शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संतोष थिपे : ऋणमोचनाचा नवा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:01 IST

परवाच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे १६ वर्षांपूर्वीचा संतोष सापडला आणि ऋणमोचनाचा नवा अर्थदेखील गवसला...

- गजानन जानभोर

चंद्रपूरलगतच्या जंगलातील परवाचा थरार साऱ्यांचेच प्राण कंठाशी आणणारा. झुडपात लपून असलेल्या बिबट्याने एका वनाधिकाºयावर हल्ला केला. या दोघांतील ही झुंज तब्बल पाच मिनिटे सुरू होती. अखेर बिबट्या जेरबंद झाला. वनाधिकाºयाच्या धाडसाचे माध्यमांनी कौतुक केले. समाजमाध्यमांवर ही झुंज व्हायरलही झाली. तो मात्र ही घटना विसरून आपल्या कामाला लागला. आई-बाप असूनही लहानपणापासून अनाथपण भोगणाºयांना अशा झुंजीचे फारसे अप्रूप राहात नाही. संतोष थिपे त्याचे नाव. बारावीचा निकाल लागला त्या दिवशी गडचांदूरच्या माणिकगढ सिमेंट फॅक्टरीत कामावर असलेला हाच तो संतोष.१६ वर्षांपूर्वीची ही गोष्ट, २००२ ची. निकालाच्या दिवशी शाळेत मुले जमली होती. जल्लोष सुरू होता. या आनंदोत्सवात संतोष कुठेच दिसत नव्हता. तो नागपूर विभागातून गुणवत्ता यादीत झळकल्यामुळे साºयांच्याच नजरा त्याला शोधत होत्या. कुणीतरी सांगितले, तो सिमेंट फॅक्टरीत आहे. शिक्षक, विद्यार्थी तिथे गेले, संतोषला मेरिट आल्याची आनंदादायक वार्ता दिली. अभिनंदनाने तो सुखावला पण पुढे काय? या प्रश्नाने अस्वस्थ झाला. कौटुंबिक वादामुळे संतोषचे बालपण आजोबांकडेच गेले. सातव्या वर्गापासून तो मजुरीवर जायचा. कुणाचे मार्गदर्शन नाही, पाठबळही नाही. मजुरीवरून घरी परतल्यानंतर रात्री रस्त्यालगतच्या दिव्याखाली तो अभ्यास करायचा. तो गुणवत्ता यादीत येईल, असे कुणालाही वाटले नाही. अगदी त्यालासुद्धा नाही. अभावग्रस्त मुले पोटासाठी शिकतात, गुणवत्ता यादीसाठी नाही. संतोषचे शिक्षक त्याला लोकमत, चंद्रपूर कार्यालयात घेऊन आले. लोकमतने मदतीचा हात पुढे केला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक जगन्नाथन यांनी पोलीस अधिकारी संदीप दिवान व शिरीष सरदेशपांडे यांच्यावर संतोषची जबाबदारी सोपवली. त्याला डीएड करायचे होते. शिक्षक होऊन वृद्ध आजी-आजोबांवरील कुटुंबाचे ओझे स्वत:च्या खांद्यावर पुढे न्यायचे होते. संतोषने डीएडला प्रवेश घेतला खरा पण सर्वांचा आग्रह स्पर्धा परीक्षेचा. ‘तुझ्या आजी-आजोबांची काळजी आम्ही घेऊ, तू केवळ स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित कर’ शाळेतील प्रा. धनंजय काळे, लिपिक शशांक नामेवार यांनी त्याला धीर दिला. दरम्यानच्या काळात पोलीस अधीक्षक जगन्नाथन यांची बदली झाली. पण त्यांच्या जागेवर आलेल्या मधुकर पांडेंनी संतोषचे पालकत्व अबाधित ठेवले. संतोष पहिल्याच प्रयत्नात वनाधिकारी झाला. त्याला पहिली नियुक्ती गोंदियात मिळाली. रामघाट खदान प्रकरण, अवैध शिकारी, उत्खनन, वृक्षतोड याविरुद्ध संतोषने कठोर पावले उचलली. या काळात त्याच्यावर गुंडांनी प्राणघातक हल्ले केले. प्रसंगी राजकीय दबाव, पैशाची आमिषे दाखविण्यात आली. पण तो डगमगला नाही.अलीकडेच तो वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नतीवर चंद्रपुरात आला. परवा बिबट्याला जेरबंद करायला गेलेल्या वनकर्मचाºयांपैकी एकावर या बिबट्याने झडप घेतली. पण संतोषने त्या कर्मचाºयाला बाजूला करून हा हल्ला स्वत:वर घेतला. बिबट्याशी झुंज देत असताना आपल्या हातात असलेल्या काठीचा उपयोग संतोषने स्वत:च्या संरक्षणाकरिता केला. बिबट्याला कुठलीही इजा त्याला होऊ द्यायची नव्हती. ‘माझे काम वन्यजिवांच्या रक्षणाचे आहे, त्यांना मारायचे नाही’ हातावरील जखमांकडे बघत संतोष सांगत असतो. संतोष अजूनही विनम्र आहे. परिस्थिती बदलली की माणसे बेईमान होतात, ओळख विसरतात. तो मात्र कृतज्ञ आहे. अनाथ मुलांना मदत करून तो सामाजिक ऋण आपल्यापरीने फेडीत असतो. परवाच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे सोळा वर्षांपूर्वीचा संतोष सापडला आणि ऋणमोचनाचा नवा अर्थदेखील गवसला...

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्र