झाली. पण त्यांच्या जागेवर आलेल्या मधुकर पांडेंनी संतोषचे पालकत्व अबाधित ठेवले. संतोष पहिल्याच प्रयत्नात वनाधिकारी झाला. त्याला पहिली नियुक्ती गोंदियात मिळाली. रामघाट खदान प्रकरण, अवैध शिकारी, उत्खनन, वृक्षतोड याविरुद्ध संतोषने कठोर पावले उचलली. या काळात त्याच्यावर गुंडांनी प्राणघातक हल्ले केले. प्रसंगी राजकीय दबाव, पैशाची आमिषे दाखविण्यात आली. पण तो डगमगला नाही.अलीकडेच तो वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नतीवर चंद्रपुरात आला. परवा बिबट्याला जेरबंद करायला गेलेल्या वनकर्मचाºयांपैकी एकावर या बिबट्याने झडप घेतली. पण संतोषने त्या कर्मचाºयाला बाजूला करून हा हल्ला स्वत:वर घेतला. बिबट्याशी झुंज देत असताना आपल्या हातात असलेल्या काठीचा उपयोग संतोषने स्वत:च्या संरक्षणाकरिता केला. बिबट्याला कुठलीही इजा त्याला होऊ द्यायची नव्हती. ‘माझे काम वन्यजिवांच्या रक्षणाचे आहे, त्यांना मारायचे नाही’ हातावरील जखमांकडे बघत संतोष सांगत असतो. संतोष अजूनही विनम्र आहे. परिस्थिती बदलली की माणसे बेईमान होतात, ओळख विसरतात. तो मात्र कृतज्ञ आहे. अनाथ मुलांना मदत करून तो सामाजिक ऋण आपल्यापरीने फेडीत असतो. परवाच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे सोळा वर्षांपूर्वीचा संतोष सापडला आणि ऋणमोचनाचा नवा अर्थदेखील गवसला...

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्र